शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जातीय समीकरणामुळे शिवसेनेला घाम फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:04 IST

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

ठळक मुद्देमतविभाजनाचा धोका : दुहेरी-तिहेरी लढतीत अपक्षांचा बोलबाला

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र जातीय समीकरणे यशस्वी होण्याची शक्यता वाढल्यास या निवडणुकीत शिवसेनेला घाम गाळावा लागेल, असे आजचे चित्र आहे.या निवडणुकीत बंडखोरांची गर्दी वाढली आहे. प्रत्येक प्रभागात अपक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला आहे. बंडखोरांमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा परिणाम निकालावर होईल, असे चित्र आहे. प्रभाग-१ अ मध्ये तिहेरी, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. प्रभाग-२ अ मध्ये दुहेरी लढतीचे चित्र आहे, तर ब मध्ये अपक्षाचा जोर दिसत आहे. या प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक बंडखोर रिंगणात असल्याने काँग्रेसला फायदा होऊ शकतो.प्रभाग क्र.३ अ मध्ये तिहेरी लढतीचे चित्र आहे. या प्रभागात काँग्रेसच्या बंडखोरांमुळे सरळ फायदा शिवसेनेला होऊ शकतो. प्रभाग ३ ब मध्ये अपक्षांसह तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-४ अ मध्ये एकतर्फी लढतीची शक्यता आहे, तर ब मध्ये तिहेरी लढत होत आहे.प्रभाग-५ अ मध्ये प्रहार व मनसेही प्रभावी ठरत आहे, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. प्रभाग-६ अ मध्ये अपक्ष लढतीत राहू शकतो, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. या प्रभागात अपक्षाचाही बोलबाला असल्याने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रभाग-७ अ मध्ये थेट लढत होत आहे. ब मध्ये दुहेरी लढत आहे. प्रभाग क्र.८ अ मध्ये तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-८ ब ला सर्वात जास्त बंडखोरांनी पोखरल्याने यात तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-९ अ मध्ये रिपाइं लढतीत दिसत आहे, तर ब मध्ये तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीत अपक्ष निकाल फिरवू शकतात, बंडखोरांमुळे पक्षाला धक्का पोहोचू शकतो, हे १० डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.अंतर्गत वादात उमेदवार अडचणीतराजकीय पक्षातील अंतर्गत वादही अधिकृत उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. एका गटाचे कार्यकर्ते दुसऱ्या गटासाठी प्रचारकार्य करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काहींनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. उमेदवारी नाकारल्याचा वचपाही काढण्याच्या तयारीत काहीजण आहेत. निवडून येण्याची पूर्ण क्षमता असतानाही काही लोकांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अशा काही लोकांनीही पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी रणनिती आखणे सुरू केले आहे. पैशाचाही वापर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक