शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जातीय समीकरणामुळे शिवसेनेला घाम फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:04 IST

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

ठळक मुद्देमतविभाजनाचा धोका : दुहेरी-तिहेरी लढतीत अपक्षांचा बोलबाला

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र जातीय समीकरणे यशस्वी होण्याची शक्यता वाढल्यास या निवडणुकीत शिवसेनेला घाम गाळावा लागेल, असे आजचे चित्र आहे.या निवडणुकीत बंडखोरांची गर्दी वाढली आहे. प्रत्येक प्रभागात अपक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला आहे. बंडखोरांमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा परिणाम निकालावर होईल, असे चित्र आहे. प्रभाग-१ अ मध्ये तिहेरी, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. प्रभाग-२ अ मध्ये दुहेरी लढतीचे चित्र आहे, तर ब मध्ये अपक्षाचा जोर दिसत आहे. या प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक बंडखोर रिंगणात असल्याने काँग्रेसला फायदा होऊ शकतो.प्रभाग क्र.३ अ मध्ये तिहेरी लढतीचे चित्र आहे. या प्रभागात काँग्रेसच्या बंडखोरांमुळे सरळ फायदा शिवसेनेला होऊ शकतो. प्रभाग ३ ब मध्ये अपक्षांसह तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-४ अ मध्ये एकतर्फी लढतीची शक्यता आहे, तर ब मध्ये तिहेरी लढत होत आहे.प्रभाग-५ अ मध्ये प्रहार व मनसेही प्रभावी ठरत आहे, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. प्रभाग-६ अ मध्ये अपक्ष लढतीत राहू शकतो, तर ब मध्ये दुहेरी लढत होत आहे. या प्रभागात अपक्षाचाही बोलबाला असल्याने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रभाग-७ अ मध्ये थेट लढत होत आहे. ब मध्ये दुहेरी लढत आहे. प्रभाग क्र.८ अ मध्ये तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-८ ब ला सर्वात जास्त बंडखोरांनी पोखरल्याने यात तिहेरी लढतीचे चित्र आहे. प्रभाग-९ अ मध्ये रिपाइं लढतीत दिसत आहे, तर ब मध्ये तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीत अपक्ष निकाल फिरवू शकतात, बंडखोरांमुळे पक्षाला धक्का पोहोचू शकतो, हे १० डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.अंतर्गत वादात उमेदवार अडचणीतराजकीय पक्षातील अंतर्गत वादही अधिकृत उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. एका गटाचे कार्यकर्ते दुसऱ्या गटासाठी प्रचारकार्य करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काहींनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. उमेदवारी नाकारल्याचा वचपाही काढण्याच्या तयारीत काहीजण आहेत. निवडून येण्याची पूर्ण क्षमता असतानाही काही लोकांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अशा काही लोकांनीही पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी रणनिती आखणे सुरू केले आहे. पैशाचाही वापर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक