शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिवसेना आक्रमक

By admin | Updated: February 4, 2015 23:22 IST

आतापर्यंत समाजात विविध मुद्यांवर आक्रमक असलेली शिवसेना राज्यात युतीची सत्ता स्थापन होताच काहीशी मवाळ झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेतील शिवसेनेची आक्रमकता मात्र कायम आहे.

यवतमाळ : आतापर्यंत समाजात विविध मुद्यांवर आक्रमक असलेली शिवसेना राज्यात युतीची सत्ता स्थापन होताच काहीशी मवाळ झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेतील शिवसेनेची आक्रमकता मात्र कायम आहे. या आक्रमकतेपुढे सत्ताधारी पदाधिकारी आणि प्रशासन काहीसे नमते घेत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. डॉ. आरती फुपाटे यांच्या रुपाने अध्यक्षपद पुसद विभागाला मिळाले आहे. सुशिक्षित असलेल्या फुपाटे यांनी अध्यक्षपदी विराजमान होताच आक्रमक पद्धतीने कामकाज सुरू केले होते. ग्रामीण भागात भेटी, आपल्या कार्यालयांची अकस्मात तपासणी करून वचक निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांना प्रशासन व अन्य पदाधिकाऱ्यांकडून तेवढी साथ मिळाली नाही. उलट सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते लेटलतिफ कर्मचाऱ्यांची पाठराखण करताना दिसून आले. त्यामुळे अध्यक्षांचा इन्टरेस्ट कमी झाला, त्यांनीही जिल्हा परिषदेला शिस्त लावण्याचा नाद सोडला. अध्यक्षपद अद्याप पुसदच्या बाहेर निघाले नसल्याचा सूर आहे. अध्यक्षांच्या पुसद ओरिएन्टेड कारभारावर जिल्हा परिषदेत नाराजी पाहायला मिळते. मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने प्रचंड आक्रमकता दाखविली. त्यांच्या या आक्रमकतेपुढे सत्ताधारी पदाधिकारी आणि दीर्घ अनुभवी प्रशासनही बॅकफूटवर आले. त्यातूनच बैठकीला बीडीओंच्या हजेरीचा निर्णय फिरवावा लागला. मला मंत्रालयातील अनुभव आहे, मी सचिवांशी, उपसचिवांशी बोललो, आयुक्तांशी बोलतो, मी स्वत: लक्ष घालतो, बैठक लावतो, चौकशी करतो, अहवाल देतो, माहिती घेतो अशी उत्तरे देऊन आतापर्यंत सदस्यांना चूप करणाऱ्या प्रशासनावर मंगळवारी स्वत:च चूप होण्याची वेळ शिवसेनेच्या आक्रमकतेने आणली. शिवसेनेच्या या आक्रमकतेला राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एखाद-दोन सदस्यांनीही अध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार करून हातभार लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या या आक्रमकतेमागे कृषी प्रदर्शनाच्या दीड कोटींच्या देयकाचा स्वार्थ असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. राज्यातील सत्तेत सहभागी असल्याने शिवसैनिकांना बाहेर आक्रमकतेबाबत स्वत:ला आवर घालावा लागत आहे. आपण सत्तेत आहो याचे सतत स्मरण ठेऊन शिवसैनिक स्वत:ला सावरत आहे. जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने जणू शिवसैनिकांना तेथे मोकळीक आहे. आक्रमकता दाखविण्याचे सध्या तरी हे एकमेव दालन शिवसैनिकांसाठी खुले असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारावर कुणीच फार समाधानी नाही. सत्ताधारी सदस्यांमधून कुरबुर ऐकायला मिळत आहे. रुटीन विषय आणि अधिकाऱ्यांची रुटीन उत्तरे एवढेच काय ते सुरू आहे. जिल्हा परिषदेतील विविध बैठकाही केवळ ‘खानापुरती’ ठरू लागल्या आहेत. वर्षानुवर्षे एक सारखीच उत्तरे देऊन अधिकारी वेळ मारुन नेताना दिसत आहे. एकूणच जिल्हा परिषदेत राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर कुठेच आलबेल नाही, एवढे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)