शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शिवार संवाद सभेत पालकमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

By admin | Updated: May 30, 2017 01:17 IST

‘इमेज बिल्डिंग’साठी सुरू असलेल्या भाजपाच्या शिवार संवाद सभेत ‘सरकारी मन की बात’ ऐकण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे.

बोरी अरब : तुरीच्या मोबदल्यावर निरूत्तर, दत्तक गावातच विकास कामांना खोसंतोष तांगडे । लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : ‘इमेज बिल्डिंग’साठी सुरू असलेल्या भाजपाच्या शिवार संवाद सभेत ‘सरकारी मन की बात’ ऐकण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे. पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या बोरीअरबमध्ये तर गावकऱ्यांनी चक्क त्यांची बोलती बंद केली. तुरीचे पैसे केव्हा भेटणार, असा प्रश्न वृद्ध शेतकरी महिलेने विचारल्यावर थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रसंग पालकमंत्र्यांवर ओढवला. सामान्य गावकऱ्यांनी सरकारी धोरणांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधान या ‘संवादा’त होऊ शकले नाही.येथील विठ्ठल मंदिरात रविवारी सायंकाळी ६ वाजता ही सभा झाली. सभेच्या समारोपातच वीज गेल्याने उर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच वीज टिकत नाही, तर सिंचनासाठी पूर्ण वेळ कशी मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ‘इमेज मेकिंग’साठी सरकारतर्फे हा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी शिवार संवादात उलट अनुभव येत आहे. बोरीअरब येथील सभेत ग्रामस्थांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती केली. शंकुतलाबाई राजगुरे या शेतकरी महिलेने तुरीचे पैसे केव्हा देणार, असा प्रश्न केला. याचे ठोस उत्तर नसल्याने पालकमंत्र्यांनी केवळ औपचारिकता म्हणून महिनाभरात मिळेल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पाकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या बोरीअरबमध्ये कोणतेच विकासकाम झाले नाही. येथील नदी सफाईची घोषणा अजूनही पूर्ण झाली नसल्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली. यावर पालकमंत्र्यांनी १२ लाख ५० हजारांची तरतूद केल्याचे सांगितले. गाव दत्तक घेतल्यानंतर येथे एकही काम नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. प्रश्नांचा ओघ बघताच तासाभरात ही सभा आटोपण्यात आली. सभेच्या समारोपातच वीज पुरवठा खंडीत झाला. तो रात्री पहाटेपर्यंत आलाच नाही. उजेडात आलेल्या उर्जा राज्यमंत्र्यांना वीज गेल्याने काळोखातच शिवार संवाद सभेचा निरोप घ्यावा लागला. उर्जा राज्यमंत्र्यांच्या सभेतच वीज गूल दिलीप काकडे, कोंडेश्वर खडगी यांनी विजेच्या लपंडावाने त्रस्त असल्याचे उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना सांगितले. याबाबत तक्रारी करूनही वीज कंपनीचे अधिकारी कर्मचारी दखल घेत नसल्याची व्यथा मांडली. यावर उर्जा राज्यमंत्र्यांनी तातडीने वीज कं पनीच्या अधिकाऱ्याला फोन लावला. मात्र त्याने फोनलाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी रविवार सुटीचा दिवस असल्याने अधिकारी भेटत नसल्याचे खुद्द राज्यमंत्र्यांनाच गावकऱ्यांपुढे कबुल करावे लागले. भरीस भर म्हणजे, संवाद सभा संपत असतानाच गावातील वीज गुल झाली, ती थेट पहाटेपर्यंत आलीच नाही.