शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

शिवार संवाद सभेत पालकमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

By admin | Updated: May 30, 2017 01:17 IST

‘इमेज बिल्डिंग’साठी सुरू असलेल्या भाजपाच्या शिवार संवाद सभेत ‘सरकारी मन की बात’ ऐकण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे.

बोरी अरब : तुरीच्या मोबदल्यावर निरूत्तर, दत्तक गावातच विकास कामांना खोसंतोष तांगडे । लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : ‘इमेज बिल्डिंग’साठी सुरू असलेल्या भाजपाच्या शिवार संवाद सभेत ‘सरकारी मन की बात’ ऐकण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे. पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या बोरीअरबमध्ये तर गावकऱ्यांनी चक्क त्यांची बोलती बंद केली. तुरीचे पैसे केव्हा भेटणार, असा प्रश्न वृद्ध शेतकरी महिलेने विचारल्यावर थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रसंग पालकमंत्र्यांवर ओढवला. सामान्य गावकऱ्यांनी सरकारी धोरणांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधान या ‘संवादा’त होऊ शकले नाही.येथील विठ्ठल मंदिरात रविवारी सायंकाळी ६ वाजता ही सभा झाली. सभेच्या समारोपातच वीज गेल्याने उर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच वीज टिकत नाही, तर सिंचनासाठी पूर्ण वेळ कशी मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ‘इमेज मेकिंग’साठी सरकारतर्फे हा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी शिवार संवादात उलट अनुभव येत आहे. बोरीअरब येथील सभेत ग्रामस्थांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती केली. शंकुतलाबाई राजगुरे या शेतकरी महिलेने तुरीचे पैसे केव्हा देणार, असा प्रश्न केला. याचे ठोस उत्तर नसल्याने पालकमंत्र्यांनी केवळ औपचारिकता म्हणून महिनाभरात मिळेल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पाकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या बोरीअरबमध्ये कोणतेच विकासकाम झाले नाही. येथील नदी सफाईची घोषणा अजूनही पूर्ण झाली नसल्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली. यावर पालकमंत्र्यांनी १२ लाख ५० हजारांची तरतूद केल्याचे सांगितले. गाव दत्तक घेतल्यानंतर येथे एकही काम नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. प्रश्नांचा ओघ बघताच तासाभरात ही सभा आटोपण्यात आली. सभेच्या समारोपातच वीज पुरवठा खंडीत झाला. तो रात्री पहाटेपर्यंत आलाच नाही. उजेडात आलेल्या उर्जा राज्यमंत्र्यांना वीज गेल्याने काळोखातच शिवार संवाद सभेचा निरोप घ्यावा लागला. उर्जा राज्यमंत्र्यांच्या सभेतच वीज गूल दिलीप काकडे, कोंडेश्वर खडगी यांनी विजेच्या लपंडावाने त्रस्त असल्याचे उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना सांगितले. याबाबत तक्रारी करूनही वीज कंपनीचे अधिकारी कर्मचारी दखल घेत नसल्याची व्यथा मांडली. यावर उर्जा राज्यमंत्र्यांनी तातडीने वीज कं पनीच्या अधिकाऱ्याला फोन लावला. मात्र त्याने फोनलाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी रविवार सुटीचा दिवस असल्याने अधिकारी भेटत नसल्याचे खुद्द राज्यमंत्र्यांनाच गावकऱ्यांपुढे कबुल करावे लागले. भरीस भर म्हणजे, संवाद सभा संपत असतानाच गावातील वीज गुल झाली, ती थेट पहाटेपर्यंत आलीच नाही.