शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

शिवसेना नेत्यांमधील वाद समझोत्यापलीकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:16 IST

गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभेत फटका बसणार : उघड गटबाजीने काँग्रेस, भाजपाची आयतीच सोय

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेतील सामान्य कार्यकर्तेही नाईलाजाने का होईना विभागले जाण्याची शक्यता आहे.भावना गवळी यांची खासदारकीची चौथी टर्म आहे. गेली कित्येक वर्षे त्यांनी जिल्ह्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात अथवा साथीने पक्षाचे काम केले. परंतु जिल्हा प्रमुख पदावरील नियुक्तीच्या निमित्ताने या नेत्यांमधील वाद अचानक उफाळून आला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिटला नाही. एवढेच काय खुद्द ‘मातोश्री’वर सुद्धा वाद मिटविण्याचे प्रयत्न झाले. परंतू यश आले नाही. भावना गवळींनी सूचविल्यानुसार तीन जिल्हा प्रमुखांच्या झालेल्या नियुक्त्यांमधून हा वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तर काल-परवा संजय राठोड गटाच्या युवा सेना प्रमुखाला जिल्हा प्रमुख पदावरून निष्कासित करण्यात दुसऱ्या गटाला आलेले यश पाहता नेत्यांमधील हा वाद आणखी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. रक्तदान शिबिरापासून हा वाद बराच वाढला आहे. आता तर हे नेते कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांची उपस्थिती असेल, फ्लेक्सवर फोटो असेल तरी तेथे जाणे टाळतात. यावरून या नेत्यांंमध्ये किती मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली, हे स्पष्ट होते. ही कटुता वाढविण्यास दोन्ही नेत्यांच्या अवती-भोवती वावरणारी चौकडी अधिक कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यात पक्षाचे मात्र विविध स्तरावर नुकसान होत आहे. एकसंघ असलेला शिवसैनिकही आता उघडपणे गटा-तटात विभागला जातो आहे. ११ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तेथे चर्चा होणार आहे. मात्र नेत्यांमधील या वादावर तेथे चर्चा होण्याची आणि झालीच तर त्यातून फार काही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे सेनेच्या गोटात मानले जाते.साम्राज्याला धक्के देण्याचा प्रयत्नसंजय राठोड यांच्या साम्राज्याला जणू धक्के देण्याचा निर्धारच विरोधी गटाने केल्याचे दिसून येते. आधी आपल्या सोईने तीन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या ‘मातोश्री’वरुन करून आणल्या. त्यात भावना गवळींनी आपल्या सोईचा एकच जिल्हा प्रमुख आपल्या लोकसभा मतदारसंघात ठेवला. दुसऱ्या दोघांची चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात रवानगी करण्यात यश मिळविले. आता युवा सेना प्रमुख निशाण्यावर आहे. बाभूळगावातील सेना तालुका प्रमुख आधीच बदलविण्यात आले आहे. यवतमाळचा तालुका प्रमुख विरोधी गटाच्या सोईचा आहे. या लोकसभा मतदारसंघातील अन्य ठिकाणीही भविष्यात सोईने चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारव्हा, दिग्रस, नेर या तीन तालुक्यांमध्ये मात्र विरोधी गटाकडून कोणताही हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही. त्यांना तो अधिकारही नसल्याचे सांगितले जाते. चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांमध्ये चेंजचा विरोधी गटाचा कदाचित ‘इन्टरेस्ट’ नसू शकतो.गटबाजीने सामान्य शिवसैनिक अस्वस्थसंजय राठोड व भावना गवळींमधील या वादात दोन्ही गटाचे काही निवडक समर्थक खूष दिसत असले तरी सामान्य शिवसैनिक व शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग मात्र नाराज आहे. नेत्यांच्या या भांडणात पक्षाचे नुकसान होऊ नये, ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. या नेत्यांमध्ये समेट न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची व काँग्रेस, भाजपाला आयताच फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेत्यांमधील हा वाद कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीत संजय राठोड समर्थकांची भाजपाच्या संभाव्य उमेदवाराला सहानुभूती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हीच खेळी भावना गवळींकडून दिग्रस विधानसभा निवडणुकीत खेळली जाऊ शकते.राठोड समर्थक ‘आरपार’च्या तयारीतगेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ९० हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघासाठी नवखा उमेदवार व तयारीला कोणताही वेळ मिळाला नसताना राज्यात काँग्रेसचा उमेदवार सर्वात कमी मताने येथे पराभूत झाला. अर्थात मोदी लाट नसती तर शिवसेनेला पराभवाचे निश्चितच तोंड पहावे लागले असते.यावेळी नोटाबंदी, जीएसटी, आरक्षण या कारणांमुळे काँग्रेसला पोषक वातावरण आहे. या उलट स्थिती शिवसेनेची आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे सेनेला आणखी नुकसान होऊ शकते.गेल्या विधानसभेत संजय राठोड राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले होते. यावेळी सेनेतील दुसऱ्या गटाकडून दगा-फटका झाल्यास फार तर मतांचा लिड पाच-दहा हजाराने कमी होईल, यापेक्षा जास्त नुकसान होणे नाही, असा दावा राठोड समर्थकांकडून केला जात आहे. परंतु आता ‘इसपार या उसपार’ असे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसणार असल्याचे संकेतही राठोड समर्थकांच्या चर्चेतून मिळत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना