शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांमधील वाद समझोत्यापलीकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:16 IST

गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभेत फटका बसणार : उघड गटबाजीने काँग्रेस, भाजपाची आयतीच सोय

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेतील सामान्य कार्यकर्तेही नाईलाजाने का होईना विभागले जाण्याची शक्यता आहे.भावना गवळी यांची खासदारकीची चौथी टर्म आहे. गेली कित्येक वर्षे त्यांनी जिल्ह्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात अथवा साथीने पक्षाचे काम केले. परंतु जिल्हा प्रमुख पदावरील नियुक्तीच्या निमित्ताने या नेत्यांमधील वाद अचानक उफाळून आला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिटला नाही. एवढेच काय खुद्द ‘मातोश्री’वर सुद्धा वाद मिटविण्याचे प्रयत्न झाले. परंतू यश आले नाही. भावना गवळींनी सूचविल्यानुसार तीन जिल्हा प्रमुखांच्या झालेल्या नियुक्त्यांमधून हा वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तर काल-परवा संजय राठोड गटाच्या युवा सेना प्रमुखाला जिल्हा प्रमुख पदावरून निष्कासित करण्यात दुसऱ्या गटाला आलेले यश पाहता नेत्यांमधील हा वाद आणखी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. रक्तदान शिबिरापासून हा वाद बराच वाढला आहे. आता तर हे नेते कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांची उपस्थिती असेल, फ्लेक्सवर फोटो असेल तरी तेथे जाणे टाळतात. यावरून या नेत्यांंमध्ये किती मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली, हे स्पष्ट होते. ही कटुता वाढविण्यास दोन्ही नेत्यांच्या अवती-भोवती वावरणारी चौकडी अधिक कारणीभूत असल्याचे बोलले जाते. यात पक्षाचे मात्र विविध स्तरावर नुकसान होत आहे. एकसंघ असलेला शिवसैनिकही आता उघडपणे गटा-तटात विभागला जातो आहे. ११ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तेथे चर्चा होणार आहे. मात्र नेत्यांमधील या वादावर तेथे चर्चा होण्याची आणि झालीच तर त्यातून फार काही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे सेनेच्या गोटात मानले जाते.साम्राज्याला धक्के देण्याचा प्रयत्नसंजय राठोड यांच्या साम्राज्याला जणू धक्के देण्याचा निर्धारच विरोधी गटाने केल्याचे दिसून येते. आधी आपल्या सोईने तीन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या ‘मातोश्री’वरुन करून आणल्या. त्यात भावना गवळींनी आपल्या सोईचा एकच जिल्हा प्रमुख आपल्या लोकसभा मतदारसंघात ठेवला. दुसऱ्या दोघांची चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात रवानगी करण्यात यश मिळविले. आता युवा सेना प्रमुख निशाण्यावर आहे. बाभूळगावातील सेना तालुका प्रमुख आधीच बदलविण्यात आले आहे. यवतमाळचा तालुका प्रमुख विरोधी गटाच्या सोईचा आहे. या लोकसभा मतदारसंघातील अन्य ठिकाणीही भविष्यात सोईने चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारव्हा, दिग्रस, नेर या तीन तालुक्यांमध्ये मात्र विरोधी गटाकडून कोणताही हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही. त्यांना तो अधिकारही नसल्याचे सांगितले जाते. चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांमध्ये चेंजचा विरोधी गटाचा कदाचित ‘इन्टरेस्ट’ नसू शकतो.गटबाजीने सामान्य शिवसैनिक अस्वस्थसंजय राठोड व भावना गवळींमधील या वादात दोन्ही गटाचे काही निवडक समर्थक खूष दिसत असले तरी सामान्य शिवसैनिक व शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग मात्र नाराज आहे. नेत्यांच्या या भांडणात पक्षाचे नुकसान होऊ नये, ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. या नेत्यांमध्ये समेट न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची व काँग्रेस, भाजपाला आयताच फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेत्यांमधील हा वाद कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीत संजय राठोड समर्थकांची भाजपाच्या संभाव्य उमेदवाराला सहानुभूती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हीच खेळी भावना गवळींकडून दिग्रस विधानसभा निवडणुकीत खेळली जाऊ शकते.राठोड समर्थक ‘आरपार’च्या तयारीतगेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ९० हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघासाठी नवखा उमेदवार व तयारीला कोणताही वेळ मिळाला नसताना राज्यात काँग्रेसचा उमेदवार सर्वात कमी मताने येथे पराभूत झाला. अर्थात मोदी लाट नसती तर शिवसेनेला पराभवाचे निश्चितच तोंड पहावे लागले असते.यावेळी नोटाबंदी, जीएसटी, आरक्षण या कारणांमुळे काँग्रेसला पोषक वातावरण आहे. या उलट स्थिती शिवसेनेची आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे सेनेला आणखी नुकसान होऊ शकते.गेल्या विधानसभेत संजय राठोड राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले होते. यावेळी सेनेतील दुसऱ्या गटाकडून दगा-फटका झाल्यास फार तर मतांचा लिड पाच-दहा हजाराने कमी होईल, यापेक्षा जास्त नुकसान होणे नाही, असा दावा राठोड समर्थकांकडून केला जात आहे. परंतु आता ‘इसपार या उसपार’ असे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसणार असल्याचे संकेतही राठोड समर्थकांच्या चर्चेतून मिळत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना