शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

जल हे जीवन समजून शिरोलीने केले जल व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:02 IST

जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती.

ठळक मुद्देज्योती कांबळे : सूक्ष्म नियोजनातून सोडली पाणी समस्या

विठ्ठल कांबळे ।आॅनलाईन लोकमतघाटंजी : जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती. परंतु यावरही तोडगा काढून ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या शिरोलीमध्ये पाणी व्यवस्थापन केले. सरपंच ज्योती गौतम कांबळे यांच्या या कार्याची दखल घेत लोकमतने त्यांना सरपंच अवॉर्ड देवून सन्मानित केले.अतिशय गरीब परिस्थितीतून बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योती कांबळे यांना आरक्षणामुळे गावचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्याची आवड असल्याने सरपंच म्हणून मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी पुरेपूर वापर केला. लोकचर्चा, लोकसहभाग वेळपडल्यास ग्रामसभा घेवून अनेक समस्या मार्गी लावल्या. घाटंजी तालुक्यातील तीन हजार १६९ लोकसंख्या असलेल्या शिरोली गावात अनेक दिवसांपासून पाणी समस्या होती. पाच किमी अंतरावरून गावात नळयोजनेने पाणी आणले जात होते. हा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय कमी होता. जलसंधारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने माहितीकोष तयार केला. गावातून पूर्व-पश्चिम वाहणारा नाला आहे. या नाल्यावर कृषी विभागाच्या माध्यमातून चार बंधारे साकारण्यात आले. यात एक बंधारा व तीन कोल्हापुरी बंधारे आहेत. पाणीपुरवठ्याची विहीर असलेल्या अडाण नदीवरही बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. त्यानंतर गावातील पाण्याच्या इतर स्त्रोतांचीही पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या पाच व खासगी सहा विहिरी आहेत. दहा हातपंप व एक बोअरवेल आहे. नळयोजना ही १९८१ सालची असून तिची कालमर्यादा अधिक आहे. या पाणीपुरवठा विहिरीला पाणीपातळी कमी राहात असल्याने सतत गावात टंचाई जाणवत होती. बंधाऱ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून तसेच काही भागातील लोकसहभागातून गाळाचा उपसा केल्यानंतर पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.नाल्यावर सिमेंट बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. यासाठी १६ लाख २१ हजार रुपयांचा निधी खर्च केला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या विहिरींची पाणी पातळी वाढली. परिणामी जवळच्या २५ हेक्टर शेतीत सिंचन करणे शक्य झाले. पाणीपुरवठा करून शासकीय योजनेतून चार बोअरवेल तयार केले. यालाही भरपूर पाणी आहे. जलव्यवस्थापनासोबतच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ब्लिचिंग पावडर, टीसीएल पावडर नियमित वापरण्यात येते. याकरिता जलसंरक्षकाची नेमणूक केली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनासाठी ही भरपूर काम केले आहे. गावात २३६ पथदिवे असून सौरऊर्जेवर आहेत. चार एलईडी लाईट लावण्यात आले. येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांना डिजीटल करून संगणक व प्रोजेक्टचा वापर अध्यापनासाठी केला जातो. हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधकाम केले आहे. शौचालय वापरासाठी जनजागृती सुरू आहे. प्रत्येक वॉर्डातील नाल्यांचे काम झाले असून आरोग्याच्या दृष्टीने शोषखड्डे तयार केले आहे. गावातच आरोग्य उपकेंद्र व गुरांचा दवाखानाही आहे. या माध्यमातून नियमित लसीकरण मोहीम राबविली जाते. तंटामुक्त समिती सक्रिय असून दारू बंदीकरिताही प्रयत्न केले जात आहे. महिलांकरिता मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. गावात कुºहाडबंदी व चाराबंदीच्या अभियान सुरू असून ४४३ झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. गावातील प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून १९ प्रकारचे दाखले देण्याची सुविधा आहे. मोबाईल व डिश टीव्ही रिचार्ज, रेल्वे आरक्षण, पॅनकार्ड, शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरणे, राजीव गांधी जीवनदायीचे कार्ड वाटप, धडक सिंचन योजनेचे अर्ज, आधारकार्ड, बँकेला लिंक करणे, वीज बिल भरणे, रोजगार हमीचे सर्व कामकाज, पांदण रस्ता, सिंचन विहिरी, कृषी विषयक योजनांची माहिती, शेतात सौरपंपांचा वापरसाठी प्रयोग, औषधी फवारणी मार्गदर्शन, जैविक शेती या सर्व उपक्रमांना राबविण्यात येते. गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच ज्योती गौतम कांबळे यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव, महिला मंडळ, बचत गट, नवचैतन्य बहुद्देशीय संस्था आणि ग्रामस्थ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.