शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जल हे जीवन समजून शिरोलीने केले जल व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:02 IST

जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती.

ठळक मुद्देज्योती कांबळे : सूक्ष्म नियोजनातून सोडली पाणी समस्या

विठ्ठल कांबळे ।आॅनलाईन लोकमतघाटंजी : जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती. परंतु यावरही तोडगा काढून ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या शिरोलीमध्ये पाणी व्यवस्थापन केले. सरपंच ज्योती गौतम कांबळे यांच्या या कार्याची दखल घेत लोकमतने त्यांना सरपंच अवॉर्ड देवून सन्मानित केले.अतिशय गरीब परिस्थितीतून बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योती कांबळे यांना आरक्षणामुळे गावचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्याची आवड असल्याने सरपंच म्हणून मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी पुरेपूर वापर केला. लोकचर्चा, लोकसहभाग वेळपडल्यास ग्रामसभा घेवून अनेक समस्या मार्गी लावल्या. घाटंजी तालुक्यातील तीन हजार १६९ लोकसंख्या असलेल्या शिरोली गावात अनेक दिवसांपासून पाणी समस्या होती. पाच किमी अंतरावरून गावात नळयोजनेने पाणी आणले जात होते. हा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय कमी होता. जलसंधारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने माहितीकोष तयार केला. गावातून पूर्व-पश्चिम वाहणारा नाला आहे. या नाल्यावर कृषी विभागाच्या माध्यमातून चार बंधारे साकारण्यात आले. यात एक बंधारा व तीन कोल्हापुरी बंधारे आहेत. पाणीपुरवठ्याची विहीर असलेल्या अडाण नदीवरही बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. त्यानंतर गावातील पाण्याच्या इतर स्त्रोतांचीही पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या पाच व खासगी सहा विहिरी आहेत. दहा हातपंप व एक बोअरवेल आहे. नळयोजना ही १९८१ सालची असून तिची कालमर्यादा अधिक आहे. या पाणीपुरवठा विहिरीला पाणीपातळी कमी राहात असल्याने सतत गावात टंचाई जाणवत होती. बंधाऱ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून तसेच काही भागातील लोकसहभागातून गाळाचा उपसा केल्यानंतर पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.नाल्यावर सिमेंट बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. यासाठी १६ लाख २१ हजार रुपयांचा निधी खर्च केला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या विहिरींची पाणी पातळी वाढली. परिणामी जवळच्या २५ हेक्टर शेतीत सिंचन करणे शक्य झाले. पाणीपुरवठा करून शासकीय योजनेतून चार बोअरवेल तयार केले. यालाही भरपूर पाणी आहे. जलव्यवस्थापनासोबतच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ब्लिचिंग पावडर, टीसीएल पावडर नियमित वापरण्यात येते. याकरिता जलसंरक्षकाची नेमणूक केली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनासाठी ही भरपूर काम केले आहे. गावात २३६ पथदिवे असून सौरऊर्जेवर आहेत. चार एलईडी लाईट लावण्यात आले. येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांना डिजीटल करून संगणक व प्रोजेक्टचा वापर अध्यापनासाठी केला जातो. हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधकाम केले आहे. शौचालय वापरासाठी जनजागृती सुरू आहे. प्रत्येक वॉर्डातील नाल्यांचे काम झाले असून आरोग्याच्या दृष्टीने शोषखड्डे तयार केले आहे. गावातच आरोग्य उपकेंद्र व गुरांचा दवाखानाही आहे. या माध्यमातून नियमित लसीकरण मोहीम राबविली जाते. तंटामुक्त समिती सक्रिय असून दारू बंदीकरिताही प्रयत्न केले जात आहे. महिलांकरिता मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. गावात कुºहाडबंदी व चाराबंदीच्या अभियान सुरू असून ४४३ झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. गावातील प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून १९ प्रकारचे दाखले देण्याची सुविधा आहे. मोबाईल व डिश टीव्ही रिचार्ज, रेल्वे आरक्षण, पॅनकार्ड, शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरणे, राजीव गांधी जीवनदायीचे कार्ड वाटप, धडक सिंचन योजनेचे अर्ज, आधारकार्ड, बँकेला लिंक करणे, वीज बिल भरणे, रोजगार हमीचे सर्व कामकाज, पांदण रस्ता, सिंचन विहिरी, कृषी विषयक योजनांची माहिती, शेतात सौरपंपांचा वापरसाठी प्रयोग, औषधी फवारणी मार्गदर्शन, जैविक शेती या सर्व उपक्रमांना राबविण्यात येते. गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच ज्योती गौतम कांबळे यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव, महिला मंडळ, बचत गट, नवचैतन्य बहुद्देशीय संस्था आणि ग्रामस्थ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.