शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शंकर बडेंनी वऱ्हाडी भाषेला लय दिली

By admin | Updated: September 5, 2016 00:56 IST

साहित्य क्षेत्रात यवतमाळची खास ओळख आहे. त्यात शंकर बडे यांनी महाराष्ट्राला नुसत्या वऱ्हाडी कविताच नव्हेतर वऱ्हाडी लय दिली.

यवतमाळकरांची श्रद्धांजली : चाहत्यांचा स्मृतींना उजाळायवतमाळ : साहित्य क्षेत्रात यवतमाळची खास ओळख आहे. त्यात शंकर बडे यांनी महाराष्ट्राला नुसत्या वऱ्हाडी कविताच नव्हेतर वऱ्हाडी लय दिली. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, अशा शब्दात चाहत्यांनी रविवारी ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.येथील नंदूरकर विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सामूहिक श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री नानाभाऊ एंबडवार होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कलीम खान, डॉ. प्रकाश नंदूरकर आदी उपस्थित होते. तसेच शंकर बडे यांच्या अर्धांगिनी कौसल्या, मुली कीर्ती, भारती आणि मुलगा गजानन या कुटुंबीयांसह विदर्भभरातील साहित्य, कला, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील शंकर बडे यांच्या चाहत्यांनी यावेळी आवर्जुन हजेरी लावली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की, शंकर बडे यांच्या अध्यक्षपदामुळे आर्णीचे विदर्भ साहित्य संमेलन ‘टॉप’ ठरले. ते अत्यंत शुद्ध अंतकरणाचे माणूस होते. त्यांचे साहित्य विदर्भातील सर्व ग्रंथालयांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. पांढरकवड्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात येईल, असा फोन नुकताच तेथील नगराध्यक्षांनी केल्याचेही मोघे यांनी सांगितले.माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार म्हणाले की, शंकर बडे यांच्या साहित्याने वाचकांना बरेच काही दिले आहे. हसण्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शंकर बडेंनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्रातील लाखो लोकांना हसविले आहे. तर आर्णीचे कलीम खान यांनी गजलेतून शंकर बडेंच्या जाण्याचे दु:ख मांडले.न हाथ थाम सके ना दामनबडे करीबसे कोई उठकर चला गया...या शेराने सभागृह स्तब्ध झाले. खान म्हणाले की, शंकर बडे सहज बोलायचे. पण ते जे सहज बोलायचे ते सुभाषित व्हायचे.यावेळी बडेंचे मित्र सुरेश कैपिल्यवार म्हणाले, तो यवतमाळचा हिरा होता. तो आमच्या इतका जवळचा होता की त्याचे कधी औपचारिक कौतुक करण्याचा विचारच आला नाही. पण तो अत्यंत निस्वार्थी होता. भगवंतराव जाधव म्हणाले, तो किती मोठा साहित्यिक होता हे आम्हा मित्रांना कळलेच नाही. पण त्याच्या प्रतिभेच्या कक्षा मोठ्या होत्या. ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष विजयसिंह राणे म्हणाले, आमच्या गेल्या ४० वर्षांच्या संबंधात मला त्यांच्या विलक्षण प्रतिभेचा प्रत्यय आला होता. त्यांनी जीवनात खूप संघर्ष केला. पण कधीही लबाडपणा केला नाही. तो प्रत्येक गोष्ट बारकाव्यानिशी टिपायचा. त्यांनी आपल्या जीवनातील सर्व प्रसंग जसेच्या तसे लिहावे, असा मी खूप आग्रह धरला. खूप आग्रहानंतर त्यांनी सुरुवातही केली. मात्र, दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. तब्बल अडीच तास चाललेल्या या सभेत शंकर बडेंच्या गोतावळ्याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अरुण लोणारकर यांनी शंकर बडे यांची रांगोळी, तर रवींद्र क्षीरसागर यांनी चित्र रेखाटले. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक कवठेकर यांनी केले.बोरीअरब बोरीअरब येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने कविवर्य शंकर बडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश खंडारे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दीपक कुटे, प्रा. प्रकाश तेलगोटे, प्रा. सुजाता नाईक आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)सत्तरीतला तरुण !शंकर बडे यांचे साहित्य वाचले म्हणजे ते सत्तरीचे असतील असे वाटलेच नाही, अशा भावना नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केल्या. तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले की, मतदार जागृतीसाठी आम्हाला तरुणांच्या हृदयाची स्पंदने ओळखणारा ज्येष्ठ साहित्य हवा होता. त्यावेळी आम्ही शंकर बडे काकांना हे काम सोपविले. मतदार जनजागृती अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करताना शंकर बडेंनी प्रशासनाला पुरेपुर सहकार्य केले. त्यांचा आवाहनाला तरुणाईकडूनही प्रतिसाद मिळाला.