शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

शंकर बडेंनी वऱ्हाडी भाषेला लय दिली

By admin | Updated: September 5, 2016 00:56 IST

साहित्य क्षेत्रात यवतमाळची खास ओळख आहे. त्यात शंकर बडे यांनी महाराष्ट्राला नुसत्या वऱ्हाडी कविताच नव्हेतर वऱ्हाडी लय दिली.

यवतमाळकरांची श्रद्धांजली : चाहत्यांचा स्मृतींना उजाळायवतमाळ : साहित्य क्षेत्रात यवतमाळची खास ओळख आहे. त्यात शंकर बडे यांनी महाराष्ट्राला नुसत्या वऱ्हाडी कविताच नव्हेतर वऱ्हाडी लय दिली. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, अशा शब्दात चाहत्यांनी रविवारी ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.येथील नंदूरकर विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सामूहिक श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री नानाभाऊ एंबडवार होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कलीम खान, डॉ. प्रकाश नंदूरकर आदी उपस्थित होते. तसेच शंकर बडे यांच्या अर्धांगिनी कौसल्या, मुली कीर्ती, भारती आणि मुलगा गजानन या कुटुंबीयांसह विदर्भभरातील साहित्य, कला, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील शंकर बडे यांच्या चाहत्यांनी यावेळी आवर्जुन हजेरी लावली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की, शंकर बडे यांच्या अध्यक्षपदामुळे आर्णीचे विदर्भ साहित्य संमेलन ‘टॉप’ ठरले. ते अत्यंत शुद्ध अंतकरणाचे माणूस होते. त्यांचे साहित्य विदर्भातील सर्व ग्रंथालयांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. पांढरकवड्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात येईल, असा फोन नुकताच तेथील नगराध्यक्षांनी केल्याचेही मोघे यांनी सांगितले.माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार म्हणाले की, शंकर बडे यांच्या साहित्याने वाचकांना बरेच काही दिले आहे. हसण्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शंकर बडेंनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्रातील लाखो लोकांना हसविले आहे. तर आर्णीचे कलीम खान यांनी गजलेतून शंकर बडेंच्या जाण्याचे दु:ख मांडले.न हाथ थाम सके ना दामनबडे करीबसे कोई उठकर चला गया...या शेराने सभागृह स्तब्ध झाले. खान म्हणाले की, शंकर बडे सहज बोलायचे. पण ते जे सहज बोलायचे ते सुभाषित व्हायचे.यावेळी बडेंचे मित्र सुरेश कैपिल्यवार म्हणाले, तो यवतमाळचा हिरा होता. तो आमच्या इतका जवळचा होता की त्याचे कधी औपचारिक कौतुक करण्याचा विचारच आला नाही. पण तो अत्यंत निस्वार्थी होता. भगवंतराव जाधव म्हणाले, तो किती मोठा साहित्यिक होता हे आम्हा मित्रांना कळलेच नाही. पण त्याच्या प्रतिभेच्या कक्षा मोठ्या होत्या. ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष विजयसिंह राणे म्हणाले, आमच्या गेल्या ४० वर्षांच्या संबंधात मला त्यांच्या विलक्षण प्रतिभेचा प्रत्यय आला होता. त्यांनी जीवनात खूप संघर्ष केला. पण कधीही लबाडपणा केला नाही. तो प्रत्येक गोष्ट बारकाव्यानिशी टिपायचा. त्यांनी आपल्या जीवनातील सर्व प्रसंग जसेच्या तसे लिहावे, असा मी खूप आग्रह धरला. खूप आग्रहानंतर त्यांनी सुरुवातही केली. मात्र, दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. तब्बल अडीच तास चाललेल्या या सभेत शंकर बडेंच्या गोतावळ्याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अरुण लोणारकर यांनी शंकर बडे यांची रांगोळी, तर रवींद्र क्षीरसागर यांनी चित्र रेखाटले. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक कवठेकर यांनी केले.बोरीअरब बोरीअरब येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने कविवर्य शंकर बडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश खंडारे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दीपक कुटे, प्रा. प्रकाश तेलगोटे, प्रा. सुजाता नाईक आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)सत्तरीतला तरुण !शंकर बडे यांचे साहित्य वाचले म्हणजे ते सत्तरीचे असतील असे वाटलेच नाही, अशा भावना नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केल्या. तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले की, मतदार जागृतीसाठी आम्हाला तरुणांच्या हृदयाची स्पंदने ओळखणारा ज्येष्ठ साहित्य हवा होता. त्यावेळी आम्ही शंकर बडे काकांना हे काम सोपविले. मतदार जनजागृती अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करताना शंकर बडेंनी प्रशासनाला पुरेपुर सहकार्य केले. त्यांचा आवाहनाला तरुणाईकडूनही प्रतिसाद मिळाला.