शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

शाळेतील अग्नीशमन संयंत्रे बनली शाभेची वास्तू

By admin | Updated: August 7, 2016 01:16 IST

शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या सर्व शाळांना पुरविलेले अग्नीशमन यंत्रणे रिफिलींग न केल्याने शाभेच्या वास्तू बनल्या आहेत.

लाखो रूपये व्यर्थ : गेल्या चार वर्षांपासून सिलींडरचे रिफिलिंग झालेच नाही मारेगाव : शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या सर्व शाळांना पुरविलेले अग्नीशमन यंत्रणे रिफिलींग न केल्याने शाभेच्या वास्तू बनल्या आहेत. काही शाळांनी तर सदर यंत्रणे अडगळीच्या खोलीत टाकून दिले आहेत. कर्नाटकमधील एका शाळेतील कार्यक्रमात पेन्डालला लागलेल्या आगीत काही विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचा धसका घेऊन शिक्षण विभागाने २००५ व २००८ मध्ये सर्व शिक्षा योजनेतून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या सर्व शाळांना अग्नीशमन संयंत्रे घ्यायला लावली होती. तालुक्यातील लहान-मोठ्या सर्व शाळांनी युनिव्हर्सल इंजिनिअरींग कार्पोरेशन घाटकोपर मुंबई बनावटीची संयंत्रे खरेदी केली. त्यावेळी सर्व संयंत्रे शाळेच्या खोलीच्या भिंतीला लटकवून ठेवली. त्याचा वापर केव्हा, कसा करावा, कोणती खबरदारी घ्यावी, रिफीलिंग केव्हा करावे, याचे प्रशिक्षणसुद्धा सर्व शिक्षकांना देण्यात आले नसल्याचे समजते. भिंतीला असलेले लाल रंगाचे बंब कशाचे आहे, हे अद्याप विद्यार्थ्यांना माहिती नसून रिफीलींगबाबत शिक्षकसुद्धा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर २०१२ मध्ये ढोलणे नामक गटशिक्षणाधिकारी या पंचायत समितीमध्ये असताना प्रत्येकी ३०० ते ५०० रूपये खर्च आकारून यवतमाळच्या एका कंपनीमार्फत सर्व शाळांचे रि-रिफिलींग करून घेण्यात आले होते. तेव्हापासून चार वर्षाचा काळ लोटूनसुद्धा सिलींडर रिफिलींग केले नसल्याने सर्व अग्नीशमन यंत्रे कुचकामी ठरले असून केवळ भिंतीची शोभा वाढवित आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी यावर विचार करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)