शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पंच्याहत्तरीपार आजी-आजोबांनी दिली परीक्षा; यवतमाळच्या रामपुरे दाम्पत्याची खास कहाणी

By अविनाश साबापुरे | Updated: March 18, 2024 13:56 IST

७५ वर्षे वयाचे मणिराम रामपुरे आणि सखुबाई रामपुरे या दाम्पत्याने कार्ली येथे नवभारत साक्षरता अभियानाची परीक्षा दिली.

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: अर्धे वय उलटून गेले... शेतमजुरी करता-करता पाटीपुस्तकांशी नातेच तुटले... पण एवढे दिवस अज्ञानाचा अंधकार सोसल्यानंतरही मनात शिकण्याची ऊर्मी कायमच होती... नेमकी हीच ऊर्मी घेऊन रविवारी हजारो बाया-बापड्यांनी शाळेत हजेरी लावली अन् तीन तास एकाच जागी स्थिर बसून परीक्षा दिली. पंच्याहत्तरी ओलांडलेल्या असाक्षरांनी परीक्षेतून आनंद घेतला.

केंद्राच्या नव भारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केव्हाही या अन् परीक्षा द्या, अशी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक खेड्यातले नोंदणीकृत निरक्षर सकाळीच वावरात गेले. दुपारी जेवण आटोपून परीक्षेला आले. प्रौढ परीक्षार्थी अगदी मन लावून, मग्न होऊन प्रश्नपत्रिका सोडविताना दिसून आले. आता १५० पैकी ५१ म्हणजेच किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या निरक्षर प्रौढांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कारागृहातही परीक्षेची सोय... घरातूनही पेपर!

ज्या जिल्ह्यात कारागृहातील प्रौढ व्यक्तीची उल्लास ॲपवर नोंदणी झालेली आहे, त्याच्यासाठी कारागृह प्रमुखांमार्फत माहिती घेऊन कारागृहातच परीक्षा केंद्र देण्याची सूचना योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी केली होती, तर शारीरिकदृष्ट्या अक्षम, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी त्यांच्या घरी किंवा दवाखान्यातच पेपर सोडविण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आली होती.

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षण