शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंच्याहत्तरीपार आजी-आजोबांनी दिली परीक्षा; यवतमाळच्या रामपुरे दाम्पत्याची खास कहाणी

By अविनाश साबापुरे | Updated: March 18, 2024 13:56 IST

७५ वर्षे वयाचे मणिराम रामपुरे आणि सखुबाई रामपुरे या दाम्पत्याने कार्ली येथे नवभारत साक्षरता अभियानाची परीक्षा दिली.

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: अर्धे वय उलटून गेले... शेतमजुरी करता-करता पाटीपुस्तकांशी नातेच तुटले... पण एवढे दिवस अज्ञानाचा अंधकार सोसल्यानंतरही मनात शिकण्याची ऊर्मी कायमच होती... नेमकी हीच ऊर्मी घेऊन रविवारी हजारो बाया-बापड्यांनी शाळेत हजेरी लावली अन् तीन तास एकाच जागी स्थिर बसून परीक्षा दिली. पंच्याहत्तरी ओलांडलेल्या असाक्षरांनी परीक्षेतून आनंद घेतला.

केंद्राच्या नव भारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केव्हाही या अन् परीक्षा द्या, अशी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक खेड्यातले नोंदणीकृत निरक्षर सकाळीच वावरात गेले. दुपारी जेवण आटोपून परीक्षेला आले. प्रौढ परीक्षार्थी अगदी मन लावून, मग्न होऊन प्रश्नपत्रिका सोडविताना दिसून आले. आता १५० पैकी ५१ म्हणजेच किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या निरक्षर प्रौढांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कारागृहातही परीक्षेची सोय... घरातूनही पेपर!

ज्या जिल्ह्यात कारागृहातील प्रौढ व्यक्तीची उल्लास ॲपवर नोंदणी झालेली आहे, त्याच्यासाठी कारागृह प्रमुखांमार्फत माहिती घेऊन कारागृहातच परीक्षा केंद्र देण्याची सूचना योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी केली होती, तर शारीरिकदृष्ट्या अक्षम, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी त्यांच्या घरी किंवा दवाखान्यातच पेपर सोडविण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आली होती.

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षण