शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

शासकीय कामांसाठी सात घाट राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे परतत असलेल्या मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर यांना देवसरी ते विडूळ रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पुलाजवळ घडली.  टिप्पर  चालकाला महसूल विभागाचे वाहन मागावर  येत असल्याची खबर मिळाल्याने त्याने मुख्य रस्ता सोडून डाव्या कालव्याच्या रस्त्याने टिप्पर टाकला. त्यात हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार ज्या रेती घाटांचा लिलाव होणार नाही अशा स्वरूपाचे रेती घाट शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना आहेत.  त्यानुसार जिल्ह्यात सात रेतीघाट शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे शासकीय बांधकामांना गती मिळणार असली तरी जिल्ह्यात रेतीअभावी घरकुलाची हजारो कामे रखडल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल सुरू आहे.  जिल्ह्यात सात रेती घाट लिलाव प्रक्रियेतून विकल्या गेले नाही. अशा रेत घाटांना आता शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवले आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातील सौजना, बेंबळा प्रकल्पातील वाटखेड, राळेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातील धर्मापूर, कळंब तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातील औरंगपूर, उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातील चालगणी, झरी जामणी तालुक्यातील पैनगंगा पात्रातील हिरापूर, आर्णी तालुक्यातील अडाण पात्रामध्ये येणाऱ्या आयता रेती घाटाला आरक्षित ठेवण्यात आले आहे. या रेती घाटाचे शासकीय मूल्य दोन कोटी २१ लाख ३४ हजार ६०० रुपये आहे. या ठिकाणी ३६ हजार ८९१ ब्रास रेती शिल्लक आहे.  

 घरकूल बांधताना सर्वसामान्यांची मात्र दमछाक - गतवर्षी घरकुलाच्या बांधकामामध्ये जनसामान्याला आधार मिळावा म्हणून रेती घाटातून रेती देण्यासंदर्भात निर्णय झाला होता. यावर्षी देखील रेती घाटामधून लाभार्थ्यांना रेती मिळाली तर घरकूल बांधताना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. रेती भाव आकाशाला भिडल्याने मोफत रेती मिळाली तर घरकूलधारकांचे घर बांधणे सोपे होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन तशी तरतूद करण्याची आवश्यकता आहे. तरच आरक्षित रेतीघाट घरकूलधारकांना  मोलाची मदत करणारे ठरतील.

तस्करीने घेतला शेतकऱ्याचा बळी

उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे परतत असलेल्या मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर यांना देवसरी ते विडूळ रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पुलाजवळ घडली. गावापासून ३०० मीटरवर ही घटना घडल्यामुळे काही क्षणातच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. धडक दिल्याबरोबर चालक टिप्पर रस्त्यावर सोडून फरार झाला.  अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे, उपनिरीक्षक प्रशांत देशमुख फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरखेडच्या सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भादंवि २७९/४अ, १३४, १७७ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

कर्मचाऱ्यांनीच टीप दिल्याचा आरोप- टिप्पर  चालकाला महसूल विभागाचे वाहन मागावर  येत असल्याची खबर मिळाल्याने त्याने मुख्य रस्ता सोडून डाव्या कालव्याच्या रस्त्याने टिप्पर टाकला. त्यात हा अपघात घडला.   काही महसूल कर्मचारीच अवैध वाहतूक करणाऱ्यांना टीप देत असल्याने अशा कर्मचाऱ्यांवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विडूळ ग्रामस्थांनी केली आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी