शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साडेसात हजार खोट्या ‘व्हॅलिडिटी’ अडीच वर्षांपासून दडवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 14:19 IST

ज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.औरंगाबादच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा हा भंडाफोड खुद्द आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांनी केला. आयुक्तांच्या या तपास अहवालावर अडीच वर्षे लोटूनही शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कारवाई केलेली नाही.

अविनाश साबापुरे

यवतमाळ : ज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा हा भंडाफोड खुद्द आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांनी केला. मात्र, आयुक्तांच्या या तपास अहवालावर अडीच वर्षे लोटूनही शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष. 

पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन आयुक्त एस. एम. सरकुंडे यांनी औरंगाबाद जातवैधता तपासणी समितीची चौकशी केली होती. ६ सप्टेंबर २०१० ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत औरंगाबाद समितीचे तत्कालीन सहआयुक्त पाटील यांनी तब्बल ७ हजार ५४५ बनावट वैधता प्रमाणपत्र वाटल्याचा गंभीर निष्कर्ष सरकुंडे यांनी आपल्या अहवालात नमूद केला. सरकुंडे यांनी हा तपास अहवाल ८ मार्च २०१६ रोजी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना सादर केला.

या अहवालात नमूद आहे की, औरंगाबाद समिती महिन्याला एक हजार बनावट वैधता प्रमाणपत्र वाटत होती. याकरिता तत्कालीन सहआयुक्तांनी घरीच कार्यालय थाटले होते. ३ ते ४ लाख रुपये घेऊन वैधता प्रमाणपत्र देत होते. यात पोलीस दक्षता पथकाचा सिंहाचा वाटा असून पोलीस कर्मचारी व कार्यालयातील कर्मचारी महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाख व अधिकारी २५ लाखापर्यंत कमाई करीत होते. त्यामुळे या प्रकरणात कमीत कमी १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.अहवालात या होत्या शिफारशी

बनावट शिक्के बनवून रेकार्ड तयार करणे, बोगस कागदपत्रे, बनावट गृहचौकशी अहवाल, उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाकारलेली अपिले मान्य करणे, तक्रारदाराने सबळ पुरावे देऊनही बनावट पुराव्याच्या आधारे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. संबंधित ७,५४५ जातवैधता प्रकरणांचे तत्काळ पुनर्विलोकन करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी. अर्जदारांना पुन्हा वैधता प्रमाणपत्र निर्गमित होईपर्यंत त्यांच्या प्रमाणपत्रावर निर्बंध आणावे. संबंधित कालावधीत औरंगाबाद समिती कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस दक्षता पथकातील अधिकारी कर्मचाºयांसह सामायिक विभागीय चौकशी करावी. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्याचे शासनाने कडक कारवाई करावी आदी शिफारशी तत्कालीन आयुक्तांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. आज अडीच वर्ष लोटून गेले तरी अहवालावर आदिवासी विकास विभाग मूग गिळून बसला आहे. दोषींवर तत्काळ कारवाई करून जेरबंद करावे.

- दशरथ मडावी,  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांतिदल

टॅग्स :Yavatmalयवतमाळ