शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

साडेसात हजार खोट्या ‘व्हॅलिडिटी’ अडीच वर्षांपासून दडवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 14:19 IST

ज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.औरंगाबादच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा हा भंडाफोड खुद्द आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांनी केला. आयुक्तांच्या या तपास अहवालावर अडीच वर्षे लोटूनही शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कारवाई केलेली नाही.

अविनाश साबापुरे

यवतमाळ : ज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा हा भंडाफोड खुद्द आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांनी केला. मात्र, आयुक्तांच्या या तपास अहवालावर अडीच वर्षे लोटूनही शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष. 

पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन आयुक्त एस. एम. सरकुंडे यांनी औरंगाबाद जातवैधता तपासणी समितीची चौकशी केली होती. ६ सप्टेंबर २०१० ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत औरंगाबाद समितीचे तत्कालीन सहआयुक्त पाटील यांनी तब्बल ७ हजार ५४५ बनावट वैधता प्रमाणपत्र वाटल्याचा गंभीर निष्कर्ष सरकुंडे यांनी आपल्या अहवालात नमूद केला. सरकुंडे यांनी हा तपास अहवाल ८ मार्च २०१६ रोजी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना सादर केला.

या अहवालात नमूद आहे की, औरंगाबाद समिती महिन्याला एक हजार बनावट वैधता प्रमाणपत्र वाटत होती. याकरिता तत्कालीन सहआयुक्तांनी घरीच कार्यालय थाटले होते. ३ ते ४ लाख रुपये घेऊन वैधता प्रमाणपत्र देत होते. यात पोलीस दक्षता पथकाचा सिंहाचा वाटा असून पोलीस कर्मचारी व कार्यालयातील कर्मचारी महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाख व अधिकारी २५ लाखापर्यंत कमाई करीत होते. त्यामुळे या प्रकरणात कमीत कमी १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.अहवालात या होत्या शिफारशी

बनावट शिक्के बनवून रेकार्ड तयार करणे, बोगस कागदपत्रे, बनावट गृहचौकशी अहवाल, उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाकारलेली अपिले मान्य करणे, तक्रारदाराने सबळ पुरावे देऊनही बनावट पुराव्याच्या आधारे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. संबंधित ७,५४५ जातवैधता प्रकरणांचे तत्काळ पुनर्विलोकन करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी. अर्जदारांना पुन्हा वैधता प्रमाणपत्र निर्गमित होईपर्यंत त्यांच्या प्रमाणपत्रावर निर्बंध आणावे. संबंधित कालावधीत औरंगाबाद समिती कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस दक्षता पथकातील अधिकारी कर्मचाºयांसह सामायिक विभागीय चौकशी करावी. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्याचे शासनाने कडक कारवाई करावी आदी शिफारशी तत्कालीन आयुक्तांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. आज अडीच वर्ष लोटून गेले तरी अहवालावर आदिवासी विकास विभाग मूग गिळून बसला आहे. दोषींवर तत्काळ कारवाई करून जेरबंद करावे.

- दशरथ मडावी,  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांतिदल

टॅग्स :Yavatmalयवतमाळ