शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

साडेसात हजार खोट्या ‘व्हॅलिडिटी’ अडीच वर्षांपासून दडवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 14:19 IST

ज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.औरंगाबादच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा हा भंडाफोड खुद्द आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांनी केला. आयुक्तांच्या या तपास अहवालावर अडीच वर्षे लोटूनही शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कारवाई केलेली नाही.

अविनाश साबापुरे

यवतमाळ : ज्यांच्याकडे जातवैधता तपासण्याची जबाबदारी आहे, त्या समितीनेच तब्बल ७ हजार ५४५ बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ वाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा हा भंडाफोड खुद्द आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांनी केला. मात्र, आयुक्तांच्या या तपास अहवालावर अडीच वर्षे लोटूनही शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष. 

पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन आयुक्त एस. एम. सरकुंडे यांनी औरंगाबाद जातवैधता तपासणी समितीची चौकशी केली होती. ६ सप्टेंबर २०१० ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत औरंगाबाद समितीचे तत्कालीन सहआयुक्त पाटील यांनी तब्बल ७ हजार ५४५ बनावट वैधता प्रमाणपत्र वाटल्याचा गंभीर निष्कर्ष सरकुंडे यांनी आपल्या अहवालात नमूद केला. सरकुंडे यांनी हा तपास अहवाल ८ मार्च २०१६ रोजी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना सादर केला.

या अहवालात नमूद आहे की, औरंगाबाद समिती महिन्याला एक हजार बनावट वैधता प्रमाणपत्र वाटत होती. याकरिता तत्कालीन सहआयुक्तांनी घरीच कार्यालय थाटले होते. ३ ते ४ लाख रुपये घेऊन वैधता प्रमाणपत्र देत होते. यात पोलीस दक्षता पथकाचा सिंहाचा वाटा असून पोलीस कर्मचारी व कार्यालयातील कर्मचारी महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाख व अधिकारी २५ लाखापर्यंत कमाई करीत होते. त्यामुळे या प्रकरणात कमीत कमी १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.अहवालात या होत्या शिफारशी

बनावट शिक्के बनवून रेकार्ड तयार करणे, बोगस कागदपत्रे, बनावट गृहचौकशी अहवाल, उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाकारलेली अपिले मान्य करणे, तक्रारदाराने सबळ पुरावे देऊनही बनावट पुराव्याच्या आधारे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. संबंधित ७,५४५ जातवैधता प्रकरणांचे तत्काळ पुनर्विलोकन करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी. अर्जदारांना पुन्हा वैधता प्रमाणपत्र निर्गमित होईपर्यंत त्यांच्या प्रमाणपत्रावर निर्बंध आणावे. संबंधित कालावधीत औरंगाबाद समिती कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस दक्षता पथकातील अधिकारी कर्मचाºयांसह सामायिक विभागीय चौकशी करावी. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्याचे शासनाने कडक कारवाई करावी आदी शिफारशी तत्कालीन आयुक्तांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. आज अडीच वर्ष लोटून गेले तरी अहवालावर आदिवासी विकास विभाग मूग गिळून बसला आहे. दोषींवर तत्काळ कारवाई करून जेरबंद करावे.

- दशरथ मडावी,  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांतिदल

टॅग्स :Yavatmalयवतमाळ