निवेदन : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आंदोलन यवतमाळ : ब्राह्मण समाजातील बरोजगार युवा वर्गाला व्यवसाय उतरण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशा मागणी महासंघातर्फे करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महासंघातर्फे राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले. यवतमाळ येथेदेखील हे आंदोलन करण्यात येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. स्वतंत्र विकास महामंडळासोबतच मौलवींप्रमाणे पुरोहितांनासुद्धा मासिक पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, पुस्तके व जाहीर सभांमधून ब्राह्मण समाजावरील शिवीगाळ रोखण्यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश एट्रोसिटी कायद्यात करावा आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. यापूर्वी वारंवार पाठपुरावा करूनदेखील मागण्यांची पूर्तता न झाल्याने हे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे केंद्रीय सचिव किेशोर पाठक, राज्य उपाध्यक्ष किेशोर पाठक, राज्य उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, जिल्हा संघटक राम साकळे, पुरोहित आघाडीचे संयोजक प्रमोद औदार्य, रामजीलाल शर्मा, पंडित शाम शर्मा, अरुण भुरचंडी, गोविंद शर्मा, मनोज औदार्य, उत्पल टोंगो, मनीश पांडे, परिक्षित शर्मा, राजेश जकाते, शैलेश तिवारी, कीर्ती तिवारी, पूजा महाजन, मुग्धा देशपांडे, अजीत जवळकर आदींसह असंख्य समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे
By admin | Updated: August 14, 2015 02:44 IST