शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

१३९ कोटी खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा

By admin | Updated: May 28, 2016 02:21 IST

जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनेसाठी प्राप्त निधींचा खर्च कसा करावा

विकासाची दिशा : १० नगरपरिषदा व ६ नगरपंचायतींना सूचना सुरेंद्र राऊत यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि सहा नगरपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनेसाठी प्राप्त निधींचा खर्च कसा करावा याची मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तब्बल १३८ कोटी ८४ लाखांच्या खर्चाबाबत प्राधान्यक्रम कसा घ्यावा याचे निर्देश दिले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून नगरविकासाच्या महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जातात. या योजनांचा निधी शहर विकासासाठी योग्य पद्धतीने खर्च व्हावा यासाठी प्रत्येक योजनानिहाय निधी खर्चाचे निकष ठरविण्यात आले आहे. दलित वस्ती योजना, आदिवासी वस्ती योजना, रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, केंद्र सरकारचे अमृत अभियान, राज्य शासनाचे अमृत अभियान, रस्त्यासाठी विशेष अनुदान, हद्दवाढ अनुदान, नगरोत्थान अभियानाचा निधी या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी नगरपरिषद-नगरपंचायतींना पुरविण्यात येतो. निधीतून कुठली कामे घ्यावी याचा प्राधान्यक्रम ठरविण्यावरून पालिकास्तरावर अनेक वाद होतात. बऱ्याचदा ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली जाते. यामुळे निर्धारित वेळेत हा निधी खर्च करता येत नाही, परिणामी विकासाची प्रक्रिया मंदावते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी वरील योजनांचा निधी कोणत्या पद्धतीने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून खर्च करावा, हे स्पष्ट करणारे पत्र त्या नगरपरिषद नगराध्यक्षांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. या पत्राच्या आधारावर कायद्याच्या चौकटीत राहून विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे सहज शक्य आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या निधीतून विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. आर्थिक वर्षात असा मिळाला निधीयवतमाळ नगरपरिषदेकडे ५३ कोटी ६६ लाख रुपये निधी आहे. वणी नगरपरिषदेकडे ३ कोटी ५६ लाख, पुसद नगर परिषदेकडे २ कोटी ९५ लाख, दिग्रस नगरपरिषदेला १२ कोटी ७९ लाख, दारव्हा नगर परिषदेला ११ कोटी ९९ लाख, पांढरकवडा नगरपरिषदेला ६ कोटी ७८ लाख, उमरखेड नगरपरिषदेला सात कोटी, घाटंजी नगरपरिषदेला ३ कोटी ८७ लाख, नेरनबाबपूर नगर परिषदेला १५ कोटी ७१ लाख, आर्णी नगर परिषदेला एक कोटी, मारेगाव नगरपंचायतीला २० लाख, झरीजामणी नगरपंचायतीला ३ कोटी २० लाख, महागाव नगरपंचायतीला ५ कोटी २० लाख, बाभूळगाव नगरपंचायतीला २ कोटी २० लाख, कळंब नगरपंचायतीला ५ कोटी २० लाख, राळेगाव नगरपंचायतीला ३ कोटी २० लाख असा निधी २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झाला होता.