शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ंकृषी संचालकांचा शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: July 8, 2015 00:08 IST

कृषी सप्ताहादरम्यान अमरावती विभागीय दौऱ्याच्या माध्यमातून कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

कृषी सप्ताह : पीक पद्धती, शासकीय योजनांची थेट माहितीदारव्हा : कृषी सप्ताहादरम्यान अमरावती विभागीय दौऱ्याच्या माध्यमातून कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तालुक्यातील शेतकरी गट प्रमुख, शेतकरी मित्रांना विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनापासून राज्यात कृषी विभागामार्फत कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून राज्याचे कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक के.व्ही. देशमुख यांनी दौऱ्यात दारव्हा कृषीविभागाच्या कार्यालयात शेतकरी मित्र, शेतकरी गटाचे प्रमुख यांना मार्गदर्शन केले. यात कृषी विस्तारात शेतकरी मित्राचे महत्व, शेतकरी गटांनी मिळून उत्पादक कंपनी तयार करणे, गटांचे बळकटीकरण करणे आदींबाबत विस्तृत माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रश्नांना यथोचित उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पुरूषोत्तम अनगाईत, आत्मा समिती अध्यक्ष विवेक ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जीवन जाधव, कृषी पर्यवेक्षक बबन इंझाळकर, शेतकरी मित्र बबनराव हागे, पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रीराम ठाकरे, शाम गावंडे, प्रवीण गायकी, जनुसिंग राठोड, संतोष ढोके व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाच्या योजना शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांना माहितीच होत नाही. केवळ अनुदान लाटणारे पुढारीच या योजनांचा लाभ घेतात. खऱ्या अर्थाने गरजुंपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. (प्रतिनिधी)