शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

औद्योगिक भूखंडांवर तीन महिन्यांत जप्ती

By admin | Updated: January 10, 2017 01:15 IST

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतींमधील नियमबाह्य भूखंडांवर आता शासनाने पाश

नियमबाह्य ताबा : शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर होईल कारवाई सुहास सुपासे ल्ल यवतमाळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतींमधील नियमबाह्य भूखंडांवर आता शासनाने पाश आवळला आहे, जिल्ह्यात ज्या लोकांनी एमआयडीसीमधील भूखंड नियमबाह्यरित्या ताब्यात ठेवले आहे, असे भूखंड ३१ मार्च २०१७ पर्यंत जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी कडून करण्यात येणार आहे. उद्योग संजीवनी योजनेअंतर्गत सर्व औद्योगिक क्षेत्रातील ज्यांचा विकास कालावधी संपला आहे व बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ज्यांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झालेले नाही तसेच ज्या भूखंडांवर अर्धवट बांधकाम आहे, असे सर्व प्रकारचे भूखंडांवर जप्तीची कारवाई येत्या तीन महिन्यात होणार आहे. तसेच ज्या भूखंडधारकांनी शासनाची दिशाभूल करून उद्योगावीना नियमबाह्यरित्या भूखंड ताब्यात ठेवले आहेत आणि जे भूखंडधारक जप्ती वा इतर विविध प्रक्रियांमध्ये शासनाला सहकार्य करीत नाहीत, असे भूखंडसुद्धा जप्ती करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय काही लोकांनी गरज नसताना अवाजवी भूखंड घेतले आहेत. जास्तीची जागा बळकावून ठेवली आहे. ज्यांचा उद्योग केवळ एक एकरमध्ये सुरू आहे, अशा उद्योगांनी तीन ते चार एकर जागा बळकावून ठेवली आहे. अशा जागांचाही एमआयडीसी आता शोध घेत असून हे रिकामे भूखंड परत घेतले जाणार आहेत. त्यामुळे यापुढे उद्योगासाठी आवश्यक तितकीच जागा उद्योगांनी घेणे अपेक्षित आहे, जेणेकरून इतर इच्छुक उद्योजकांनाही एमआयडीसीत जागा मिळू शकेल, हा त्या मागील हेतू आहे. २०१६ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध एमआयडीसीमधील ७० भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. आता नव्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात ६२ भूखंड या कारवाईच्या कक्षेत आहेत. त्यामुळे सबंधितांनी याबाबतची माहिती त्वरित एमआयडीसी कार्यालयाला स्वत:हून देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. एकीकडे अनेकांनी कारण नसताना एमआयडीसीमधील भूखंड ताब्यात ठेवले ओहत, तर दुसरीकडे ज्यांना गरज आहे, त्यांना भूखंड उपलब्ध नाहीत. आर्णी येथे १७३ हेक्टर क्षेत्रात थाटणार एमआयडीसी ४जिल्ह्यातील आर्णी येथे एमआयडीसी होणार असून त्यासाठी १७३ हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. येत्या दोन तीन महिन्यात ही जागा एमआयडीसीच्या ताब्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येतील. येथील एमआयडीसीचा संपूर्ण विकास करून उद्योजकांना प्रत्यक्ष भूखंड उपलब्ध होण्यास तीन ते चार वर्ष लागतील, असा अंदाज एमआयडीसीच्या सूत्रांनी व्यक्त केला. या शिवाय जिल्ह्यात नेर आणि पांढरकवडा येथेही एमआयडीसी प्रस्तावित आहे.