यवतमाळ : बहुद्देशीय पंचशील शिक्षण संस्थेच्यावतीने अंध, अपंग आंतरजातीय सर्वधर्मिय, बौद्ध, आदिवासी विवाह मेळावा शुक्रवारी येथील जिल्हा परिषदेच्या बचत भव्नात पार पडला. या विवाह मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शासकीय वेठबिगार दक्षता समितीचे सदस्य तथा प्रख्यात साहित्यिक बाबारावजी मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उमरी पठार वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे, मिलिंद रामटेके, माजी नगरसेवक सुनंदा मडावी, पंजाब चव्हाण, माधुरी आंजीकर, वासुदेव कुंडेकार, मनिराम शहागड, कृष्णानंद परिपगार, आदिवासी विभागाचे चरडे आदींची उपस्थिती होती. आपल्या उद्घाटनपर भाषणात बाळासाहेब मांगुळकर यांनी या सोहळ्याचे कौतुक केले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शासनाच्या विवाह योजनेचा फायदा दारिद्र्यरेषेखालील समाजबांधवांनी घ्यावा, कर्जबाजारी होवून विवाह न करता शेतकरी व मजूर बांधवांनी या शासकीय योजनेतून होणाऱ्या सामूहिक विवाह मेळाव्यात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बाबाराव मडावी यांनी सामूहिक विवाह मेळाव्याचे महत्त्व सांगून आदर्श कुटुंब पद्धतीवर प्रकाश टाकला. यावेळी इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. मेळाव्यासाठी दादाराव पाझारे, राजू सहारे, प्रकाश घोटेकार, मारोती कांबळे, विशाल पाझारे, संघपाल पाझारे, प्रशांत पाझारे, संदीप पावडे, वैभव टेकाम, सत्या शेंद्रे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
सर्वधर्मिय सामूहिक विवाह मेळावा
By admin | Updated: July 20, 2015 02:28 IST