शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात ७२ टक्के

By admin | Updated: February 22, 2017 01:12 IST

जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी मंगळवारी ७२.८६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

९९ उमेदवार : गुरूवारी होणार फैसला, ग्रामीण भागात निकालाची उत्सुकता यवतमाळ : जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी मंगळवारी ७२.८६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा गुरूवारी फैसला होईल. दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी मारेगाव तालुक्यातील कुंभा-मार्डी, वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, आर्णीतील देऊरवाडी-सुकळी, नेरमधील वटफळी-अडगाव, दारव्हातील लाडखेड-वडगाव आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी गटांसह १२ गणांसाठी मतदान घेण्यात आले. या सहा गटांमध्ये ३४ उमेदवार रिंगणात होते. पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ६५ उमेदवार होते. या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. कुंभा-मार्डी गटात ७५.५७ टक्के, वटफळी-अडगाव ७०.०६, लाडखेड-वडगाव ७०.१५, घोन्सा-कायर ७६.३४, विडूळ-चातारी ७३.९४ आणि देऊरवाडी-सुकळी गटात ६९.९२ टक्के मतदान झाले. मतदानासाठी १७९ केंद्र होते. सर्व केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदार पार पडले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५५ गट व पंचायत समितीच्या ११० गणांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले होते. यात जिल्हा परिषदेसाठी ३१५ तर पंचायत समितीसाठी ५९६ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट राज्यस्तरीय नेत्यांना जिल्ह्यात पाचारण करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्याही जिल्ह्यात प्रचारसभा झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते. आता पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची गुरूवार, २३ फेब्रुवारीला सर्व तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत उमेदवार आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये निकालाची उत्सुकता कायम राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)