शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणावर काळाचा घाला

By admin | Updated: December 2, 2015 02:31 IST

लग्नाचा दुसरा दिवस.. घरी पाहुण्यांची गर्दी.. नवरदेवाच्या अंगावरची हळद अजून कायमच.. ऐनवेळी खरेदीची गरज पडली अन् नवरदेवच दुचाकी घेऊन बाहेर पडला.

अपघातात काका-पुतण्या ठार : करंजीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, लग्नाचा आनंद विलापात बदलला, मंगी गावावर शोककळा प्रवीण पिन्नमवार पांढरकवडा लग्नाचा दुसरा दिवस.. घरी पाहुण्यांची गर्दी.. नवरदेवाच्या अंगावरची हळद अजून कायमच.. ऐनवेळी खरेदीची गरज पडली अन् नवरदेवच दुचाकी घेऊन बाहेर पडला. परत येताना भरधाव ट्रक काळ झाला. नवरदेव, त्याचा काका ठार झाले. भाचाही गंभीर जखमी झाला. काळजाचा ठोका चुकविणार हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर करंजी पोलीस चौकीसमोर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता घडला.मंगेश छोटू मेश्राम (३२) रा. मंगी आणि रामचंद्र फकरू मेश्राम (६०) रा. मंगी अशी मृत्यू पावलेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. तर अतुल राजू घोडाम (२०) हा गंभीर जखमी झाला आहे. मंगी येथे अपघाताची वार्ता पोहोचताच एका क्षणात लग्नाचा आनंद विलापात बदलून गेला. मंगी येथील मंगेशचे सोमवारीच लग्न झाले. राळेगाव तालुक्यातील झुमका चाचोरा गावात थाटात त्याने जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाची वरात सायंकाळी मंगी येथे घरी परतल्यावर आनंदी आनंद उसळला होता. नव्या सुनेचे स्वागत करण्यासाठी आप्त मंडळी उत्साहाने धावपळ करू लागली. मंगळवारी घरी जमलेल्या पाहुण्यांचा योग्य आदरसत्कार करावा, असा विचार मंगेशने केला होता. त्यासाठी तातडीने काहीतरी खरेदी करून आणू म्हणून तो दुचाकी (एमएच २९ एजे ४२२५) घेऊन करंजीकडे रवाना झाला. सोबत काका रामचंद्र मेश्राम आणि भाचा अतुल घोडाम यांनाही घेतले. मामाला मागे बसवून गाडी अतुलच चालवित होता. करंजीतील काम आटोपून ते दुपारी मंगीकडे परत निघाले होते. करंजी पोलीस चौकीपुढे वळणावरून दुचाकी वळविताना त्यांचा तोल गेला आणि दुचाकी पडली. तिघेही रस्त्यावर पडले. कुणालाच लागले नाही. ते उठण्याच्या बेतात असतानाच त्यांच्या मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच ३४ एबी ६२२३) त्यांना चिरडले. अंगावरून कंटेनर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. वृद्ध रामचंद्र मेश्राम तर जागीच ठार झाले. गंभीर अवस्थेतील मंगेश आणि अतुल यांना काही लोकांनी दवाखान्यात नेण्याची तयारी केली. परंतु, काही अंतर कापताच मंगेशची प्राणज्योत मालवली. गंभीर जखमी अतुल घोडाम याला यवतमाळ येथे हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक मुखेद अहमद नमीम अहमद (२४) वाहनासह पसार झाला. मात्र, करंजी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. वरातीचे वऱ्हाडी लागले अंत्ययात्रेच्या तयारीलामेश्राम कुटुंबीयांनी गेल्या काही दिवसांपासून मंगेशच्या लग्नाची अत्यंत उत्साहात तयारी केली होती. सर्वच नातेवाईकांना आग्रहाचे निमंत्रण पाठवून लग्नाला बोलावून घेतले होते. लग्नही आनंदात झाले. जवळची आप्त मंडळी मंगळवारी थांबली होती. मात्र, मंगळवारी एका क्षणात सारे वातावरणच बदलून गेले. खुद्द नवरदेवच साऱ्यांना सोडून निघून गेला. नव्या नवरीच्या विलापाला तर पारावारच उरला नव्हता. संसार सुरू होण्यापूर्वीच जोडीदार निघून गेला होता. सोमवारी मंगेशच्या वरातीत उल्हासाने सहभागी झालेले ज्येष्ठ नातेवाईक आज दवाखाना, उपचार अन् शेवटी अंत्ययात्रेच्या तयारीत गुंतले होते. हा विदारक प्रसंग पाहून अख्खे मंगी गावच हळहळत आहे.