शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद

By admin | Updated: April 13, 2016 02:50 IST

स्थलांतरित पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले आहे.

निधीचा पत्ता नाही : मुख्याध्यापक अडकले आर्थिक कोंडीत पुसद/दिग्रस : स्थलांतरित पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून निधी न मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समित्यांसह मुख्याध्यापक आर्थिक कोंडीत सापडले आहे. तर उधारी वसुलीसाठी दुकानदार मुख्याध्यापकांकडे चकरा मारीत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस यासह बहुतांश तालुक्यातून मजुरांचे स्थलांतरण होत असते. ऊस कामगार आणि इतरही मजूर कामासाठी स्थलांतरित होतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हंगामी वसतिगृह सुरू केले जाते. कामगारांच्या मुलांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था येथे असते. पुसद व उमरखेड उपविभागात २० हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. त्यात पुसद तालुक्यातील जवळी, भंडारी, धनसिंगनगर, बान्सी, उमरखेड तालुक्यात गगणमाळ, मोहदरी, धनज, पिंपळदरी, नागापूर, चुरमुरा, चिखली वन, घमापूर, महागाव तालुक्यात कातरवाडी, गुंज, फुलसिंगनगर, माळकिन्ही तांडा, करंजी आणि दिग्रस तालुक्यात धानोरा खुर्द, साखरा, मांडवा असे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. सदर वसतिगृह चालविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकावर देण्यात येते. यासाठी लागणारा निधी सर्वशिक्षा अभियानातून दिला जातो. परंतु पाच महिन्यांपासून अद्यापही निधी मिळाला नाही. त्यामुळे मुदतीपूर्वीच वसतिगृह बंद करावे लागले. या विद्यार्थ्यांना सकाळी नास्ता, जेवण, लेखन साहित्य व इतर साहित्य शासनाकडून देण्यात येते. मात्र पाच महिने झाले तरी अद्याप निधीच मिळाला नाही. मात्र या कालावधीत एक हजार सहा विद्यार्थ्यांवर झालेला खर्च उधारीवर करावा लागला आता दुकानदार मुख्याध्यापकांकडे वसुलीसाठी तगादा लावत आहे. अनेक ठिकाणी मुख्याध्यापक वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. एप्रिलचा दुसरा आठवडा आला तरी अद्याप निधी मात्र उपलब्ध झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)