शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपला, कर्ज मात्र कायम

By admin | Updated: March 18, 2015 02:20 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.

रितेश पुरोहित  महागावनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून १२० कोटी कर्जाची उचल केली. मात्र नैसर्गिक संकटाचा सामना करताना कर्जाची परतफेड करणे शक्यच झाले नाही. सर्वच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. महागाव तालुक्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून आसमानी संकटाचा सामना करीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपिट तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेतात उद्ध्वस्त होणारे पिक पाहून तो खचतो. मात्र नव्या दमाने हंगाम सुरू झाला की कामाला लागतो. शेतात पेरणी करतो. त्यासाठी विविध बँकांचे उंबरठे झिजवितो. यावर्षी तालुक्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी विविध बँकातून कर्ज घेतले. त्यात जिल्हा बँकेचे ८५ कोटी, युनियन बँकेचे २० कोटी, स्टेट बँकचे सात कोटी, सेंट्रल बँकेचे पाच कोटी असे १२० कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. या बँकांनी शेतकऱ्यांना खरीप आणि रबी हंगामासाठी कर्ज दिले. मात्र हाती आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता केवळ ३० ते ४० कोटी रुपयांचा शेतमाल शेतकऱ्यांच्या हातात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही. १०० कोटींवर कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जासाठी नोटीस बजावल्या. परंतु शेतातच पिकले नाही तर बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आहे. यावर्षी सुरुवातीला अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. एकरी एक पोतेही सोयाबीन शेतकऱ्यांना झाले नाही. महागाव तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुडाणा येथील एका शेताची पाहणी केली. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असताना शासनाने मात्र मदतीच्या नावाने हात आखडता घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांपर्यंत तर मदत अद्यापही पोहोचली नाही. बँकांमध्ये शेतकरी गर्दी करून आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते नसल्याने मदत परत जाण्याची भीती आहे. खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला असताना आता रबी गारपिटीने उद्ध्वस्त होत आहे. गत १५ दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. तीनदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसाच दिसत नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.