शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपला, कर्ज मात्र कायम

By admin | Updated: March 18, 2015 02:20 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.

रितेश पुरोहित  महागावनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून १२० कोटी कर्जाची उचल केली. मात्र नैसर्गिक संकटाचा सामना करताना कर्जाची परतफेड करणे शक्यच झाले नाही. सर्वच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. महागाव तालुक्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून आसमानी संकटाचा सामना करीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपिट तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेतात उद्ध्वस्त होणारे पिक पाहून तो खचतो. मात्र नव्या दमाने हंगाम सुरू झाला की कामाला लागतो. शेतात पेरणी करतो. त्यासाठी विविध बँकांचे उंबरठे झिजवितो. यावर्षी तालुक्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी विविध बँकातून कर्ज घेतले. त्यात जिल्हा बँकेचे ८५ कोटी, युनियन बँकेचे २० कोटी, स्टेट बँकचे सात कोटी, सेंट्रल बँकेचे पाच कोटी असे १२० कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. या बँकांनी शेतकऱ्यांना खरीप आणि रबी हंगामासाठी कर्ज दिले. मात्र हाती आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता केवळ ३० ते ४० कोटी रुपयांचा शेतमाल शेतकऱ्यांच्या हातात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही. १०० कोटींवर कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जासाठी नोटीस बजावल्या. परंतु शेतातच पिकले नाही तर बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आहे. यावर्षी सुरुवातीला अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. एकरी एक पोतेही सोयाबीन शेतकऱ्यांना झाले नाही. महागाव तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुडाणा येथील एका शेताची पाहणी केली. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असताना शासनाने मात्र मदतीच्या नावाने हात आखडता घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांपर्यंत तर मदत अद्यापही पोहोचली नाही. बँकांमध्ये शेतकरी गर्दी करून आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते नसल्याने मदत परत जाण्याची भीती आहे. खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला असताना आता रबी गारपिटीने उद्ध्वस्त होत आहे. गत १५ दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. तीनदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसाच दिसत नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.