शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

विद्यार्थ्यांना २९ कोटी ८३ लाखांची शिष्यवृत्ती

By admin | Updated: April 25, 2015 02:02 IST

केंद्र शासनाच्यावतीने शंभर टक्के पुरस्कृत असलेली भारत सरकार दहावीनंतरची शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची ठरली आहे.

यवतमाळ : केंद्र शासनाच्यावतीने शंभर टक्के पुरस्कृत असलेली भारत सरकार दहावीनंतरची शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची ठरली आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. गेल्या आर्थींक वर्षात तब्बल २८ हजार ७६४ विद्यार्थ्यांना २९ कोटी ८३ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवगार्तील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. यासाठी पालकांचे वार्षीक उत्पन्न अनुसूचित जाती करीता दोन लाख तर अन्य प्रवगार्तील विद्यार्थ्यांकरीता एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे एका कुटूंबातील सर्वच मुला-मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. योजनेअंतर्गत शिक्षण फी, परिक्षा फी व निर्वाह भत्याचा लाभ दिला जातो. किमान शिक्षणासाठी तरी आर्थिक स्थिती अडचण ठरु नये, यासाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. २०१४-१५ या गेल्या वर्षात एकूण २८ हजार ७६४ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ततीचा लाभ देण्यात आला. शिष्यवृत्ती वाटपाची एकूण रक्कम २९ कोटी ८३ लाख इतकी आहे. वाटप करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमध्ये अनुसूचित जातीच्या तीन हजार ४३७ विद्यार्थ्यांना आठ कोटी आठ लाख, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आठ हजार ६५७ विद्यार्थ्यांना सात कोटी ४८ लाख, विशेष मागास प्रवगार्तील २६६ विद्यार्थ्यांना ३४ लाख ४३ हजार तर इतर मागास वगार्तील १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांना १३ कोटी ९३ लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती वाटपाचा समावेश आहे. दोन कोटी ८७ लाखांची शिक्षण व परिक्षा फी अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव या प्रवगार्तील पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परिक्षा फी चा लाभ दिला जातो. जिल्ह्यात एकूण एक हजार ४३१ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. शिष्यवृत्तीची रक्कम दोन कोटी ८७ लाख इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ४२९ विद्यार्थ्यांना ५२ लाख ४७ हजार, विजाभजच्या ५२५ विद्यार्थ्यांना एक कोटी ७७ लाख ६० हजार व इमाव प्रवगार्तील ४७७ विद्यार्थ्यांना ५७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)