शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

परंपरागत शेतीला चंदनाच्या झाडांतून यशाचा सुगंध

By admin | Updated: September 19, 2015 02:26 IST

बहुतांश शेतकरी परंपरागत शेतीतच धन्यता मानतात. मात्र झाडगावचे ६७ वर्षीय शेतकरी बबनराव बापुराव राडे यांनी चंदनाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

नवा प्रयोग : झाडगावच्या शेतकऱ्याने लावली १५०० चंदनाची झाडे व नर्सरीही फुलविलीके.एस. वर्मा  राळेगावबहुतांश शेतकरी परंपरागत शेतीतच धन्यता मानतात. मात्र झाडगावचे ६७ वर्षीय शेतकरी बबनराव बापुराव राडे यांनी चंदनाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी तेही परंपरागत पीकच घेत होते. पण २००४ मध्ये लावलेल्या व योगायोगाने वाढलेल्या एका चंदनाच्या व दुसऱ्या रक्तचंदनाच्या झाडाच्या वाढीमुळे त्यांनी चंदनाच्या शेतीचाच ध्यास घेतला. २००९ पासून त्यांनी झरगड शिवारातील आठ एकरात सोयाबीन व तूर या पिकांसोबतच काठाकाठाने तब्बल १५०० चंदनाची झाडे लावली. तसेच चार हजार रोपांची नर्सरीही जोपासली आहे. त्यांचे बंधू वामनराव, तीन मुले अतुल, सचिन, अमित त्यांना मदत करतात. शेतीसाठी पूर्णवेळ देता यावा म्हणून शेतातच घर बांधले. तीन मजूर बारमाही कामावर ठेवले. एक बैलजोडी, एक ट्रॅक्टर व एक मळणीयंत्र त्यांच्या दिमतीला आहे. विहीर, स्प्रिंकलर आहे. मात्र कोणत्याही शासकीय योजनेचा राडे यांनी कधीच लाभ घेतला नाही. बबनराव राडे यांनी चिकू, आवळा, डाळिंब, गावरानी व पेवंदी आंबा, फणस, जांब, सीताफळ, लिंबू, पपई, मोसंबी, करवंद आदी फळझाडे, सिसम, शेवगा, सागवान, पिंपळ, वड, बेल, कवट ही झाडे, शिवाय चमेली, रातराणी, कन्हेर, अंबाडी ही फुलझाडेही जोपासली आहे. सात लाखांचे झाड२००४ मध्ये पहिल्यांदा लावलेल्या चंदनाच्या झाडाची उंची आज २५ फूट झाली आहे. गोलाई एक मीटर आहे. या झाडातून कमीत कमी ७० किलो चंदन मिळणार अशी राडे यांना आशा आहे. चंदनाचा आजचा बाजारभाव १० हजार रुपये किलो आहे. त्यानुसार हे एकच झाड आज सात लाखांचे आहे. या शिवाय झाडाच्या साली, फांद्या, लाकडे, खोडपाला, बीज आदी प्रत्येक गोष्टीला औषधी, साबण, धार्मिक कार्य आदींसाठी मागणी आहे. चंदनाची झाडे फुलोऱ्यावर आली असून त्यातून बीज निघतात. बिजातून सुवासिक तेल, औषधीसह अनेक उपयुक्त बाबी मिळतात. या बियांना जमिनीत पुरले तर रोपे तयार होतात. त्यातूनच राडे यांनी नर्सरी यशस्वी केली आहे. चंदनाची रोपे लावल्यानंतर त्याला काठीचा आधार द्यावा लागतो. या शिवाय खत, फवारणी व देखभालीची गरज नसल्याचे राडे यांनी सांगितले. राडे यांच्याप्रमाणेच बहुभूधारक किंवा अल्पभूधारक शेतकरीही चंदनाचा प्रयोग यशस्वी करू शकतात. १०-१५ वर्षानंतरची सुरक्षित गुंतवणूक समजून हा प्रयोग करण्याचे आवाहन राडे यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे. झाडगाव व परिसरातील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. वरूडच्या (जि.अमरावती) खालोखाल येथे संत्रा पीक घेतले जात होते. त्यामुळे या भागाची ओळख मिनी कॅलिफोर्निया अशी होती. कालांतराने संत्रा उत्पादन परवडेनासे झाल्याने आता येथे मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. सेलू (वर्धा), जळगाव भागाप्रमाणेच केळीचे उत्पादनही येथे घेतले जात आहे. पूर्ण शेतीच सागवानमय करण्याचे प्रयोगही अनेक शेतकऱ्यांनी केले आहे.