शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

म्हणे, पाणी प्रश्न मिटला, मोर्चेही थांबले

By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST

धरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या

जीवन प्राधिकरण : खोट्या अहवालाचे बिंग फुटले विलास गावंडे - यवतमाळधरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या  येथील कार्यकारी अभियंत्यांनीच ठाणे मुख्यालयात कागदावर रंगविले आहे. एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचे मूळ ठरलेल्या वादग्रस्त उपअभियंत्याला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्याचा हा खोटा अहवाल फुटल्याने प्राधिकरणात खळबळ निर्माण झाली आहे. यवतमाळ शहराच्या सर्व भागात पाण्यासाठी टाहो सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक भागातील मोर्चे प्राधिकरणावर धडकले. एवढेच नव्हे तर अधिकार्‍याच्या अंगावर शाई फेकण्याचा आणि ‘गांधीगिरी’चाही प्रकार घडला. असे असताना प्राधिकरणाच्या येथील कार्यकारी अभियंत्याने मात्र दारव्हेकर यांची चांगलीच पाठराखण केली आहे. केवळ २0 दिवसात त्यांनी जणू ‘चमत्कार’ घडविल्याचा कांगावा केला गेला. प्राधिकरणाच्या ठाणे मुख्य अभियंत्यांना तसे पत्रही पाठविले. दारव्हेकर यांनी प्रकल्पातील अशुद्ध पाणी (मृतसाठा) मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्याच बळावर त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रात जणू पाण्याची गंगा अवतरल्याचा देखावा निर्माण केला. टाकींमध्ये पुरेसे पाणी साठविले जात आहे, परिणामी प्राधिकरणावर नागरिकांचे मोर्चे थांबल्याचेही वरिष्ठांना कळविले गेले. दारव्हेकर यांचे ‘कौतुक’ एवढय़ावरच थांबले नाही तर शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वितरण ते व्यवस्थितपणे करत असल्याचे प्रशस्तीपत्रही दिले गेले. हे पत्र आणि वास्तव स्थिती पाहून कुणालाही धक्का बसेल. या पत्राने प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किती खोटारडे आहे हे सिध्द झाले आहे. वास्तविक यवतमाळ शहरातील जनतेला आजही तीन ते चार दिवसांपर्यंत पाणी मिळत नाही. ‘सारी रात जागली, हाती नाही लागली’ अशी अवस्था आहे. असे असतानाही वरिष्ठांनी दारव्हेकरांचा एवढा उदोउदो करण्यामागील ‘रहस्य’ अद्याप कुणालाही उलगडलेले नाही. दारव्हेकरांनी वरिष्ठांना ‘खूष’ करून तर हे पत्र मिळवून घेतल नाही ना, अशी शंका प्राधिकरणात व्यक्त केली जात आहे.