शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, पाणी प्रश्न मिटला, मोर्चेही थांबले

By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST

धरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या

जीवन प्राधिकरण : खोट्या अहवालाचे बिंग फुटले विलास गावंडे - यवतमाळधरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या  येथील कार्यकारी अभियंत्यांनीच ठाणे मुख्यालयात कागदावर रंगविले आहे. एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचे मूळ ठरलेल्या वादग्रस्त उपअभियंत्याला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्याचा हा खोटा अहवाल फुटल्याने प्राधिकरणात खळबळ निर्माण झाली आहे. यवतमाळ शहराच्या सर्व भागात पाण्यासाठी टाहो सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक भागातील मोर्चे प्राधिकरणावर धडकले. एवढेच नव्हे तर अधिकार्‍याच्या अंगावर शाई फेकण्याचा आणि ‘गांधीगिरी’चाही प्रकार घडला. असे असताना प्राधिकरणाच्या येथील कार्यकारी अभियंत्याने मात्र दारव्हेकर यांची चांगलीच पाठराखण केली आहे. केवळ २0 दिवसात त्यांनी जणू ‘चमत्कार’ घडविल्याचा कांगावा केला गेला. प्राधिकरणाच्या ठाणे मुख्य अभियंत्यांना तसे पत्रही पाठविले. दारव्हेकर यांनी प्रकल्पातील अशुद्ध पाणी (मृतसाठा) मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्याच बळावर त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रात जणू पाण्याची गंगा अवतरल्याचा देखावा निर्माण केला. टाकींमध्ये पुरेसे पाणी साठविले जात आहे, परिणामी प्राधिकरणावर नागरिकांचे मोर्चे थांबल्याचेही वरिष्ठांना कळविले गेले. दारव्हेकर यांचे ‘कौतुक’ एवढय़ावरच थांबले नाही तर शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वितरण ते व्यवस्थितपणे करत असल्याचे प्रशस्तीपत्रही दिले गेले. हे पत्र आणि वास्तव स्थिती पाहून कुणालाही धक्का बसेल. या पत्राने प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किती खोटारडे आहे हे सिध्द झाले आहे. वास्तविक यवतमाळ शहरातील जनतेला आजही तीन ते चार दिवसांपर्यंत पाणी मिळत नाही. ‘सारी रात जागली, हाती नाही लागली’ अशी अवस्था आहे. असे असतानाही वरिष्ठांनी दारव्हेकरांचा एवढा उदोउदो करण्यामागील ‘रहस्य’ अद्याप कुणालाही उलगडलेले नाही. दारव्हेकरांनी वरिष्ठांना ‘खूष’ करून तर हे पत्र मिळवून घेतल नाही ना, अशी शंका प्राधिकरणात व्यक्त केली जात आहे.