शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

बँक खात्यांतून सव्वादोन लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:07 IST

बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. संबंधित बँकेने मात्र याविषयात हातवर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देस्टेट बँकेतील खाते : वणीतील तीन ग्राहकांना भामट्यांनी दिला आॅनलाईन ‘शॉक’

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. संबंधित बँकेने मात्र याविषयात हातवर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.वणी शहरातील प्रगतीनगर भागातील रहिवासी शेख निसार शेख महेबूब (५३) यांचे वणीतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. शेख निसार हे वेकोलिच्या वाहनावर खासगी चालक म्हणून काम करतात. त्यांनी पै-पै करून पुंजी जमविली आणि ही रक्कम सुरक्षित राहावी म्हणून स्टेट बँकेच्या स्वत:च्या खात्यात जमा केली. मात्र २ ते ४ मे या तीन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या खात्यातून जवळपास एक लाख ४० हजार रूपये उडविण्यात आले. बनावट एटीएमचा वापर करून ही रक्कम उडविण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. २ मे रोजी ४० हजार रूपये, ३ मे रोजी ४० हजार रूपये, ४ मे रोजी वेगवेगळ्या वेळात दोनदा १० हजार व एकदा ४० हजार, अशा प्रकारे रक्कम अज्ञात भामट्यांनी उडविली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेख निसार यांनी यासंदर्भात बँकेला विचारणा केली असता, बँकेकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि ४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार ६६ (सी.) अन्वये गुन्हा दाखल केला.यासोबतच २ मे रोजीच वणी शहरातील रत्ना संजय लडके या महिलेच्या खात्यातून सात हजार रूपये अज्ञात भामट्यांनी उडविले. त्यांनीदेखील वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच कडूकार नामक व्यक्तीच्या खात्यातूनही ७० हजार रूपये उडविण्यात आले आहे. त्यांनीदेखील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यात बँक खात्यातून रक्कम उडविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. २८ जानेवारी रोजी नांदेपेरा येथील एका युवा शेतकऱ्याच्या खात्यातून ३१ हजार रूपयांची रक्कम उडविण्यात आली होती.तसेच त्याच महिन्यात जयश्री भोयर नामक महिलेच्याही खात्यातून जवळपास २४ हजार रूपये अज्ञात भामट्यांनी उडविले होते. या दोनही घटनेच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. मात्र त्यातून अद्यापतरी काहीही निष्पन्न झाले नाही. रक्कम सुरक्षित राहावी म्हणून सामान्य माणुस बँक खात्यात पैसे जमा करतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून घडणाºया या घटनांमुळे ग्राहकांच्या खात्यातील पैसे खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न या घटनांनी निर्माण झाला आहे.स्टेट बँकेतील ग्राहकांची संख्या मोठी असून बँकेची शाखादेखील देशभर आहे. ही बँक ग्राहकांना कधीही एटीएमचा कोड विचारत नाही अथवा त्यासंदर्भात कोणतीही माहिती घेत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अज्ञात व्यक्तीला आपल्या एटीएमसंदर्भात कोणतीही माहिती देऊ नये. एटीएममधून रक्कम काढल्यानंतर कॅन्सलचे बटण दाबावे.डी.एस.धकाते,प्रभारी व्यवस्थापक स्टेट बँक, वणी.