शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

सोनखास हेटी येथे ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: April 2, 2016 03:02 IST

गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते.

शासकीय यंत्रणा झोपेत : सततच्या पाठपुराव्यानंतरही दुर्लक्षसोनखास : गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते. मात्र टंचाई निवारणाकरिता सतत पाठपुरावा करूनही शासकीय यंत्रणेला घाम फुटला नाही. पाणीटंचाईने सोनखास हेटीवासीयांच्या डोळ्यात अश्रू येत असून आता तरी यंत्रणेला जाग येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. नेर तालुक्यातील सोनखास हेटी ही साधारणत: दीड ते दोन हजार लोकसंख्या वस्तीची गटग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावात गेल्या ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या बाबतीत दरवर्षी गावकरी प्रशासनाला साकडे घालून पाणी समस्या सोडविण्याची मागणी करतात. मात्र हाकेला साद देईल ती शासकीय यंत्रणा कसली? सोनखासवासीयांना शासकीय यंत्रणेच्या कामचलावू धोरणाचा फटका बसत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा आमदार, मंत्री, अधिकारी यांना निवेदने दिली. पण कुणीही या गावकऱ्यांच्या मदतीला धावले नाही. इकडे भीषण पाणीटंचाईने गावातील पुरुष-महिला, आबालवृद्धांचा जीव मेटाकुटीस आला आहे. सर्व कामे सोडून आधी पाणी साठवणूक करण्याकरिता जीवाचा आटापिटा करीत आहे. शासनाने गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवारची कामे सुरू केली आहे. परंतु सोनखास येथे मात्र भीषण पाणीटंचाई असताना त्यासाठी काहीच प्रयत्न केल्या जात नाही. परिसरातील जलयुक्त शिवारची कामे, पाणलोट विकासच्या कामाचा दर्जा तपासल्यास सदर योजना पुढाऱ्यांना जगविण्यासाठीच शासनाने निर्माण केल्या का, असे वाटू लागते. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असून याकरिता प्रामाणिक प्रयत्न करण्याची मागणी सोनखास हेटीवासीयांनी केली आहे. (वार्ताहर)