शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

सोनखास हेटी येथे ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: April 2, 2016 03:02 IST

गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते.

शासकीय यंत्रणा झोपेत : सततच्या पाठपुराव्यानंतरही दुर्लक्षसोनखास : गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते. मात्र टंचाई निवारणाकरिता सतत पाठपुरावा करूनही शासकीय यंत्रणेला घाम फुटला नाही. पाणीटंचाईने सोनखास हेटीवासीयांच्या डोळ्यात अश्रू येत असून आता तरी यंत्रणेला जाग येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. नेर तालुक्यातील सोनखास हेटी ही साधारणत: दीड ते दोन हजार लोकसंख्या वस्तीची गटग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावात गेल्या ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या बाबतीत दरवर्षी गावकरी प्रशासनाला साकडे घालून पाणी समस्या सोडविण्याची मागणी करतात. मात्र हाकेला साद देईल ती शासकीय यंत्रणा कसली? सोनखासवासीयांना शासकीय यंत्रणेच्या कामचलावू धोरणाचा फटका बसत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा आमदार, मंत्री, अधिकारी यांना निवेदने दिली. पण कुणीही या गावकऱ्यांच्या मदतीला धावले नाही. इकडे भीषण पाणीटंचाईने गावातील पुरुष-महिला, आबालवृद्धांचा जीव मेटाकुटीस आला आहे. सर्व कामे सोडून आधी पाणी साठवणूक करण्याकरिता जीवाचा आटापिटा करीत आहे. शासनाने गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवारची कामे सुरू केली आहे. परंतु सोनखास येथे मात्र भीषण पाणीटंचाई असताना त्यासाठी काहीच प्रयत्न केल्या जात नाही. परिसरातील जलयुक्त शिवारची कामे, पाणलोट विकासच्या कामाचा दर्जा तपासल्यास सदर योजना पुढाऱ्यांना जगविण्यासाठीच शासनाने निर्माण केल्या का, असे वाटू लागते. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असून याकरिता प्रामाणिक प्रयत्न करण्याची मागणी सोनखास हेटीवासीयांनी केली आहे. (वार्ताहर)