शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

संजय राठोड यांची पोहरादेवीत समाजकेंद्रित भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:07 IST

आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील आणि या भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली.

ठळक मुद्दे२० मागण्या मांडल्या : नंगारा भूमिपूजन सोहळा ठरला देखणा, देशभरातील लाखो बंजारा समाजबांधवांची लाभली उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील आणि या भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली. समाजाच्या अनेक प्रश्नांकडे या मान्यवरांचे त्यांनी लक्ष वेधले. एकूणच त्यांची पोहरादेवी येथील देखण्या सोहळ्यातील भूमिका समाज केंद्रित राहिली. प्रास्ताविकातून ना.राठोड यांनी समाजबांधवांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून पोहरादेवीचा (जि.वाशिम) १२५ कोटींचा विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. त्यापैकी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. उर्वरित १०० कोटी लवकरच मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निधी तत्काळ मंजूर करीत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी केली. ना. राठोड म्हणाले, देशभरातील बंजारा समाज एकच भाषा, एकच वेशभूषा, एकच दैवत व परंपरा मानणारा आहे. देशात विविध नावाने आणि प्रवर्गाने तो ओळखला जातो. महाराष्ट्रात या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. बापट आयोग आणि इदाते आयोगानेही याबाबत शिफारशी केल्या आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. २००४ पूर्वी बंजारा समाजाला नॉन क्रिमिलीयरची तरतूद नव्हती. ती काढून टाकण्याबाबतची फाईल मंत्रालयात पडून असल्याचे सांगून ना. राठोड यांनी याबाबत निर्णय घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांना केला. तांडा सुधार योजनेत वस्ती हा शब्द घुसविला आणि या सुधारणा कागदावरच राहिल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तांड्यांना ग्रामपंचायतीचा निकष बदलल्याने तांड्याचा विकास रखडला, असे ना. राठोड म्हणाले. वसंतराव नाईक महामंडळास कित्येक वर्षांपासून अध्यक्ष नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. समाजाला उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आर्थिक सुधारणांच्या प्रवाहात आणण्याची मागणी ना. राठोड यांनी यावेळी केली. बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना वसतीगृह सुविधा देऊन स्वाधार योजना लागू करावी, शिष्यवृत्ती योजनेसाठी निधी द्यावा, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना द्यावी, आश्रमशाळांचे अनुदान द्यावे अशा मागण्याही मांडल्या. दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी दोन एकर जमीन देण्याबाबत योजना निर्माण करण्याची मागणी ना. राठोड यांनी यावेळी केली. तसेच बंजारा समाज वनविभागाच्या कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याबाबत मोहीम राबवावी, असे आवाहन यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केले. गोर बंजारा कलावंतांसाठी मानधन व सवलतीची योजना, गोर बोलीभाषेचा आठव्या सूचीत समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यासोबतच राज्यात उर्दू, सिंधी, गुजराती आदी अकादमीच्या धर्तीवर गोर बंजारा अकादमी स्थापून संस्कृती, कला, भाषा, परंपरा यांच्या संवर्धनसाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. राज्यातून आणि देशातील विविध भागातून चार लाखांच्या वर बंजारा बांधव या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी माणसांच्या गर्दीचा समुद्र पोहरादेवीत बघायला मिळत असल्याचे जाहीर भाषणात सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांचे या कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजनाबाबत करावे तेवढे कौतूक कमीच आहे, असे गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला कार्यगौरव ना. संजय राठोड यांच्यासाठी भविष्यात यशदायीच ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड