शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

दहावी पास संजय ‘महाराष्ट्राचा गुगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:08 IST

घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात.

ठळक मुद्देसंजय पाटील : कोणताही प्रश्न विचारा, उत्तर तयारच, स्मरणशक्तीचा बादशाह

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षण न घेताही ते आज ‘महाराष्ट्राचे गुगल’ म्हणून ओळखले जातात. स्मरणशक्तीच्या या बादशहाचे नाव आहे, संजय वामन पाटील.नेर येथील ‘स्नेहआधार’ या शेतकरी मुलांच्या शाळेत त्यांनी भेट दिली, त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या स्मरणशक्तीचे गुपित सांगितले. जगभरातील महत्त्वाच्या पाच हजार व्यक्तींचे जन्मदिनांक त्यांच्या स्मरणात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुमारे दोनशेच्यावर दिनविषेश त्यांच्या ओठांवर आहेत. आज धावपळीच्या जीवनात अनेकांना विसरण्याची सवय लागली. लोक आठवणी जपण्यासाठी मोबाईल, लॅपटॉपचा वापर करतात. मात्र जळगावचे संजय पाटील ‘गुगल’ची भूमिका बजावतात.जळगाववरून २५ किलोमीटर असलेले साधखेडा हे संजय वामन पाटील यांचे गाव. चावलखेडा येथील निळकंठेश्वर शाळेत ते दहावीपर्यंत शिकले. हलाकीची परिस्थिती असल्याने लहान वयापासून त्यांनी दूध विक्री व इतर किरकोळ कामे करत शिक्षण घेतले. याच दरम्यान वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना आपल्या स्मरणशक्तीची जाणीव झाली. मग त्यांनी भरपूर वाचन करून स्मरणशक्ती वाढवली. आता ते हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणूनही काम करतात.संजय यांनी दररोज जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन, मनन, चिंतन केले. झोपण्यापूर्वी ते मनातल्या मनात ३६५ दिवसांचे महत्त्व व पाठांतर करतात. ते लोकमत नेहमी वाचतात. विविध लेख सामान्यज्ञान, व्यक्तिमत्त्वे यांचा ते अभ्यास करतात. एकाग्रता हेच स्मरणशक्तीचे स्त्रोत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी स्नेहआधारच्या प्रमुख कांचन कांबळे, निसर्गप्रेमी डॉ. अशोक जैन, नीलेश वाहणे, प्रदीप कांबळे आदींची उपस्थिती होती.आता तयारी जागतिक विक्रमाचीआपली स्मरणशक्ती जास्तीत जास्तीत वाढवून भविष्यात लिम्का बुक आॅफ रेकार्ड व गिनीज बुकमध्ये आपली नोंद व्हावी, ही संजय पाटील यांची अपेक्षा आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे, त्यादृष्टीने शैक्षणिक संस्थेत कार्यशाळा घेण्यासाठी ते कष्ट घेत आहेत.आपण मनात हार ठेवली तर हारणारच. जिंकण्याची तयारी ठेवा. जीवनात ‘नाही’ या शब्दाला महत्त्व देऊ नका. आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. केवळ ती करण्याची जिद्द ठेवा.- संजय पाटील, जळगाव