शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दहावी पास संजय ‘महाराष्ट्राचा गुगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:08 IST

घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात.

ठळक मुद्देसंजय पाटील : कोणताही प्रश्न विचारा, उत्तर तयारच, स्मरणशक्तीचा बादशाह

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : घरी गरिबी. शिक्षण केवळ दहावीपर्यंतच. पण कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्या ओठावर उत्तर तयार मिळेल. जगातल्या महत्त्वाच्या पाच हजार लोकांचे वाढदिवस, वर्षातल्या ३६५ दिवसांचे महत्त्व ते एका क्षणात सांगतात. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षण न घेताही ते आज ‘महाराष्ट्राचे गुगल’ म्हणून ओळखले जातात. स्मरणशक्तीच्या या बादशहाचे नाव आहे, संजय वामन पाटील.नेर येथील ‘स्नेहआधार’ या शेतकरी मुलांच्या शाळेत त्यांनी भेट दिली, त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या स्मरणशक्तीचे गुपित सांगितले. जगभरातील महत्त्वाच्या पाच हजार व्यक्तींचे जन्मदिनांक त्यांच्या स्मरणात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुमारे दोनशेच्यावर दिनविषेश त्यांच्या ओठांवर आहेत. आज धावपळीच्या जीवनात अनेकांना विसरण्याची सवय लागली. लोक आठवणी जपण्यासाठी मोबाईल, लॅपटॉपचा वापर करतात. मात्र जळगावचे संजय पाटील ‘गुगल’ची भूमिका बजावतात.जळगाववरून २५ किलोमीटर असलेले साधखेडा हे संजय वामन पाटील यांचे गाव. चावलखेडा येथील निळकंठेश्वर शाळेत ते दहावीपर्यंत शिकले. हलाकीची परिस्थिती असल्याने लहान वयापासून त्यांनी दूध विक्री व इतर किरकोळ कामे करत शिक्षण घेतले. याच दरम्यान वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना आपल्या स्मरणशक्तीची जाणीव झाली. मग त्यांनी भरपूर वाचन करून स्मरणशक्ती वाढवली. आता ते हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणूनही काम करतात.संजय यांनी दररोज जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन, मनन, चिंतन केले. झोपण्यापूर्वी ते मनातल्या मनात ३६५ दिवसांचे महत्त्व व पाठांतर करतात. ते लोकमत नेहमी वाचतात. विविध लेख सामान्यज्ञान, व्यक्तिमत्त्वे यांचा ते अभ्यास करतात. एकाग्रता हेच स्मरणशक्तीचे स्त्रोत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी स्नेहआधारच्या प्रमुख कांचन कांबळे, निसर्गप्रेमी डॉ. अशोक जैन, नीलेश वाहणे, प्रदीप कांबळे आदींची उपस्थिती होती.आता तयारी जागतिक विक्रमाचीआपली स्मरणशक्ती जास्तीत जास्तीत वाढवून भविष्यात लिम्का बुक आॅफ रेकार्ड व गिनीज बुकमध्ये आपली नोंद व्हावी, ही संजय पाटील यांची अपेक्षा आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे, त्यादृष्टीने शैक्षणिक संस्थेत कार्यशाळा घेण्यासाठी ते कष्ट घेत आहेत.आपण मनात हार ठेवली तर हारणारच. जिंकण्याची तयारी ठेवा. जीवनात ‘नाही’ या शब्दाला महत्त्व देऊ नका. आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. केवळ ती करण्याची जिद्द ठेवा.- संजय पाटील, जळगाव