शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

संघटन खिळखिळे, नवसंजीवनीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:48 IST

सुमारे तीन वर्षांपासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात संघटन अक्षरश: खिळखिळे झाले आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादी काँग्रेस पक्ष : शरद पवार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुमारे तीन वर्षांपासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात संघटन अक्षरश: खिळखिळे झाले आहे. त्यामुळे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या यवतमाळातील मुक्कामी दौºयातून पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.एकेकाळी जिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेसचा प्रचंड बोलबाला होता. सर्वच समाज, विभाग व गटांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने यवतमाळात राष्टÑवादीची ताकद वेगाने वाढली होती. याच ताकदीच्या बळावर काही विधानसभा मतदारसंघ काबीज करू, अशी नेतृत्वाची अपेक्षा होती. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नेतृत्वच दहा-बारा हजारात गुंडाळले गेल्याने राष्टÑवादीतील गर्दीचा फुगा फुटला आणि राष्टÑवादी वेगाने कमीही झाली. आजच्या स्थितीत अनेक तालुक्यात तर राष्टÑवादी नामफलकापुरतीच उरली आहे. पुसदमध्ये पक्षाचे तेवढे आमदार व नगराध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेमध्ये राष्टÑवादीच्या ११ जागा आहेत. त्यांच्यातही पदावरून धुसफूस ऐकायला मिळते. वणीमध्ये राष्टÑवादीवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. पांढरकवड्यात राष्टÑवादी अगदीच सर्कलपुरती मर्यादित आहे. यवतमाळात कधीकाळी कामे मिळविण्याच्या लालसेने का होईना दिसणारी गर्दी चांगलीच ओसरली आहे. दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये एक खरेदी विक्री संघ वगळता राष्टÑवादीचे अस्तित्व नाही. कोट्यातून आमदारकीचा प्रयोग जिल्ह्यात केला गेला. मात्र त्याचा राष्टÑवादीला फारसा फायदा झाल्याचे चित्र नाही. पुढे राष्टÑवादी पुसद तालुक्यापुरती मर्यादित आहे. तेथील यशात पक्षाचे योगदान किती, हा वेगळा विषय आहे. तेथे घरातूनच आव्हान उभे झाले आहे. ते तेवढे स्ट्राँग नाही, मात्र पक्ष नेत्यांसाठी चिंता वाढविणारे नक्कीच आहे.लाभार्थ्यांची गर्दी अधिकआजच्या घडीला राष्टÑवादी काँग्रेसमध्ये असलेली गर्दी ही बहुतांश लाभार्थ्यांचीच असल्याचे मानले जाते. ेमूळ पक्षसंघटन व तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड अभाव आहे. येथे राष्टÑवादीची भूमिका ही स्वतंत्र नव्हे तर सत्ताधारी भाजपाच्या सोईची असल्याने अनेक कार्यकर्त्यांना ती खटकतेसुद्धा. मात्र जेष्ठ नेतृत्वच नांग्या टाकत असल्याने कार्यकर्त्यांची गोची होते. जिल्हा बँकेत राष्टÑवादीची भूमिका ही भाजपाच्या सोईची आहे. तेथे बहुतांश काँग्रेस-राष्टÑवादीच्या विचाराचे संचालक असताना केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अवघ्या तीन संचालकांच्या बळावर भाजपाला बँकेचे अध्यक्षपद अक्षरशा बहाल केले गेले. आता भाजपा आपल्या सोईने बँक चालवत आहे, मात्र राष्टÑवादीला ‘व्हॉईस’ राहिलेला नाही.राष्टÑवादीची आंदोलने लुप्तजिल्ह्यात काँग्रेस व राष्टÑवादी विरोधी पक्ष म्हणून असले तरी प्रत्यक्षात राष्टÑवादीची जनतेच्या प्रश्नावर कुठेही आक्रमकता दिसत नाही. त्या तुलनेत काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली आहे.राष्टÑवादी चक्क दावणीलाजिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेस पक्ष भाजपाच्या दावणीला बांधला गेल्याची कार्यकर्त्यांची ओरड आहे. त्यामुळेच की काय सर्वत्र राष्टÑवादीचे जुने संघटन खिळखिळे झाले आहे. गेल्या तीन वर्षात पक्षबांधणीवर भर दिला गेला नाही. त्यामुळेच आज राष्टÑवादीला जणू आपले अस्तित्व शोधावे लागत आहे. मरगळ आलेल्या राष्टÑवादीला पुन्हा उभे राहण्यासाठी नवसंजीवनीची गरज आहे. ही नवसंजीवनी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दौºयातून मिळण्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. खासदार पवार यांचा हा विदर्भ दौरा ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारवर दबाव वाढविण्यासाठी असल्याचे मानले जाते. पवार यांच्या यवतमाळ मुक्कामी दौºयामागे शेतकºयांचे प्रश्न हे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात खिळखिळी झालेल्या राष्टÑवादीची नवसंजीवनी देऊन पुन्हा एकदा मोट बांधणे हासुद्धा छुपा अजेंडा असल्याचे सांगितले जाते. पवारांचा हा दौरा पक्षाला खरच किती ‘टॉनिक’ देऊन जातो हे भविष्यात पहायला मिळू शकते.