शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

दीड लाख विद्यार्थी रंगीबेरंगी पोषाखात देणार तिरंग्याला सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:45 IST

शाळा सुरू होऊन पावणे दोन महिने झाले, पण जिल्ह्यातील तब्बल दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेशच मिळालेला नाही.

ठळक मुद्देगणवेश मिळालाच नाही : स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर शिक्षण विभागाला आली जाग

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शाळा सुरू होऊन पावणे दोन महिने झाले, पण जिल्ह्यातील तब्बल दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेशच मिळालेला नाही. आता तर स्वातंत्र्यदिनही आला. त्यामुळे झेंडावंदनाला जुनाट आणि रंगीबेरंगी परिधानातील विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेहºयावरचा रंग मात्र उडणार आहे. स्वातंत्र्यदिनी भोंगळ कारभार जनमानसात उघडा होणार या भीतीने शिक्षण विभाग ऐन वेळी जागा झाला असून ऐन स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी गणवेश खरेदीचा अहवाल मागविण्यात आला आहे.सर्व शिक्षा अभियानातून जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ५११ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणे क्रमप्राप्त होते. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने त्यासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीही मंजूर करून जिल्हास्तरावर वर्ग केला. परंतु, जिल्हास्तरावर ही योजना राबविण्याबाबत पूर्वतयारीच करण्यात आलेली नव्हती. केंद्र सरकारने साधारण एप्रिल महिन्यात निधीला तत्त्वत: मंजुरी दिल्यावर राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्यासाठी जुलै महिना उजाडला. या दरम्यान २६ जूनपासूनच रंगीबेरंगी कपड्यातील विद्यार्थ्यांच्या गर्दीने शाळा गजबजल्या.अर्धा जुलै उलटल्यावर जेव्हा निधी आला, तेव्हा ९० टक्के विद्यार्थ्यांचे बँक खातेच नसल्याचा साक्षात्कार अधिकाºयांना झाला. मुख्याध्यापक, पालक विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी बँकांच्या पायºया झिजवून थकले. पण शिक्षण विभागातील अधिकारी गाफिलच राहिले.विद्यार्थी करणार बनियान आंदोलनमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून आलेला ६ कोटींचा निधी पंचायत समिती स्तरावर पाठवून शिक्षण विभागातील अधिकारी मोकळे झाले आहेत. मात्र, किती विद्यार्थ्यांची गणवेश खरेदी आटोपली याचा आढावाच घेतला नाही. आता स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर केवळ किती खाती उघडण्यात आली, याची माहिती घेतली जात आहे. ६२ हजार विद्यार्थ्यांची खाती उघडल्याचा दावा शिक्षण विभाग करीत असला, तरी दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न नजरेआड केला जात आहे. गणवेशाविना राष्ट्रीय एकात्मतेचे तत्त्वच बाजूला होत आहे. श्रीमंतांनी गणवेश घेतले. पण गरिबांची मुलं वंचित आहे. सरकार घटनेच्या १० मार्गदर्शक तत्त्वांनाच फाटा देत असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊनही हालचाल दिसत नाही. त्यामुळे गणवेशाकरिता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घेऊन बनियान आंदोलन केले जाईल, असा इशारा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास निकम यांनी दिला.