शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात बोगस बीटीच्या १२ लाख पाकिटांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:05 IST

राऊंडअप (आरआर) अर्थात बोगस बीटी बियाण्यांची २०१७ च्या खरीप हंगामात तब्बल १२ लाख पाकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देव्हाया तेलंगणा-आंध्रा चंद्रपुरात चार जिल्ह्यांत पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राऊंडअप (आरआर) अर्थात बोगस बीटी बियाण्यांची २०१७ च्या खरीप हंगामात तब्बल १२ लाख पाकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे. गुजरातेतून येणारे हे बीटी बियाणे आधी तेलंगणा-आंध्रप्रदेशात नेले जाते. तेथून ते चंद्रपूर मार्गे लगतच्या यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर जिल्ह्यात पुरविले जाते. या बियाण्यांनी कृषी खात्यापुढे आव्हान उभे केले आहे.राज्यात कपाशीचा पेरा घटला. लागवड क्षेत्रातील कापूस उत्पादनातही ४३ टक्क्याने घट झाल्याचे आकडे कृषी खात्याच्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. यंदा कापसाचे उत्पादन ४५ लाख ६६ हजार २०० गाठींनी (प्रती गाठ १७० किलो कापूस) घटण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. घटत्या उत्पादनासाठी बोंडअळीच्या आक्रमणाला कारणीभूत ठरविले जात असले तरी मुळात बोगस बीटीचा वापर हेसुद्धा प्रमुख कारण ठरले आहे.राऊंडअप (आरआर) या बोगस बिटी बियाण्यांची गुजरातमध्ये निर्मिती केली जाते. हे बियाणे आधी तेलंगणा, आंध्रच्या सीमावर्ती भागात पाठविले जाते. तेथून त्याचा चंद्रपुरात साठा होतो. त्यानंतर चंद्रपुरातून हे बियाणे लगतच्या यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाठविले जाते. सूत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशी बियाण्याच्या चार लाख पाकिटांची गरज असते. परंतु प्रत्यक्षात तेथे यावेळी १२ लाख पाकिटांची विक्री झाली. दहा लाखांपेक्षा अधिक पाकिटांचा यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूरात पुरवठा केला गेला.नाराजीमुळे ई-वे बिल लांबणीवरबोगस बियाण्यांच्या वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी ‘ई-वे बिल’ हा सक्षम पर्याय ठरणार आहे. परंतु आधीच नोटा बंदी, जीएसटी यामुळे भाजपा सरकारविरुद्ध समाज व विशेषत: उद्योजक, व्यापाºयांमध्ये प्रचंड नाराजी वाढत असल्याने ई-वे बिल प्रणालीची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आल्याचे बोलले जाते. या ई-वे बिलमुळे सर्व काही रेकॉर्डवर येणार असून त्याची ट्रान्सपोर्टिंगची वैधता कमाल चार दिवस राहणार असल्याने त्यात गैरप्रकाराला वावच उरणार नसल्याचे मानले जाते.फवारणी खर्च बचतीचा फंडाराऊंडअप बिटी बियाण्याच्या किंमतीत नामांकित बियाण्यांच्या तुलनेत फार फरक नाही. मात्र राऊंडअप बिटी बियाणे पेरल्यास तणनाशक फवारण्याची मोकळीक राहते. या फवारणीमुळे बियाणे- रोपटे जळत नाही. फवारणीला हेक्टरी किमान साडेचार हजार रुपये खर्च लागतो. हा खर्च वाचविण्यासाठीच शेतकरी बोगस बीटीला नाईलाजाने का होईना पसंती देतात. कृषी खात्याच्या मूक संमतीने या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली गेली. चंद्रपुरातील हे बोगस बिटी बियाणे विक्रेते कृषी खात्यालाही जुमानत नसल्याचे सांगितले जाते. विशेष असे या बियाण्यांचा हा व्यवहार कुठेच रेकॉर्डवर येत नसल्याने अनेक विक्रेते त्यालाच प्राधान्य देतात.

टॅग्स :cottonकापूस