शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

यवतमाळच्या संमेलनात चार कोटींच्या पुस्तकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:47 IST

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती.

ठळक मुद्देबडोद्याचा विक्रम मोडलास्पर्धा परीक्षेची पुस्तके, कादंबऱ्या अन् बालसाहित्याला प्रतिसाद

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती. यवतमाळच्या संमेलनाने चार कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे, पुस्तक विक्रेत्यांनाही विक्रमी विक्री होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे अनेक लेखकांची पुस्तके एकदा संपल्यानंतर पुन्हा मिळाली नाहीत.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर काही साहित्यिकांनी बहिष्कार टाकल्याने पुस्तकप्रेमी येणार किंवा नाही, असा संशय प्रकाशकांना वाटला. प्रत्यक्षात शेवटच्या दिवसापर्यंत संमेलनस्थळी अलोट गर्दी होती. या गर्दीमधील अनेक अभ्यासू मंडळींनी पुस्तके खरेदी केली. पुस्तक विक्रीचे २१४ स्टॉल या ठिकाणी होते. यामधून चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

अरुणा ढेरेंच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणीसंमेलनात सर्वच प्रकारची पुस्तके विकल्या गेली. विशेषत: संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती. यामध्ये कृष्ण किनारा, प्रेमाकडून प्रेमाकडे, मैत्रही अशी ४० प्रकारची पुस्तके होती. सिंधुताई सपकाळांचे अनाथांची आई नावाचे पुस्तक सर्वाधिक विकले गेले. मृत्यंूजय, छावा, ययाती, ज्ञानेश्वरी, दिव्य पुराण, चार वेद या पुस्तकांसह कादंबºयांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.बाल साहित्याचे स्वतंत्र दालनग. दिं. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साहित्य संमेलनात स्वतंत्र दालन होते. तसेच बाल साहित्याचेही स्वतंत्र दालन होते. त्यामुळे खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली. शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षा आणि थोर पुरूषांच्या पुस्तकांनाही संमेलनस्थळी मोठी होती, अशी माहिती ग्रंथप्रदर्शनी समिती प्रमुख सुधीर नारखेडे यांनी ‘लोकमत’ला दिली.भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके संपलीसंमेलनस्थळी भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके लवकर संपली. नंतर येणाºया वाचकांना ही पुस्तके मिळाली नाही. या पुस्तकांसाठी अनेक ग्राहकांनी संमेलन पालथे घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.पुस्तकांच्या दालनात सर्वाधिक गर्दी होती. चार कोटींची पुस्तके विकली गेली. साहित्य संमेलनात दर्जेदार पुस्तकांचा खजिना असल्याने वाचकांनाही लाभ घेता आला. यवतमाळात नवोदित वाचकांची संख्या वाढत आहे.- प्रा. घनश्याम दरणेसंमेलन कार्यवाह, यवतमाळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन