शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

यवतमाळच्या संमेलनात चार कोटींच्या पुस्तकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:47 IST

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती.

ठळक मुद्देबडोद्याचा विक्रम मोडलास्पर्धा परीक्षेची पुस्तके, कादंबऱ्या अन् बालसाहित्याला प्रतिसाद

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती. यवतमाळच्या संमेलनाने चार कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे, पुस्तक विक्रेत्यांनाही विक्रमी विक्री होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे अनेक लेखकांची पुस्तके एकदा संपल्यानंतर पुन्हा मिळाली नाहीत.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर काही साहित्यिकांनी बहिष्कार टाकल्याने पुस्तकप्रेमी येणार किंवा नाही, असा संशय प्रकाशकांना वाटला. प्रत्यक्षात शेवटच्या दिवसापर्यंत संमेलनस्थळी अलोट गर्दी होती. या गर्दीमधील अनेक अभ्यासू मंडळींनी पुस्तके खरेदी केली. पुस्तक विक्रीचे २१४ स्टॉल या ठिकाणी होते. यामधून चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

अरुणा ढेरेंच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणीसंमेलनात सर्वच प्रकारची पुस्तके विकल्या गेली. विशेषत: संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती. यामध्ये कृष्ण किनारा, प्रेमाकडून प्रेमाकडे, मैत्रही अशी ४० प्रकारची पुस्तके होती. सिंधुताई सपकाळांचे अनाथांची आई नावाचे पुस्तक सर्वाधिक विकले गेले. मृत्यंूजय, छावा, ययाती, ज्ञानेश्वरी, दिव्य पुराण, चार वेद या पुस्तकांसह कादंबºयांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.बाल साहित्याचे स्वतंत्र दालनग. दिं. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साहित्य संमेलनात स्वतंत्र दालन होते. तसेच बाल साहित्याचेही स्वतंत्र दालन होते. त्यामुळे खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली. शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षा आणि थोर पुरूषांच्या पुस्तकांनाही संमेलनस्थळी मोठी होती, अशी माहिती ग्रंथप्रदर्शनी समिती प्रमुख सुधीर नारखेडे यांनी ‘लोकमत’ला दिली.भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके संपलीसंमेलनस्थळी भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके लवकर संपली. नंतर येणाºया वाचकांना ही पुस्तके मिळाली नाही. या पुस्तकांसाठी अनेक ग्राहकांनी संमेलन पालथे घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.पुस्तकांच्या दालनात सर्वाधिक गर्दी होती. चार कोटींची पुस्तके विकली गेली. साहित्य संमेलनात दर्जेदार पुस्तकांचा खजिना असल्याने वाचकांनाही लाभ घेता आला. यवतमाळात नवोदित वाचकांची संख्या वाढत आहे.- प्रा. घनश्याम दरणेसंमेलन कार्यवाह, यवतमाळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन