शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:42 IST

राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची मोहीम : २०० वारकऱ्यांची फळी, एका प्रबोधनकारावर २४ गावांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने मंगळवारी स्वच्छता विषयक परिषदेचे आयोजन केले होते. २६ जानेवारी ते १० फेबु्रवारी या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे.मोहिमेला गती देण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे. याकरिता जिल्ह्यात २०० वारकऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. या वारकºयांना मंगळवारी प्रबोधनातील विषयाचे प्रशिक्षणही देण्यात आले. एका प्रवचनकाराकडे २४ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संत महंताची मदत घेतली जाणार आहे. ही मंडळी गावामध्ये जाऊन प्रवचन करणार आहे. या प्रबोधनामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करायचा, प्लास्टीक बंदी आणि प्लास्टीकचे धोके त्याच बरोबर परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयांवर संत महंत गावपातळीवर प्रबोधन करतील. एक प्रवचनकार एका दिवशी दोन गावांमध्ये प्रवचन करणार आहे. प्रवचनानंतर उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य गुलाबराव राऊत, हभप प्रभूदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर आदी उपस्थित होते.आचारसंहितेपूर्वी मोेहिमेला गतीगत चार वर्षांपासून राबविण्यात येणारी स्वच्छतेची मोहीम अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्वच्छतेचे संपूर्ण कामकाज अंतिम टप्प्यात पोहचावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. संत महंतांमुळे या कामाला गती येईल, असा विश्वास जिल्हा परिषद यंत्रणेने व्यक्त केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान