शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:42 IST

राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची मोहीम : २०० वारकऱ्यांची फळी, एका प्रबोधनकारावर २४ गावांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने मंगळवारी स्वच्छता विषयक परिषदेचे आयोजन केले होते. २६ जानेवारी ते १० फेबु्रवारी या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे.मोहिमेला गती देण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे. याकरिता जिल्ह्यात २०० वारकऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. या वारकºयांना मंगळवारी प्रबोधनातील विषयाचे प्रशिक्षणही देण्यात आले. एका प्रवचनकाराकडे २४ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संत महंताची मदत घेतली जाणार आहे. ही मंडळी गावामध्ये जाऊन प्रवचन करणार आहे. या प्रबोधनामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करायचा, प्लास्टीक बंदी आणि प्लास्टीकचे धोके त्याच बरोबर परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयांवर संत महंत गावपातळीवर प्रबोधन करतील. एक प्रवचनकार एका दिवशी दोन गावांमध्ये प्रवचन करणार आहे. प्रवचनानंतर उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य गुलाबराव राऊत, हभप प्रभूदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर आदी उपस्थित होते.आचारसंहितेपूर्वी मोेहिमेला गतीगत चार वर्षांपासून राबविण्यात येणारी स्वच्छतेची मोहीम अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्वच्छतेचे संपूर्ण कामकाज अंतिम टप्प्यात पोहचावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. संत महंतांमुळे या कामाला गती येईल, असा विश्वास जिल्हा परिषद यंत्रणेने व्यक्त केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान