शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:42 IST

राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची मोहीम : २०० वारकऱ्यांची फळी, एका प्रबोधनकारावर २४ गावांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने मंगळवारी स्वच्छता विषयक परिषदेचे आयोजन केले होते. २६ जानेवारी ते १० फेबु्रवारी या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे.मोहिमेला गती देण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे. याकरिता जिल्ह्यात २०० वारकऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. या वारकºयांना मंगळवारी प्रबोधनातील विषयाचे प्रशिक्षणही देण्यात आले. एका प्रवचनकाराकडे २४ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संत महंताची मदत घेतली जाणार आहे. ही मंडळी गावामध्ये जाऊन प्रवचन करणार आहे. या प्रबोधनामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करायचा, प्लास्टीक बंदी आणि प्लास्टीकचे धोके त्याच बरोबर परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयांवर संत महंत गावपातळीवर प्रबोधन करतील. एक प्रवचनकार एका दिवशी दोन गावांमध्ये प्रवचन करणार आहे. प्रवचनानंतर उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य गुलाबराव राऊत, हभप प्रभूदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर आदी उपस्थित होते.आचारसंहितेपूर्वी मोेहिमेला गतीगत चार वर्षांपासून राबविण्यात येणारी स्वच्छतेची मोहीम अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्वच्छतेचे संपूर्ण कामकाज अंतिम टप्प्यात पोहचावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. संत महंतांमुळे या कामाला गती येईल, असा विश्वास जिल्हा परिषद यंत्रणेने व्यक्त केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान