शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 4, 2016 02:06 IST

साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा

केंद्रीय पथक जिल्ह्यात : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, वाळलेल्या बागेची पाहणीयवतमाळ : साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा दिल्लीहून दाखल झालेल्या केंद्रीय पथकापुढे व्यक्त केली. या पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे दाहक वास्तव जवळून अनुभवले. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. रामनंद यादव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय पथकाने शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. गुरुवारीच पथक यवतमाळात येणार होते. मात्र एक दिवस उशिराने सदर पथक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी यवतमाळ तालुक्यातील भारी आणि कळंब तालुक्यातील चापर्डा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. इतकेच नव्हे तर वाळलेल्या फळ बागांची पाहणी या पथकाने केली. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही, मिळालेले कर्ज कमी पडते, महागाईत बियाणे आणि खतांची खरेदी अशक्य आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाण्यांचे पॅकेज मिळेल तर लाभदायक राहील, असे सांगितले. पीक विम्याची मदत कर्जात कापल्या जात असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या पथकासमोर सिंचन, कालव्याचे अर्धवट काम, कृषी पंपावरील भारनियमन आदी समस्या मांडल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली. या पथकाने चापर्डा येथे एका झाडाखाली सभा घेतली. त्यानंतर अशोक कांबळे आणि सुभाष सरोदे यांच्या वाळलेल्या सत्रा बागेची पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव अनुभवून पथकातील सदस्यही अस्वस्थ झाले होते. हा अहवाल पथक केंद्र सरकारला सादर करेल, त्यानंतर मदतीची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)