शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 4, 2016 02:06 IST

साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा

केंद्रीय पथक जिल्ह्यात : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, वाळलेल्या बागेची पाहणीयवतमाळ : साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा दिल्लीहून दाखल झालेल्या केंद्रीय पथकापुढे व्यक्त केली. या पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे दाहक वास्तव जवळून अनुभवले. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. रामनंद यादव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय पथकाने शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. गुरुवारीच पथक यवतमाळात येणार होते. मात्र एक दिवस उशिराने सदर पथक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी यवतमाळ तालुक्यातील भारी आणि कळंब तालुक्यातील चापर्डा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. इतकेच नव्हे तर वाळलेल्या फळ बागांची पाहणी या पथकाने केली. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही, मिळालेले कर्ज कमी पडते, महागाईत बियाणे आणि खतांची खरेदी अशक्य आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाण्यांचे पॅकेज मिळेल तर लाभदायक राहील, असे सांगितले. पीक विम्याची मदत कर्जात कापल्या जात असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या पथकासमोर सिंचन, कालव्याचे अर्धवट काम, कृषी पंपावरील भारनियमन आदी समस्या मांडल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली. या पथकाने चापर्डा येथे एका झाडाखाली सभा घेतली. त्यानंतर अशोक कांबळे आणि सुभाष सरोदे यांच्या वाळलेल्या सत्रा बागेची पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव अनुभवून पथकातील सदस्यही अस्वस्थ झाले होते. हा अहवाल पथक केंद्र सरकारला सादर करेल, त्यानंतर मदतीची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)