शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

गळव्हाचे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:53 IST

‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली.

ठळक मुद्दे‘अमृत’चे पाईप फुटले : नुकसान भरपाईसाठी पाच दिवसांपासून हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाऱ्या समन्वयकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला जात आहे. शेतात योजनेचे काम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.बेंबळा धरणावरून यवतमाळसाठी पाणी आणण्याकरिता शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शनिवारी गळव्हा गावाजवळ पाईपलाईन फुटली. वाहून गेलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले. अक्षरश: शेतातून पूर गेला. पेरलेले बियाणे, टाकलेले खत वाहून गेले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशीराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव कुकडे हे शेतकरी गेली पाच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. जिल्हाधिकारी, मजीप्राचे अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले. परंतु कुणीही त्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. योजनेच्या कंत्राटदाराने समन्वयकाकडे बोट दाखविले.बुधवारी या शेतकऱ्यांनी समन्वयक दिनेश बोरकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तर दूरच चक्क हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुठेही न्याय मिळण्याची आशा दिसत नसल्याने आता या शेतकऱ्यांनी योजनेच्या कामासाठी शेतात कुणालाही पाय ठेऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

टॅग्स :Farmerशेतकरी