शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गळव्हाचे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:53 IST

‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली.

ठळक मुद्दे‘अमृत’चे पाईप फुटले : नुकसान भरपाईसाठी पाच दिवसांपासून हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाऱ्या समन्वयकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला जात आहे. शेतात योजनेचे काम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.बेंबळा धरणावरून यवतमाळसाठी पाणी आणण्याकरिता शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शनिवारी गळव्हा गावाजवळ पाईपलाईन फुटली. वाहून गेलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले. अक्षरश: शेतातून पूर गेला. पेरलेले बियाणे, टाकलेले खत वाहून गेले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशीराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव कुकडे हे शेतकरी गेली पाच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. जिल्हाधिकारी, मजीप्राचे अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले. परंतु कुणीही त्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. योजनेच्या कंत्राटदाराने समन्वयकाकडे बोट दाखविले.बुधवारी या शेतकऱ्यांनी समन्वयक दिनेश बोरकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तर दूरच चक्क हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुठेही न्याय मिळण्याची आशा दिसत नसल्याने आता या शेतकऱ्यांनी योजनेच्या कामासाठी शेतात कुणालाही पाय ठेऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

टॅग्स :Farmerशेतकरी