शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

गळव्हाचे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:53 IST

‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली.

ठळक मुद्दे‘अमृत’चे पाईप फुटले : नुकसान भरपाईसाठी पाच दिवसांपासून हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाऱ्या समन्वयकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला जात आहे. शेतात योजनेचे काम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.बेंबळा धरणावरून यवतमाळसाठी पाणी आणण्याकरिता शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शनिवारी गळव्हा गावाजवळ पाईपलाईन फुटली. वाहून गेलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले. अक्षरश: शेतातून पूर गेला. पेरलेले बियाणे, टाकलेले खत वाहून गेले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशीराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव कुकडे हे शेतकरी गेली पाच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. जिल्हाधिकारी, मजीप्राचे अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले. परंतु कुणीही त्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. योजनेच्या कंत्राटदाराने समन्वयकाकडे बोट दाखविले.बुधवारी या शेतकऱ्यांनी समन्वयक दिनेश बोरकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तर दूरच चक्क हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुठेही न्याय मिळण्याची आशा दिसत नसल्याने आता या शेतकऱ्यांनी योजनेच्या कामासाठी शेतात कुणालाही पाय ठेऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

टॅग्स :Farmerशेतकरी