शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

गळव्हाचे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:53 IST

‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली.

ठळक मुद्दे‘अमृत’चे पाईप फुटले : नुकसान भरपाईसाठी पाच दिवसांपासून हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाऱ्या समन्वयकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला जात आहे. शेतात योजनेचे काम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.बेंबळा धरणावरून यवतमाळसाठी पाणी आणण्याकरिता शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शनिवारी गळव्हा गावाजवळ पाईपलाईन फुटली. वाहून गेलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले. अक्षरश: शेतातून पूर गेला. पेरलेले बियाणे, टाकलेले खत वाहून गेले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशीराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव कुकडे हे शेतकरी गेली पाच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. जिल्हाधिकारी, मजीप्राचे अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले. परंतु कुणीही त्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. योजनेच्या कंत्राटदाराने समन्वयकाकडे बोट दाखविले.बुधवारी या शेतकऱ्यांनी समन्वयक दिनेश बोरकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तर दूरच चक्क हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुठेही न्याय मिळण्याची आशा दिसत नसल्याने आता या शेतकऱ्यांनी योजनेच्या कामासाठी शेतात कुणालाही पाय ठेऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

टॅग्स :Farmerशेतकरी