शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

ग्रामीण डाकसेवेची कामे ठप्प

By admin | Updated: March 14, 2015 02:20 IST

अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने डाकसेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे ग्रामीण डाकसेवा ठप्प झाली आहे.

यवतमाळ : अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने डाकसेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे ग्रामीण डाकसेवा ठप्प झाली आहे. याचा फटका जिल्ह्यातील गावांना बसला आहे. वीज बिल वसुली आणि पेपरसेट पोहचविण्याचे काम प्रभावित झाले आहेत. तर अनेक डाक पोहचविणाऱ्या पिशव्या कार्यालयातच थांबविण्यात आल्या आहेत. अखील भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने संपूर्ण देशभरात संप पुकारला. या संपाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्ह्यात ६८६ ग्रामीण डाकसेवक आहेत. यातील अर्धे डाकसेवक सध्या संपावर आहेत तर अर्धे कामावर आहे. यामुळे बंद ठिकाणी पत्रव्यवहार थांबला आहे. डाक विभागाकडे पत्रव्यवहारासोबत स्पीडपोस्ट, मनिआॅर्डर आणि वीज बिल वसुली सोबत मोबाईल बिल पोहचविण्याचे काम आहे. जे डाक कार्यालय संपावर आहे अशांच्या पिशव्या मुख्य डाकघरात जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ विभागीय डाक विभागासमोर बेमुदत धरणे आंदोलन डाक कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील डाक वितरणाचे कामच ठप्प झाले आहे. याचा फटका ग्रामीण भागाला बसला. डाक विभागाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, सातव्या वेतन आयोगात सर्व जीडीएसना सामावून घेण्यात यावे, ५० टक्के महागाई भत्ता वेतनात समाविष्ट करण्यात यावा, अनुकंपा नोकरी मयत कुटुंबातील नातेवाईकांना देण्यात यावी, ग्रामीण डाकसेवकांना राष्ट्रीय स्वास्थ वीमा योजना लागू करण्यात यावी यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याची भूमिका ग्रामीण डाकसेवकांनी घेतली आहे. यामुळे कामकाज प्रभावित होणार आहे. संघटणेचे विभागीय अध्यक्ष सत्यनारायणजी यमजलवार, विभागिय सचिव गजानन ठाकरे, यु.जी. देवसरकर, व्ही.एस.माने, धनपाल शंभरकर, एस.एम.राऊत, आर.आय.पोटे, एस.एस. सुखसोहळे, विलास मुंदे, आर.एम.पारीसे, आर.ए.भुरे, बि.एम. माकोडे, विनोद कावळे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)