शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

शौचालयाच्या अटीने ग्रामीण योजना थांबल्या

By admin | Updated: June 22, 2017 01:06 IST

प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घातली गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत

जिल्हा परिषद : राहायलाच घर नाही, शौचालय बांधावे कुठे ? लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घातली गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेने ग्रामीण गोरगरीब जनतेच्या अडचणी ओळखून शौचालयाची ही अट रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. पाच एकर शेती असलेल्या बीपीएल धारकाला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये दिले जातात. तर एपीएलमध्ये मोडणाऱ्यांना रोजगार हमी योजनेतून शौचालयासाठी लाभ दिला जातो. त्यांना स्वत: आधी शौचालय बांधलेले दाखवावे लागते. आता तर गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गावे वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात भाऊबंदकीच्या भांडणामुळे एका घराचे अनेक तुकडे पडले आहेत. कित्येकांची गुजराण एका खोलीत सुरू आहे. रहायलाच जागा नसताना शौचालय बांधण्यासाठी जागा आणायची कोठून असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कित्येक कुटुंब गावात अतिक्रमण करून राहात आहेत. मग या अतिक्रमणाच्या जागेत शौचालय बांधायचे काय असा त्यांचा सवाल आहे. पूर्वी योजनांच्या अंमलबजावणीसाठी हागणदारीमुक्तीचे टप्पे होते. ७० टक्के गाव हागणदारीमुक्त झाल्यास त्याला योजनांचा लाभ दिला जात होता. परंतु ही अट आता १०० टक्के केल्याने ग्रामीण विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात अतिक्रमणात राहणाऱ्या कुटुंबांची संख्या डझनावर आहेत. त्यांच्यापुढे पेच झाला आहे. या कुटुंबांमुळे गाव हागणदारीमुक्तीचा १०० टक्केचा आकडा गाठू शकत नाही. पर्यायाने गावाचा विकास खुंटला आहे. आॅनलाईनचा डांगोराच डिजीटायझेशनची सक्ती करून आॅनलाईनचा डांगोरा शासनाकडून पिटला जात असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात आजही हस्तलिखीतावरच कामकाज चालविले जात आहे. जन्म-मृत्यूचे प्रमाणसुद्धा आॅनलाईन मिळत नाही. आपले सरकार हे पोर्टल पूर्णपणे सुरू झालेले नाही. बहुतांश दाखले हस्तलिखितच दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या ‘पेपरलेस’चे काय ? शासनाच्या सर्व कार्यालयातील कामकाज ‘पेपरलेस’ करण्यावर सरकारचा भर असला तरी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयातील विविध १४ विभाग ‘पेपरलेस’ करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आजही फाईली वेगवेगळ्या टेबलवर फिरत असून त्याचा आर्थिक फटकाही संबंधितांना सहन करावा लागतो आहे. अकाऊंटमध्ये प्रशासनाची ‘मास्टरी’ असतानाही कामकाज ‘पेपरलेस’ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीतील १४ विभागच अद्याप ‘पेपरलेस’ झाले नसताना ग्रामीण शासकीय यंत्रणेवर त्यासाठी दबाव कशासाठी असा नैतिकतेचा प्रश्नही ग्रामीण यंत्रणेकडून उपस्थित केला जात आहे.