शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या अटीने ग्रामीण योजना थांबल्या

By admin | Updated: June 22, 2017 01:06 IST

प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घातली गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत

जिल्हा परिषद : राहायलाच घर नाही, शौचालय बांधावे कुठे ? लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घातली गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेने ग्रामीण गोरगरीब जनतेच्या अडचणी ओळखून शौचालयाची ही अट रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. पाच एकर शेती असलेल्या बीपीएल धारकाला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये दिले जातात. तर एपीएलमध्ये मोडणाऱ्यांना रोजगार हमी योजनेतून शौचालयासाठी लाभ दिला जातो. त्यांना स्वत: आधी शौचालय बांधलेले दाखवावे लागते. आता तर गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गावे वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात भाऊबंदकीच्या भांडणामुळे एका घराचे अनेक तुकडे पडले आहेत. कित्येकांची गुजराण एका खोलीत सुरू आहे. रहायलाच जागा नसताना शौचालय बांधण्यासाठी जागा आणायची कोठून असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कित्येक कुटुंब गावात अतिक्रमण करून राहात आहेत. मग या अतिक्रमणाच्या जागेत शौचालय बांधायचे काय असा त्यांचा सवाल आहे. पूर्वी योजनांच्या अंमलबजावणीसाठी हागणदारीमुक्तीचे टप्पे होते. ७० टक्के गाव हागणदारीमुक्त झाल्यास त्याला योजनांचा लाभ दिला जात होता. परंतु ही अट आता १०० टक्के केल्याने ग्रामीण विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात अतिक्रमणात राहणाऱ्या कुटुंबांची संख्या डझनावर आहेत. त्यांच्यापुढे पेच झाला आहे. या कुटुंबांमुळे गाव हागणदारीमुक्तीचा १०० टक्केचा आकडा गाठू शकत नाही. पर्यायाने गावाचा विकास खुंटला आहे. आॅनलाईनचा डांगोराच डिजीटायझेशनची सक्ती करून आॅनलाईनचा डांगोरा शासनाकडून पिटला जात असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात आजही हस्तलिखीतावरच कामकाज चालविले जात आहे. जन्म-मृत्यूचे प्रमाणसुद्धा आॅनलाईन मिळत नाही. आपले सरकार हे पोर्टल पूर्णपणे सुरू झालेले नाही. बहुतांश दाखले हस्तलिखितच दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या ‘पेपरलेस’चे काय ? शासनाच्या सर्व कार्यालयातील कामकाज ‘पेपरलेस’ करण्यावर सरकारचा भर असला तरी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयातील विविध १४ विभाग ‘पेपरलेस’ करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आजही फाईली वेगवेगळ्या टेबलवर फिरत असून त्याचा आर्थिक फटकाही संबंधितांना सहन करावा लागतो आहे. अकाऊंटमध्ये प्रशासनाची ‘मास्टरी’ असतानाही कामकाज ‘पेपरलेस’ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीतील १४ विभागच अद्याप ‘पेपरलेस’ झाले नसताना ग्रामीण शासकीय यंत्रणेवर त्यासाठी दबाव कशासाठी असा नैतिकतेचा प्रश्नही ग्रामीण यंत्रणेकडून उपस्थित केला जात आहे.