शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

बाबासाहेबांच्या जयंतीपासून प्रत्येक शाळेपर्यंत जाणार पुस्तकांचा अमृतकुंभ 

By अविनाश साबापुरे | Updated: April 11, 2023 17:59 IST

गुणवत्तावाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना : दोन हजार शाळांसाठी फिरते वाचनालय 

यवतमाळ : केवळ दप्तरातली पुस्तकं वाचूनच ज्ञान मिळते असे नाही, तर त्यासाठी शाळेच्या पलिकडची अवांतर पुस्तकेही वाचणे आवश्यक असते. हाच धागा हेरून आता जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांसाठी ‘पुस्तकांचा अमृत कुंभ’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या वाचन उपक्रमाचा आरंभ भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून केला जाणार आहे.

देशातील १० शैक्षणिक मागास जिल्ह्यांच्या (एलपीडी) यादीतून यवतमाळला बाहेर काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभाग जंग जंग पछाडत आहे. त्यांच्या प्रयत्नाला नव्या संकल्पनेची जोड देण्यासाठी आता जिल्हा प्रशासनही सरसावले आहे. ‘अमृत कुंभ’ हा उपक्रम म्हणजे फिरते वाचनालय आहे. हे वाचनालय एकेक शाळा करीत ठराविक कालावधीत जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक शाळांपर्यंत जाणार आहे.

प्रत्येक शाळेला त्यातील पुस्तके वाचण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनामार्फत या वाचनालयाकरिता पुस्तके पुरविली जाणार आहे. मात्र या वाचनालयातील पुस्तकांचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, संघटना, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व्यक्तींकडून दान स्वरुपात पुस्तके स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी मुक्तहस्ते या वाचनालयाकरिता शिक्षण विभागाला  पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२६-२७ पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि गणितीय कौशल्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्या अनुषंगाने ‘निपुण भारत’ हे अभियानही राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने फिरत्या वाचनालयाची संकल्पना पुढे आणली आहे. 

१६ तालुक्यांना ३२ संच देणार

अमृत कुंभ म्हणजे २२१ पुस्तकांचा एक संच राहणार आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाकडून ३२ संच दिले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील दोन अशा एकंदर ३२ केंद्रांना या संचांचे वाटप केले जाणार आहे. एका केंद्रातील सर्व शाळांमध्ये ही पुस्तके आळीपाळीने पोहोचतील. त्यानंतर हा अमृतकुंभ संच दुसऱ्या केंद्राकडे हस्तांतरित केला जाणार आहे. शाळा-शाळांमध्ये आणि वर्गा-वर्गांमध्ये पुस्तकांची देवाणघेवाण सुलभ व्हावी यासाठी पुस्तकांचा अमृत कुंभ तीन मोठ्या कापडी पिशव्यांच्या माध्यमातून पुरविला जाणार आहे. 

उद्या जिल्हा परिषदेत वितरण 

अमृत कुंभ उपक्रमातील पुस्तकांचे वितरण गुरुवारी १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केले जाणार आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या वितरण समारंभाला शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी तथा सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीदिनापासून या पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन सुरू होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यातील केंद्रांमध्ये वाचन आटोपल्यानंतर उन्हाळी सुटीच्या कालावधीतही वेगळ्या प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlibraryवाचनालयYavatmalयवतमाळStudentविद्यार्थीdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती