शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या जयंतीपासून प्रत्येक शाळेपर्यंत जाणार पुस्तकांचा अमृतकुंभ 

By अविनाश साबापुरे | Updated: April 11, 2023 17:59 IST

गुणवत्तावाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना : दोन हजार शाळांसाठी फिरते वाचनालय 

यवतमाळ : केवळ दप्तरातली पुस्तकं वाचूनच ज्ञान मिळते असे नाही, तर त्यासाठी शाळेच्या पलिकडची अवांतर पुस्तकेही वाचणे आवश्यक असते. हाच धागा हेरून आता जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांसाठी ‘पुस्तकांचा अमृत कुंभ’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या वाचन उपक्रमाचा आरंभ भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून केला जाणार आहे.

देशातील १० शैक्षणिक मागास जिल्ह्यांच्या (एलपीडी) यादीतून यवतमाळला बाहेर काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभाग जंग जंग पछाडत आहे. त्यांच्या प्रयत्नाला नव्या संकल्पनेची जोड देण्यासाठी आता जिल्हा प्रशासनही सरसावले आहे. ‘अमृत कुंभ’ हा उपक्रम म्हणजे फिरते वाचनालय आहे. हे वाचनालय एकेक शाळा करीत ठराविक कालावधीत जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक शाळांपर्यंत जाणार आहे.

प्रत्येक शाळेला त्यातील पुस्तके वाचण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनामार्फत या वाचनालयाकरिता पुस्तके पुरविली जाणार आहे. मात्र या वाचनालयातील पुस्तकांचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, संघटना, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व्यक्तींकडून दान स्वरुपात पुस्तके स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी मुक्तहस्ते या वाचनालयाकरिता शिक्षण विभागाला  पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२६-२७ पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि गणितीय कौशल्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्या अनुषंगाने ‘निपुण भारत’ हे अभियानही राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने फिरत्या वाचनालयाची संकल्पना पुढे आणली आहे. 

१६ तालुक्यांना ३२ संच देणार

अमृत कुंभ म्हणजे २२१ पुस्तकांचा एक संच राहणार आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाकडून ३२ संच दिले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील दोन अशा एकंदर ३२ केंद्रांना या संचांचे वाटप केले जाणार आहे. एका केंद्रातील सर्व शाळांमध्ये ही पुस्तके आळीपाळीने पोहोचतील. त्यानंतर हा अमृतकुंभ संच दुसऱ्या केंद्राकडे हस्तांतरित केला जाणार आहे. शाळा-शाळांमध्ये आणि वर्गा-वर्गांमध्ये पुस्तकांची देवाणघेवाण सुलभ व्हावी यासाठी पुस्तकांचा अमृत कुंभ तीन मोठ्या कापडी पिशव्यांच्या माध्यमातून पुरविला जाणार आहे. 

उद्या जिल्हा परिषदेत वितरण 

अमृत कुंभ उपक्रमातील पुस्तकांचे वितरण गुरुवारी १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केले जाणार आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या वितरण समारंभाला शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी तथा सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीदिनापासून या पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन सुरू होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यातील केंद्रांमध्ये वाचन आटोपल्यानंतर उन्हाळी सुटीच्या कालावधीतही वेगळ्या प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlibraryवाचनालयYavatmalयवतमाळStudentविद्यार्थीdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती