शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

मदतीसाठी रायुकाँचे हवा सोडो आंदोलन

By admin | Updated: December 8, 2014 22:40 IST

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आणि जिल्हाध्यक्ष आशीष मानकर यांच्या नेतृत्त्वात निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनातील हवा सोडण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात तातडीने दुष्काळी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, चारा छावण्या, पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था, दुष्काळग्रस्त गावात पाणीपुरवठ्यासंबंधी योजना मंजूर कराव्यात, त्यासंबंधीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावे, ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वाडी, वस्त्यांवर पाण्यासाठी सिन्टेक्सच्या टाक्या बसवून व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने तातडीने मागण्या पूर्ण न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची हवा सोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, सुमित बाजोरिया, पंकज मुंदे, नीलेश राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)