शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:01 IST

यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : मदतीची प्रतीक्षा, नव्या हंगामासाठी पैैशाची जुळवाजुळव

आॅनलाईन लोकमतवणी : यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शासनस्तरावर बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याच्या गप्पा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहचेल, याबाबत संभ्रम आहे.यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी मंगळवारी घोषणा केली. एनडीआरएफमार्फत बोंडअळीग्रस्त शेताची पाहणी करून त्यानंतर शेतकºयांना मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र या मदतीला ‘कर्जमाफी’चे स्वरूप तर येणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्रत्यक्षात एक खडकूही शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा झाला नाही, हे विशेष. यंदा बोंडअळीच्या संकटाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. त्यात बिटी बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा वणी तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र कधी नव्हे ईतका बोंडअळीचा प्रकोप झाल्याने एका वेचणीनंतरच कपाशी उद्ध्वस्त झाली. दरवर्षी फेबु्रवारीपर्यंत शेतात कापसाची झाडे उभी असतात.यादरम्यान, दहापेक्षा अधिक कापूस वेचण्या होतात. मात्र यावर्षी एका कापूस वेचणीनंतरच सर्वच कापूस बोंडांना गुलाबी बोंडअळीने पोखरून टाकले. विशेष म्हणजे ही अळी बोंडात शिरून स्वत:च्या विष्ठेने बोंडाची सुक्ष्म छित्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर कोणत्याही औैषधांची फवारणी केली तरी त्याचा परिणाम अळीवर होत नाही. कृषी विभागाकडून वारंवार फवारणीचा सल्ला देण्यात आला. मात्र ही फवारणी कुचकामी ठरली. ही अळी सहा महिन्यांपर्यंत कोष करून त्यात जीवंत राहू शकते. त्यामुळे कपाशीची झाडे जाळून टाकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. त्यामुळे बोंडअळीचा नायनाट होईल, असा दावा केला जात आहे.कपाशीवर नांगर फिरवून रबीची तयारीकपाशीचे पीक हातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकºयांनी रबी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांचे शेत मात्र खरीप हंगामापर्यंत मोकळे राहणार आहे. एकूणच यावर्षी आलेल्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कपाशीचे उत्पादनही निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने, कर्जाची परतफेड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे.