शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:01 IST

यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : मदतीची प्रतीक्षा, नव्या हंगामासाठी पैैशाची जुळवाजुळव

आॅनलाईन लोकमतवणी : यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शासनस्तरावर बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याच्या गप्पा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहचेल, याबाबत संभ्रम आहे.यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी मंगळवारी घोषणा केली. एनडीआरएफमार्फत बोंडअळीग्रस्त शेताची पाहणी करून त्यानंतर शेतकºयांना मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र या मदतीला ‘कर्जमाफी’चे स्वरूप तर येणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्रत्यक्षात एक खडकूही शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा झाला नाही, हे विशेष. यंदा बोंडअळीच्या संकटाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. त्यात बिटी बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा वणी तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र कधी नव्हे ईतका बोंडअळीचा प्रकोप झाल्याने एका वेचणीनंतरच कपाशी उद्ध्वस्त झाली. दरवर्षी फेबु्रवारीपर्यंत शेतात कापसाची झाडे उभी असतात.यादरम्यान, दहापेक्षा अधिक कापूस वेचण्या होतात. मात्र यावर्षी एका कापूस वेचणीनंतरच सर्वच कापूस बोंडांना गुलाबी बोंडअळीने पोखरून टाकले. विशेष म्हणजे ही अळी बोंडात शिरून स्वत:च्या विष्ठेने बोंडाची सुक्ष्म छित्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर कोणत्याही औैषधांची फवारणी केली तरी त्याचा परिणाम अळीवर होत नाही. कृषी विभागाकडून वारंवार फवारणीचा सल्ला देण्यात आला. मात्र ही फवारणी कुचकामी ठरली. ही अळी सहा महिन्यांपर्यंत कोष करून त्यात जीवंत राहू शकते. त्यामुळे कपाशीची झाडे जाळून टाकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. त्यामुळे बोंडअळीचा नायनाट होईल, असा दावा केला जात आहे.कपाशीवर नांगर फिरवून रबीची तयारीकपाशीचे पीक हातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकºयांनी रबी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांचे शेत मात्र खरीप हंगामापर्यंत मोकळे राहणार आहे. एकूणच यावर्षी आलेल्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कपाशीचे उत्पादनही निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने, कर्जाची परतफेड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे.