शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

साठेबाजीमुळे ढेप २२०० रुपयांवर

By admin | Updated: December 25, 2015 03:12 IST

सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पशुपालकांपुढे संकटयवतमाळ : सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बँका कर्ज देत नाहीत आणि दिले तरी नापिकीमुळे ते भरणे होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे सावकाराच्या दारी जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. सावकार अव्वाच्या सव्वा भाव लावून त्यांना लुटतो. नापिकीमुळे आर्थिक संकटात असतानाच आपले पशूधन (जनावरे) जगवायचे कसे, असा पेच शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कारण या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा झाला आहे. केवळ हिरव्या चाऱ्यावर जनावराचे भागत नाही आणि पावसाअभावी हिरवा चाराच शिल्लक नाही. सरकीपासून बनविली जाणारी ढेप हा जनावरांचा प्रमुख आहार आहे. मात्र ढेपीचे भाव अचानक १४०० रुपयावरून थेट २२०० ते २३०० रुपये प्रति क्ंिवटलवर पोहोचले आहे. ढेपीचे भाव ६०० ते ८०० रुपयांनी अचानक वाढण्यामागे साठेबाजी हे प्रमुख कारण पुढे आले आहे. यवतमाळ शहर व जिल्ह्यात अनेक आॅईल मिल मालकांकडून ढेप खरेदी करून त्याचे साठे करण्यात आले आहे. त्यातूनच प्रचंड भाववाढ झाली आहे. या साठेबाजीतून आॅईल मिल मालकही दूर नाहीत. ढेपीची ही भाववाढ शेतकऱ्यांच्या व पशुपालकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये ढेपीचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. या टंचाईआड दररोज ढेपेच्या दरात भाववाढ होत आहे. शेतकऱ्याच्या कापसाला आता कुठे ४५०० रूपये प्रति क्ंिवटल भाव मिळतो आहे. मात्र प्रत्यक्षात आता बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूसच नाही. भाव वाढणार नाही, हमीभाव हेच सर्वाधिक असे वातावरण निर्माण केले गेल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पडेल भावात कापूस विकावा लागण्याच्या भीतीने पणन महासंघ व सीसीआयला कमी दरात कापूस विकला आहे. आज मात्र खासगी बाजारात कापसाचा भाव वाढला असला तरी त्याचा फायदा बहुतांश व्यापाऱ्यांनाच होतो आहे. कारण कापूस असलेले अवघे बोटावर मोजण्याऐवढे शेतकरी शिल्लक आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. कपाशीचे बियाणेही महागीने खरेदी करावे लागतात. असे असताना याच कापसातील रूईपासून बनलेली ढेप मात्र काळाबाजार करून याच शेतकऱ्यांना २२०० ते २३०० रुपये प्रति क्ंिवटल दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. आर्थिक चक्रात फसलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्याऐवजी व्यापारी-दलाल व साठेबाज आणखी त्यांना खड्ड्यात लोटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने जिल्हाभरातील ढेपीच्या साठेबाजांचा शोध घेऊन त्यांच्या गोदामांवर धाडी घालाव्या आणि जनावरांचा चारा पूर्ववत १२०० ते १४०० रुपये प्रति क्ंिवटल दराने उपलब्ध करून द्यावा, त्यावर प्रशासनाने कायम नियंत्रण ठेऊन हजारो पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. एकीकडे शासनाने गो-हत्याबंदी केली आहे. त्यामुळे कशाही परिस्थितीत जनावरांना जगवावे लागत आहे. नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणा यामुळे आधीच शेतकरी पिचला आहे. त्यातून आत्महत्या होत आहे. आता त्यात जनावरांच्या चाऱ्याची महागाई व साठेबाजीची भर पडल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे जगविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची चहूबाजूने कोंडी झाली आहे. ही कोंडी ढेपीच्या साठेबाजांवर धाडी घालून फोडणे शक्य आहे. जिल्हा पुरवठा विभाग, सर्व तहसीलदार व एसडीओंना अशा साठेबाजांच्या मुसक्या आवळण्याची मागणी पशुपालक व दूध उत्पादकांमधून पुढे आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)