शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

१०० कोटींवर निधी अखर्चित

By admin | Updated: August 8, 2015 02:34 IST

राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी अखर्चित निधीचा हिशोब मागविण्यात आला आहे.

जिल्हा परिषद योजना : तीन वर्षांतील शिलकीच्या आकड्याने सर्वांनाच धक्का यवतमाळ : राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी अखर्चित निधीचा हिशोब मागविण्यात आला आहे. यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अखर्चित निधीची गोळाबेरीज केली असता हा आकडा १०० कोटींच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे लेखा विभागही हादरला असून खरोखरच इतका निधी शिल्लक आहे काय, याची गोळा बेरीज करण्यात गुंतलेला आहे. शासनाकडून ग्रामविकासाच्या विविध योजनांसाठी भरपूर निधी दिला जातो. मात्र योजनांची अंमलबाजवणीच होत नाही. परिणामी दोन वर्षाच्या मुदती नंतरही हा निधी अखर्चित राहतो. जिल्हा परिषदेत २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या आर्थिक वर्षातील विविध योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येत आहे. राज्यशासनाने सर्वच विभागांना अखर्चित निधी तातडीने जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दोन वर्षांची मुदत संपूनही शिल्लक असलेल्या निधीचा हिशोब जुळविण्यात येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक निधी हा वेतनाचा शिल्लक आहे. यात आरोग्य विभाग आघाडीवर आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम, जवाहर रोजगार विहीर योजनेचा निधी, विविध कंत्राटासाठी जमा केलेले सिक्युरिटी डिपॉझीट, शिक्षण विभागातील शाळा इमारत बांधकामाचे अनुदान वेळेत खर्च झाले नाही. यासाठी वाढीव मुदत घेऊनही बराच निधी शिल्लक राहिला आहे. याचप्रमाणे, समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी विभाग, पाणी पुरवठा व संपूर्ण स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, सिंचन विभाग, पंचायत विभाग येथील निधीसुध्दा अखर्चित आहे. मात्र मागील तीन वर्षांचा हा हिशोब जुळविताना लेखा विभागाचीही दमछाक होत आहे. नेमका कोणत्या विभागाचा निधी किती, याची पडताळणी सुरू आहे. राज्य शासनानेच अखर्चित निधीचा मुद्दा उपस्थित केल्याने जिल्हा परिषदेचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. कोणतेही काम त्याच आर्थिक वर्षात पूर्ण करणे येथे शक्य होत नाही. विविध बैठकांची मंजुरी, त्यामध्ये सुचविल्या जाणाऱ्या दुरूस्त्या, त्यानंतरही अधिकारी वर्गाकडून मर्जीतील व्यक्तीचा शोध या प्रक्रियेमुळे निधी असूनही कामे होत नाही. परिणामी आर्थिक वर्ष संपल्यानंतर कामासाठी वाढीव मुदत घेतली जाते. त्यानंरही या काळात काम पूर्ण होत नाही. कामाच्या या पद्धतीमुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. अद्याप अखर्चित निधीचा ठोस आकडा स्पष्ट झाला नसला तरी वरकरणी १०० कोटी शिल्लक असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास नाही. (कार्यालय प्रतिनिधी)