शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

१०० कोटींवर निधी अखर्चित

By admin | Updated: August 8, 2015 02:34 IST

राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी अखर्चित निधीचा हिशोब मागविण्यात आला आहे.

जिल्हा परिषद योजना : तीन वर्षांतील शिलकीच्या आकड्याने सर्वांनाच धक्का यवतमाळ : राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी अखर्चित निधीचा हिशोब मागविण्यात आला आहे. यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अखर्चित निधीची गोळाबेरीज केली असता हा आकडा १०० कोटींच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे लेखा विभागही हादरला असून खरोखरच इतका निधी शिल्लक आहे काय, याची गोळा बेरीज करण्यात गुंतलेला आहे. शासनाकडून ग्रामविकासाच्या विविध योजनांसाठी भरपूर निधी दिला जातो. मात्र योजनांची अंमलबाजवणीच होत नाही. परिणामी दोन वर्षाच्या मुदती नंतरही हा निधी अखर्चित राहतो. जिल्हा परिषदेत २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या आर्थिक वर्षातील विविध योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येत आहे. राज्यशासनाने सर्वच विभागांना अखर्चित निधी तातडीने जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दोन वर्षांची मुदत संपूनही शिल्लक असलेल्या निधीचा हिशोब जुळविण्यात येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक निधी हा वेतनाचा शिल्लक आहे. यात आरोग्य विभाग आघाडीवर आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम, जवाहर रोजगार विहीर योजनेचा निधी, विविध कंत्राटासाठी जमा केलेले सिक्युरिटी डिपॉझीट, शिक्षण विभागातील शाळा इमारत बांधकामाचे अनुदान वेळेत खर्च झाले नाही. यासाठी वाढीव मुदत घेऊनही बराच निधी शिल्लक राहिला आहे. याचप्रमाणे, समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी विभाग, पाणी पुरवठा व संपूर्ण स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, सिंचन विभाग, पंचायत विभाग येथील निधीसुध्दा अखर्चित आहे. मात्र मागील तीन वर्षांचा हा हिशोब जुळविताना लेखा विभागाचीही दमछाक होत आहे. नेमका कोणत्या विभागाचा निधी किती, याची पडताळणी सुरू आहे. राज्य शासनानेच अखर्चित निधीचा मुद्दा उपस्थित केल्याने जिल्हा परिषदेचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. कोणतेही काम त्याच आर्थिक वर्षात पूर्ण करणे येथे शक्य होत नाही. विविध बैठकांची मंजुरी, त्यामध्ये सुचविल्या जाणाऱ्या दुरूस्त्या, त्यानंतरही अधिकारी वर्गाकडून मर्जीतील व्यक्तीचा शोध या प्रक्रियेमुळे निधी असूनही कामे होत नाही. परिणामी आर्थिक वर्ष संपल्यानंतर कामासाठी वाढीव मुदत घेतली जाते. त्यानंरही या काळात काम पूर्ण होत नाही. कामाच्या या पद्धतीमुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. अद्याप अखर्चित निधीचा ठोस आकडा स्पष्ट झाला नसला तरी वरकरणी १०० कोटी शिल्लक असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास नाही. (कार्यालय प्रतिनिधी)