शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

शेतकरी संघटनेचा रूमणे मोर्चा

By admin | Updated: January 31, 2015 00:17 IST

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने ...

दारव्हा : दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर रूमणे मोर्चा काढण्यात आला.शेतकरी नेते सुरेश गावंडे यांनी एकट्याने पुढाकार घेऊन काढलेल्या या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकरी बैलगाड्या, रूमणे घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते.आर्णी रोडवरील सर्कस मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचला. तिथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश गावंडे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजवर कडाडून टीका केली.ते म्हणाले सात हजार करोड रुपयाचे पॅकेज दिले असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ८४२ करोडचीच मदत होणार आहे. उर्वरित पैशाने वेगवेगळ्या मार्गाने कारखानदार, सावकार बँक, वीज मंडळाचे खिसे भरले जाणार आहे. पॅकेजची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिल्या गेली असती तर हेक्टरी ४० हजार रुपये मदत मिळाली असती, मदतीचे निकष ठरविताना शासनाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा भेदभाव केल्याचा आरोप सुरेश गावंडे यांनी केला.उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्य शासनाने वचननाम्याप्रमाणे सातबारा कोरा करावा, कापसाला सात हजार तर सोयाबीनला पाच हजार, तुरीला सहा हजार हमी भाव ठरवावा, घरगुती वीज बिलात दरवाढ करू नये, वनजमिनीलगतच्या शेताला तार कुंपन करण्यात यावे, युरियाचे वाढलेले भाव कमी करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. सुरेश गावंडे यांनी मोर्चाचे आयोजन करताना गावागावात फिरून जागृती केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)