शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचा रूमणे मोर्चा

By admin | Updated: January 31, 2015 00:17 IST

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने ...

दारव्हा : दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर रूमणे मोर्चा काढण्यात आला.शेतकरी नेते सुरेश गावंडे यांनी एकट्याने पुढाकार घेऊन काढलेल्या या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकरी बैलगाड्या, रूमणे घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते.आर्णी रोडवरील सर्कस मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचला. तिथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश गावंडे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजवर कडाडून टीका केली.ते म्हणाले सात हजार करोड रुपयाचे पॅकेज दिले असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ८४२ करोडचीच मदत होणार आहे. उर्वरित पैशाने वेगवेगळ्या मार्गाने कारखानदार, सावकार बँक, वीज मंडळाचे खिसे भरले जाणार आहे. पॅकेजची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिल्या गेली असती तर हेक्टरी ४० हजार रुपये मदत मिळाली असती, मदतीचे निकष ठरविताना शासनाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा भेदभाव केल्याचा आरोप सुरेश गावंडे यांनी केला.उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्य शासनाने वचननाम्याप्रमाणे सातबारा कोरा करावा, कापसाला सात हजार तर सोयाबीनला पाच हजार, तुरीला सहा हजार हमी भाव ठरवावा, घरगुती वीज बिलात दरवाढ करू नये, वनजमिनीलगतच्या शेताला तार कुंपन करण्यात यावे, युरियाचे वाढलेले भाव कमी करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. सुरेश गावंडे यांनी मोर्चाचे आयोजन करताना गावागावात फिरून जागृती केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)