शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

शेतकरी संघटनेचा रूमणे मोर्चा

By admin | Updated: January 31, 2015 00:17 IST

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने ...

दारव्हा : दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर रूमणे मोर्चा काढण्यात आला.शेतकरी नेते सुरेश गावंडे यांनी एकट्याने पुढाकार घेऊन काढलेल्या या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकरी बैलगाड्या, रूमणे घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते.आर्णी रोडवरील सर्कस मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचला. तिथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश गावंडे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजवर कडाडून टीका केली.ते म्हणाले सात हजार करोड रुपयाचे पॅकेज दिले असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ८४२ करोडचीच मदत होणार आहे. उर्वरित पैशाने वेगवेगळ्या मार्गाने कारखानदार, सावकार बँक, वीज मंडळाचे खिसे भरले जाणार आहे. पॅकेजची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिल्या गेली असती तर हेक्टरी ४० हजार रुपये मदत मिळाली असती, मदतीचे निकष ठरविताना शासनाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा भेदभाव केल्याचा आरोप सुरेश गावंडे यांनी केला.उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्य शासनाने वचननाम्याप्रमाणे सातबारा कोरा करावा, कापसाला सात हजार तर सोयाबीनला पाच हजार, तुरीला सहा हजार हमी भाव ठरवावा, घरगुती वीज बिलात दरवाढ करू नये, वनजमिनीलगतच्या शेताला तार कुंपन करण्यात यावे, युरियाचे वाढलेले भाव कमी करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. सुरेश गावंडे यांनी मोर्चाचे आयोजन करताना गावागावात फिरून जागृती केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)