शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानी सावकारांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:33 IST

शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे.

ठळक मुद्देवणी उपविभाग : आंध्रातील सावकारांची दंडेली, प्रशासन अनभिज्ञ

ऑनलाईन लोकमतवणी : शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून आंध्रातील सावकारांचीही दंडेली सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून ग्रामीणांना लुटले जात आहे.गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानातील सावकारांची टोळी वणी, झरी, मारेगाव परिसरात ठिय्या देऊन असली तरी या बेकायदेशिर सावकारीबाबत प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. तालुक्याच्या ठिकाणी किरायाच्या खोल्या करून हे सावकार वास्तव्याला असल्याची माहिती एका जाणकाराने दिली. पाच ते सहा जणांचे हे टोळके ग्रामीण भागातील गरजूंना हेरून त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज आकारून पाच हजारापासून ते ५० हजारांपर्यंत कर्जाचे वाटप करीत आहेत. एखाद्याने एका हंमागात १० हजार रुपये कर्ज घेतले तर त्याला परतफेड करताना १३ हजार रुपये द्यावे लागत आहेत.या राजस्थानी सावकारांनी गावागावांत कमिशनवर आपले एजंट पेरले असून त्यांच्या माध्यमातून सावकारीचा हा अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. राजस्थानी सावकारांनी नेमलेले हे एजन्ट स्थानिक गावातीलच रहिवासी असून गरजू लोक त्यांच्या माध्यमातूनच सावकारांपर्यंत पोहचत आहे. जोपर्यंत हा एजन्ट कर्जदाराची शिफारस करीत नाही, तोपर्यंत संबंधिताला कर्ज दिले जात नाही. याबदल्यात एजन्टांनाही चांगले कमिशन मिळत आहे. कर्जाने दिलेल्या रकमेची वसुली करण्याची जबाबदारीदेखील या एजन्टांवरच सोपविली जाते.एजन्टाने शिफारस केल्यानंतर राजस्थानी सावकारांची ही टोळी सर्वप्रथम कर्जदाराच्या घरी जाऊन परिस्थितीची चाचपणी करतात. त्याच्या परिस्थितीची पाहणी करूनच त्यानुसार त्याला कर्जाची रक्कम दिली जाते.वणी, मारेगाव व झरी तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला जातो. यंदा मात्र कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन झाले. तूर उत्पादकांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. सर्वस्वी शेती व्यवसायावर अवलंबून असणाºया ग्रामीण भागातील आर्थिक घडी चांगलीच विस्कटली आहे. परिणामी त्याचाच गैरफायदा अवैध सावकारांकडून घेतला जात आहे. त्यातून ग्रामीण नागरिकांची लूट केली जात आहे. या अवैैध सावकारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे.अण्णांकडून कर्जाच्या रकमेसोबत साहित्याची विक्रीवणी, झरी, मारेगाव तालुक्यात राजस्थानी सावकारांचा प्रवेश होण्याअगोदर आंध्रप्रदेशातील अण्णांचा या भागात दबदबा होता. तो आताही आहे. मात्र या सावकारांचा कर्ज वाटपाचा फंडा आहे. या सावकारांकडून कर्जाच्या रकमेसोबत बॅटरी, ब्लँकेट यासारखे साहित्य कर्जदाराच्या माथी मारले जाते. विशेष म्हणजे दामदुप्पट किंमतीत हे साहित्य कर्जदाराला दिले जाते. ते पैसे कर्जासोबत वसुल केले जाते. त्यातून कर्जदाराची मोठी लूट होत आहे.