शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानी सावकारांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:33 IST

शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे.

ठळक मुद्देवणी उपविभाग : आंध्रातील सावकारांची दंडेली, प्रशासन अनभिज्ञ

ऑनलाईन लोकमतवणी : शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून आंध्रातील सावकारांचीही दंडेली सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून ग्रामीणांना लुटले जात आहे.गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानातील सावकारांची टोळी वणी, झरी, मारेगाव परिसरात ठिय्या देऊन असली तरी या बेकायदेशिर सावकारीबाबत प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. तालुक्याच्या ठिकाणी किरायाच्या खोल्या करून हे सावकार वास्तव्याला असल्याची माहिती एका जाणकाराने दिली. पाच ते सहा जणांचे हे टोळके ग्रामीण भागातील गरजूंना हेरून त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज आकारून पाच हजारापासून ते ५० हजारांपर्यंत कर्जाचे वाटप करीत आहेत. एखाद्याने एका हंमागात १० हजार रुपये कर्ज घेतले तर त्याला परतफेड करताना १३ हजार रुपये द्यावे लागत आहेत.या राजस्थानी सावकारांनी गावागावांत कमिशनवर आपले एजंट पेरले असून त्यांच्या माध्यमातून सावकारीचा हा अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. राजस्थानी सावकारांनी नेमलेले हे एजन्ट स्थानिक गावातीलच रहिवासी असून गरजू लोक त्यांच्या माध्यमातूनच सावकारांपर्यंत पोहचत आहे. जोपर्यंत हा एजन्ट कर्जदाराची शिफारस करीत नाही, तोपर्यंत संबंधिताला कर्ज दिले जात नाही. याबदल्यात एजन्टांनाही चांगले कमिशन मिळत आहे. कर्जाने दिलेल्या रकमेची वसुली करण्याची जबाबदारीदेखील या एजन्टांवरच सोपविली जाते.एजन्टाने शिफारस केल्यानंतर राजस्थानी सावकारांची ही टोळी सर्वप्रथम कर्जदाराच्या घरी जाऊन परिस्थितीची चाचपणी करतात. त्याच्या परिस्थितीची पाहणी करूनच त्यानुसार त्याला कर्जाची रक्कम दिली जाते.वणी, मारेगाव व झरी तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला जातो. यंदा मात्र कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन झाले. तूर उत्पादकांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. सर्वस्वी शेती व्यवसायावर अवलंबून असणाºया ग्रामीण भागातील आर्थिक घडी चांगलीच विस्कटली आहे. परिणामी त्याचाच गैरफायदा अवैध सावकारांकडून घेतला जात आहे. त्यातून ग्रामीण नागरिकांची लूट केली जात आहे. या अवैैध सावकारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे.अण्णांकडून कर्जाच्या रकमेसोबत साहित्याची विक्रीवणी, झरी, मारेगाव तालुक्यात राजस्थानी सावकारांचा प्रवेश होण्याअगोदर आंध्रप्रदेशातील अण्णांचा या भागात दबदबा होता. तो आताही आहे. मात्र या सावकारांचा कर्ज वाटपाचा फंडा आहे. या सावकारांकडून कर्जाच्या रकमेसोबत बॅटरी, ब्लँकेट यासारखे साहित्य कर्जदाराच्या माथी मारले जाते. विशेष म्हणजे दामदुप्पट किंमतीत हे साहित्य कर्जदाराला दिले जाते. ते पैसे कर्जासोबत वसुल केले जाते. त्यातून कर्जदाराची मोठी लूट होत आहे.