शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

रस्त्यालगतची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:06 IST

पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावरील हिरवीकंच उभी झाडे भर दुपारी पेटविली जात असून आग लावणाऱ्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील आजुबाजूला असलेली डौलदार झाडे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देवनसंपत्ती संकटात : वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आगीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावरील हिरवीकंच उभी झाडे भर दुपारी पेटविली जात असून आग लावणाऱ्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील आजुबाजूला असलेली डौलदार झाडे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.सध्या उन्हाचा पारा वाढत असून दुपारी १२ वाजताच्यानंतर सूर्य आग ओकत असल्याने एकीकडे असह्य वेदना होत आहे. दुसरीकडे शांत सावली देणारी झाडे मात्र नष्ट होत आहेत. पांढरकवडा-यवतमाळ या राज्य मार्गावर दोन्ही बाजूला असलेली कडूनिंबाची मोठमोठी झाडे रोज जळताना दिसत आहे. त्यात सामाजिक वनीकरण विभागाने लावलेले नवीन वृक्ष जळून खाक होत आहे. शासन कोट्यवधी रूपये खर्च करून दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविते. परंतु तेच वृक्ष मोठे झाले की, ती अज्ञात इसमाकडून तोडली जातात. यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. भर दुपारी झाडांच्या बुंध्याला आग लागून ते जमीनदोस्त करण्यात येते. त्यानंतर ते इंधन म्हणून वापरात आणले जाते. हे वृक्ष रात्रीच तोडून नेले जातात. अनेक ठिकाणी हा प्रकार सर्रास सुरू असून यामुळे वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास रस्त्याच्या आजुबाजूने कुठेही वृक्ष दिसणार नाही व उभे राहण्यासाठी सावलीसुद्धा मिळणार नाही.कारवाई केव्हा होणार?पांढरकवडा-यवतमाळ या रस्त्यासह विविध मार्गावर झाडे तोडणारी टोळी सक्रिय असून ही टोळी अनेक मार्गावरील झाडांना आग लावत आहे. रात्री झाडे जमिनदोस्त झाल्यानंतर राहिलेले खोड तोडून नेतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक झाडे नष्ट झाली आहेत. पोलिसांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या टोळीचा शोध घेऊन त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fireआग