शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:06 IST

पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावरील हिरवीकंच उभी झाडे भर दुपारी पेटविली जात असून आग लावणाऱ्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील आजुबाजूला असलेली डौलदार झाडे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देवनसंपत्ती संकटात : वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आगीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावरील हिरवीकंच उभी झाडे भर दुपारी पेटविली जात असून आग लावणाऱ्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील आजुबाजूला असलेली डौलदार झाडे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.सध्या उन्हाचा पारा वाढत असून दुपारी १२ वाजताच्यानंतर सूर्य आग ओकत असल्याने एकीकडे असह्य वेदना होत आहे. दुसरीकडे शांत सावली देणारी झाडे मात्र नष्ट होत आहेत. पांढरकवडा-यवतमाळ या राज्य मार्गावर दोन्ही बाजूला असलेली कडूनिंबाची मोठमोठी झाडे रोज जळताना दिसत आहे. त्यात सामाजिक वनीकरण विभागाने लावलेले नवीन वृक्ष जळून खाक होत आहे. शासन कोट्यवधी रूपये खर्च करून दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविते. परंतु तेच वृक्ष मोठे झाले की, ती अज्ञात इसमाकडून तोडली जातात. यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. भर दुपारी झाडांच्या बुंध्याला आग लागून ते जमीनदोस्त करण्यात येते. त्यानंतर ते इंधन म्हणून वापरात आणले जाते. हे वृक्ष रात्रीच तोडून नेले जातात. अनेक ठिकाणी हा प्रकार सर्रास सुरू असून यामुळे वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास रस्त्याच्या आजुबाजूने कुठेही वृक्ष दिसणार नाही व उभे राहण्यासाठी सावलीसुद्धा मिळणार नाही.कारवाई केव्हा होणार?पांढरकवडा-यवतमाळ या रस्त्यासह विविध मार्गावर झाडे तोडणारी टोळी सक्रिय असून ही टोळी अनेक मार्गावरील झाडांना आग लावत आहे. रात्री झाडे जमिनदोस्त झाल्यानंतर राहिलेले खोड तोडून नेतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक झाडे नष्ट झाली आहेत. पोलिसांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या टोळीचा शोध घेऊन त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fireआग