शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

घुग्गुस-शिंदोला रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:38 IST

वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे.

ठळक मुद्देअवजड वाहतुकीचा परिणाम : वेकोलिकडून रस्त्याची दुरूस्ती करण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूरवरून शिंदोलामार्गे आदिलाबादकडे जाणाऱ्या राज्य मार्गाची साखरा ते शिंदोलादरम्यान, चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हे समजायला येत नाही. रस्त्याने वाहने चालविणे धोकादायक ठरल्याने चंद्रपूर आगाराने यामार्गे मुकूटबनला जाणारी बस बंद केली आहे. त्यामुळे घुग्घूस येथे शिक्षणासाठी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे.चंद्रपुरवरून घुग्घूस-शिंदोला-मुकूटबनमार्गे तेलंगणा राज्याला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गाने चंद्रपूर आगाराच्या बसेस मुकूटबनला जातात. मात्र याच मार्गावर वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. या मार्गाला वेकोलिचा शाप असल्याने वेकोलिनेच हा मार्ग ठणठणीत करावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. प्रशासनाच्या नरमाईच्या भूमिकेमुळे वेकोलि प्रशासन निष्ठूर बनले आहे. हा मार्ग अवजड वाहतुकीमुळे वारंवार फुटत असल्याने वेकोलिनेच दुरूस्तीचे काम करावे, अशी मागणी आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग वारंवार या एकाच रस्त्यावर खर्च करण्यास असमर्थ आहे. यावर्षीच्या सततच्या पावसाने मार्गावर जलकुंड तयार झाले आहे. या कुंडात पाणी भरून असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. वेकोलिने या रस्त्याची दुरूस्ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, ललित लांजेवार, सुधीर थेरे, शशीकांत नक्षणे यांची उपस्थिती होती. वेकोलिने ५ सप्टेंबरपर्यंत दुरूस्ती न केल्यास शिवसेना दळणवळण पूर्णत: बंद पाडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.वर्धा नदीवरील पूलही झाला कमकुवतयाच मार्गावर वर्धा नदीवर वेकोलिने पूल बांधला. मात्र या पुलाचे बांधकामही निकृष्ट झाल्याने धोकादायक ठरला आहे. त्याच्या बांधकामाची गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी व्हावी व पुल धोकादायक सिद्ध झाल्यास वेकोलिला नवीन पूल बांधण्यासाठी बाधित करावे, अशीही मागणी केली जात आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक