शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

घुग्गुस-शिंदोला रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:38 IST

वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे.

ठळक मुद्देअवजड वाहतुकीचा परिणाम : वेकोलिकडून रस्त्याची दुरूस्ती करण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूरवरून शिंदोलामार्गे आदिलाबादकडे जाणाऱ्या राज्य मार्गाची साखरा ते शिंदोलादरम्यान, चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हे समजायला येत नाही. रस्त्याने वाहने चालविणे धोकादायक ठरल्याने चंद्रपूर आगाराने यामार्गे मुकूटबनला जाणारी बस बंद केली आहे. त्यामुळे घुग्घूस येथे शिक्षणासाठी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे.चंद्रपुरवरून घुग्घूस-शिंदोला-मुकूटबनमार्गे तेलंगणा राज्याला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गाने चंद्रपूर आगाराच्या बसेस मुकूटबनला जातात. मात्र याच मार्गावर वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. या मार्गाला वेकोलिचा शाप असल्याने वेकोलिनेच हा मार्ग ठणठणीत करावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. प्रशासनाच्या नरमाईच्या भूमिकेमुळे वेकोलि प्रशासन निष्ठूर बनले आहे. हा मार्ग अवजड वाहतुकीमुळे वारंवार फुटत असल्याने वेकोलिनेच दुरूस्तीचे काम करावे, अशी मागणी आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग वारंवार या एकाच रस्त्यावर खर्च करण्यास असमर्थ आहे. यावर्षीच्या सततच्या पावसाने मार्गावर जलकुंड तयार झाले आहे. या कुंडात पाणी भरून असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. वेकोलिने या रस्त्याची दुरूस्ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, ललित लांजेवार, सुधीर थेरे, शशीकांत नक्षणे यांची उपस्थिती होती. वेकोलिने ५ सप्टेंबरपर्यंत दुरूस्ती न केल्यास शिवसेना दळणवळण पूर्णत: बंद पाडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.वर्धा नदीवरील पूलही झाला कमकुवतयाच मार्गावर वर्धा नदीवर वेकोलिने पूल बांधला. मात्र या पुलाचे बांधकामही निकृष्ट झाल्याने धोकादायक ठरला आहे. त्याच्या बांधकामाची गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी व्हावी व पुल धोकादायक सिद्ध झाल्यास वेकोलिला नवीन पूल बांधण्यासाठी बाधित करावे, अशीही मागणी केली जात आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक