शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाजपा कार्यकर्त्याच्याच घरासमोरील रस्ता गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:15 IST

दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले होते भूमिपूजन : नामफलक मात्र दुसरीकडेच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.श्रीकृष्णनगरात भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोर सन २०१६ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहा लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मोरवे यांच्या घरापासून गांधी यांच्या घरापर्यंत असा हा रस्ता होता. त्यासाठी निधीची तरतूदही केली गेली होती. तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात पार पडले होते. तसा फलकही लावण्यात आला होता. मंत्र्यांकडून सिमेंट रस्ता खेचून आणला म्हणून त्या कार्यकर्त्याने परिसरातील नागरिकांकडून शाबासकीही मिळवून घेतली होती. परंतु आता प्रत्यक्षात तेथे स्थिती वेगळीच आहे. हा सहा लाखांचा रस्ताच तेथून गायब झाला आहे. त्याचा नामफलक मात्र दारव्हा रोडवर दुसºयाच रस्त्यावर उभा दिसतो आहे. वास्तविक त्या रस्त्याचा आणि नामफलकाचा दुरान्वये संबंध नाही. या माध्यमातून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली जात असल्याचा प्रकार काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. काही दिवसांपूर्वी या फलकावर कुणीतरी दगडफेकही केल्याचे सांगितले जाते. रस्त्यासाठी मंजूर झालेले सहा लाख रुपये नेमके कुठे खर्च झाले हा संशोधनाचा विषय आहे. काम खेचून आणले म्हणून पाठ थोपटून घेणारा तो भाजपा कार्यकर्ता मात्र मूग गिळून आहे. त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केले जाते. हा कार्यकर्ता गप्प राहण्यामागे पक्षशिस्त की नेत्याची दहशत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कार्यकर्ता गप्प का?रस्ते गायब होण्याचे प्रकार नेहमीच होतात. चांगल्या रस्त्यावर दुसऱ्यादा काम करण्याचे प्रकारही घडले आहे. अतिदुर्गम भागात तर रस्ते, देखभाल-दुरुस्ती केवळ कागदावरच होते. मात्र हा प्रकार चक्क सुशिक्षितांच्या व राजकीय नेत्यांच्या नगरात जिल्हा मुख्यालयी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची असते. श्रीकृष्णनगरातील रस्ता गायब प्रकरणात सरकारला जाब विचारण्याऐवजी कार्यकर्ता गप्प असल्याने युती सरकारमध्ये पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना ‘व्हाईस’च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.