शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

भाजपा कार्यकर्त्याच्याच घरासमोरील रस्ता गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:15 IST

दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले होते भूमिपूजन : नामफलक मात्र दुसरीकडेच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.श्रीकृष्णनगरात भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोर सन २०१६ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहा लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मोरवे यांच्या घरापासून गांधी यांच्या घरापर्यंत असा हा रस्ता होता. त्यासाठी निधीची तरतूदही केली गेली होती. तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात पार पडले होते. तसा फलकही लावण्यात आला होता. मंत्र्यांकडून सिमेंट रस्ता खेचून आणला म्हणून त्या कार्यकर्त्याने परिसरातील नागरिकांकडून शाबासकीही मिळवून घेतली होती. परंतु आता प्रत्यक्षात तेथे स्थिती वेगळीच आहे. हा सहा लाखांचा रस्ताच तेथून गायब झाला आहे. त्याचा नामफलक मात्र दारव्हा रोडवर दुसºयाच रस्त्यावर उभा दिसतो आहे. वास्तविक त्या रस्त्याचा आणि नामफलकाचा दुरान्वये संबंध नाही. या माध्यमातून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली जात असल्याचा प्रकार काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. काही दिवसांपूर्वी या फलकावर कुणीतरी दगडफेकही केल्याचे सांगितले जाते. रस्त्यासाठी मंजूर झालेले सहा लाख रुपये नेमके कुठे खर्च झाले हा संशोधनाचा विषय आहे. काम खेचून आणले म्हणून पाठ थोपटून घेणारा तो भाजपा कार्यकर्ता मात्र मूग गिळून आहे. त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केले जाते. हा कार्यकर्ता गप्प राहण्यामागे पक्षशिस्त की नेत्याची दहशत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कार्यकर्ता गप्प का?रस्ते गायब होण्याचे प्रकार नेहमीच होतात. चांगल्या रस्त्यावर दुसऱ्यादा काम करण्याचे प्रकारही घडले आहे. अतिदुर्गम भागात तर रस्ते, देखभाल-दुरुस्ती केवळ कागदावरच होते. मात्र हा प्रकार चक्क सुशिक्षितांच्या व राजकीय नेत्यांच्या नगरात जिल्हा मुख्यालयी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची असते. श्रीकृष्णनगरातील रस्ता गायब प्रकरणात सरकारला जाब विचारण्याऐवजी कार्यकर्ता गप्प असल्याने युती सरकारमध्ये पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना ‘व्हाईस’च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.