शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाविना सहा लाख हेक्टर पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:45 IST

निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ १९.२४ टक्के पाणी शिल्लक : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३ टक्केच पाऊस

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४०२ गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम आहे. या गावांतील एक लाख नागरिकांपुढे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.मान्सून सक्रीय नसून बंगालच्या खाडीतून येणाऱ्या मोसमी वाºयाचा पाऊस जिल्ह्यात आला आहे. काही भागात हा पाऊस बरसला तर काही भागात अपुरा बरसला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १३.९३ टक्के आहे. अपुºया पावसाने प्रकल्पही भरले नाही. जिल्ह्यातील २५० पाझर तलाव आणि लघुप्रकल्प कोरडे आहेत. इतर प्रकल्पांमध्येही अपुरा जलसाठा आहे.साधारणत: जुलैत सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा अर्धा जुलै संपूनही पाऊस १२ दिवसांपासून गायब आहे. यामुळे प्रकल्पातील साठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. मोठ्या पूस प्रकल्पात सर्वाधिक २१.५८ टक्के पाणी आहे. अरुणावतीमध्ये ९.६४ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्प २८ टक्के भरलेला आहे. इसापूर धरणात अत्यल्प पाणी आहे. चार मोठ्या प्रकल्पात सरारी २०.३७ टक्के पाणी आहे. मध्यम ९ प्रकल्पात १६.८९ टक्के तर ९४ लघु प्रकल्पात १९.४९ टक्के पाणी शिल्लक आहे. ४०२ विहिरी अधिग्रहित करूनही एक लाख पाच हजार नागरिकांची तहान टँकरवरच अवलंबून आहे.खरीपातील अडचणी वाढल्याजिल्ह्यात केवळ १२६ मिमी पाऊस बरसला. आता खरिपाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. विहिरींची पातळीही वाढली नाही. यामुळे ओलिताच्या शेतीचीही अवस्था कोरडवाहूसारखी झाली आहे. सहा लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न आल्यास हे पीक कोमेजणार आहे.उमरखेड, दिग्रस, पुसदला फटकाजिल्ह्यातील ४०२ गावामध्ये अजूनही पाणीटंचाई आहे. यात वणी तालुक्यातील १२ गावे, दारव्हा ४२, पुसद ४३, नेर २५, यवतमाळ २७, बाभूळगाव ९, आर्णी ४५, दिग्रस ५४, महागाव १५, केळापूर ३, झरी ४, घाटंजी ४१, राळेगाव ३, कळंब १६, उमरखेड तालुक्यातील ६३ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती