शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पावसाविना सहा लाख हेक्टर पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:45 IST

निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ १९.२४ टक्के पाणी शिल्लक : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३ टक्केच पाऊस

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४०२ गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम आहे. या गावांतील एक लाख नागरिकांपुढे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.मान्सून सक्रीय नसून बंगालच्या खाडीतून येणाऱ्या मोसमी वाºयाचा पाऊस जिल्ह्यात आला आहे. काही भागात हा पाऊस बरसला तर काही भागात अपुरा बरसला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १३.९३ टक्के आहे. अपुºया पावसाने प्रकल्पही भरले नाही. जिल्ह्यातील २५० पाझर तलाव आणि लघुप्रकल्प कोरडे आहेत. इतर प्रकल्पांमध्येही अपुरा जलसाठा आहे.साधारणत: जुलैत सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा अर्धा जुलै संपूनही पाऊस १२ दिवसांपासून गायब आहे. यामुळे प्रकल्पातील साठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. मोठ्या पूस प्रकल्पात सर्वाधिक २१.५८ टक्के पाणी आहे. अरुणावतीमध्ये ९.६४ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्प २८ टक्के भरलेला आहे. इसापूर धरणात अत्यल्प पाणी आहे. चार मोठ्या प्रकल्पात सरारी २०.३७ टक्के पाणी आहे. मध्यम ९ प्रकल्पात १६.८९ टक्के तर ९४ लघु प्रकल्पात १९.४९ टक्के पाणी शिल्लक आहे. ४०२ विहिरी अधिग्रहित करूनही एक लाख पाच हजार नागरिकांची तहान टँकरवरच अवलंबून आहे.खरीपातील अडचणी वाढल्याजिल्ह्यात केवळ १२६ मिमी पाऊस बरसला. आता खरिपाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. विहिरींची पातळीही वाढली नाही. यामुळे ओलिताच्या शेतीचीही अवस्था कोरडवाहूसारखी झाली आहे. सहा लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न आल्यास हे पीक कोमेजणार आहे.उमरखेड, दिग्रस, पुसदला फटकाजिल्ह्यातील ४०२ गावामध्ये अजूनही पाणीटंचाई आहे. यात वणी तालुक्यातील १२ गावे, दारव्हा ४२, पुसद ४३, नेर २५, यवतमाळ २७, बाभूळगाव ९, आर्णी ४५, दिग्रस ५४, महागाव १५, केळापूर ३, झरी ४, घाटंजी ४१, राळेगाव ३, कळंब १६, उमरखेड तालुक्यातील ६३ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती