शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातून कृषक समाजात क्रांती घडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:14 IST

लेखकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केवळ मांडणी करण्यापेक्षा ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. साहित्यातून कृषी क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, असा सूर मान्यवरांनी आळवला.

ठळक मुद्देपरिसंवादातील सूर : शेतकऱ्यांच्या मुलांनी लेखणी हातात घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : ग्रामीण आणि नागरी लेखकांच्या जाणिवा, भूमिका, निष्ठा, बांधिलकी वेगवेगळ्या असतात. नागरी लेखकांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला नसल्याने ते वास्तव चित्रण करू शकत नाहीत. लेखकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केवळ मांडणी करण्यापेक्षा ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. साहित्यातून कृषी क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, असा सूर मान्यवरांनी आळवला.साहित्य संमेलनामध्ये ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ या विषयावरील परिसंवाद पार पडला. यामध्ये डॉ. फुला बागुल (धुळे), सारंग दर्शने (मुंबई), गजानन नारे (अकोला), डॉ. देवेंद्र पुनसे (यवतमाळ), प्रभाकर सलगरे (आळंद) यांनी सहभाग घेतला.डॉ. फुला बागुल म्हणाले, ‘नागरी लेखकांचा लोकवाड्मयाशी फारसा संबंध नसतो. ते केवळ रविवारी जगतात, त्यामुळे त्यांचं जगणं उपरं असतं. नागरी लेखकांची लेखणी प्रतिक्रीयावादी, म्हणूनच कृत्रिम असते. तिचा आदीमतेशी संबंध नसतो. नागरी लेखकांचा ध्यास कामोत्तेजक, विखारी, लोकानुरंजन आणि व्यक्तीवादी लेखन करण्याचा आहे. ग्रामीण आणि नागरी लेखकांचे अनुभवविशव, जाणिवा, निष्ठा, बांधिलकी, प्रेरणा, भूमिका वेगवेगळ्या असतात. ते शेती-मातीशी समरस होऊ शकत नाहीत. मुळात ग्रामीण लेखन हा साहित्याचा मध्यवर्ती आणि एकमात्र प्रमुख प्रवाह आहे.सारंग दर्शने म्हणाले, ‘साहित्य, संगीत, चित्रपट अशा सर्वच कला कृषक समाजाच्या चित्राबाबत उदासीन आणि तोकड्या पडल्या आहेत. तरुण लेखक ग्रामीण वास्तवापासून पूर्णपणे तुटलेला आहे. जे माहीतच नाही, त्याबद्दल तळमळ वाटणारच कशी? काही अपवाद वगळता, शेतकऱ्यांचे जीवन आणि ग्रामीण जीवन लेखकांनी केवळ विनोदनिर्मितीचे साधन म्हणून वापरले आहे. साहित्यिकांच्या तिसऱ्या डोळ्याला शेतकऱ्यांचे दु:ख दिसत नाही का?'गजानन नारे म्हणाले, ‘नागरी लेखकांची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळलेली नसते. लेखकाच्या जाणिवा अनुभवाने समृद्ध होत असतात. समाजातील एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर तो आपल्या लेखनाचे केंद्र बनले पाहिजे. मात्र, अनुभव घेतला नसल्याने नागरी लेखकांच्या लेखनात परिणामकारकता येत नाही. काळाच्या ओघात ग्रामीण लेखकांच्या तुलनेत नागरी लेखकांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ग्रामीण जीवनाचे दर्शन झाकोळले गेले. आता चित्र बदलू लागले आहे. ग्रामीण लेखकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मोहोळ उठत आहेत. ग्रामीण जीवन, जागतिकीरणाशी संबंध याकडे डोळस लेखनातून लक्ष वेधले गेले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न, ते सोडवण्याचा मार्ग यांची सामूहिक जबाबदारी लेखकानी घेतली तर आत्महत्या रोखण्यास मदत होईल.’प्रभाकर सलगर म्हणाले, 'विचार मांडण्याची मुभा नसेल, विचार ऐकण्याची तयारी नसेल तर लेखक लिहिणार कसे? शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील, कृती आराखडा तयार होईल असे लेखन झाले पाहिजे. हृदयाला भिडणारे वाचन प्रसवले तर वाचक वाचतील, शासनाला जाग येईल. असे प्रश्न मांडता येणार नसतील तर त्यांना लेखक म्हणायचे का, असा प्रश्न पडतो.कृष्णक समाजाचे चित्रण करण्यात प्रत्येक प्रस्थापित लेखक कमी पडतो. साहित्य कोणत्याही भाषेतील असले तरी वास्तववादी लेखन झाले पाहिजे. साहित्यामध्ये ताकद, जाणीव असली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडली आहे का? क्रांती घडवणारे लेखन मराठी साहित्यात अपवादाने झाले. साहित्य हे प्रबोधनाचे माध्यम आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ साहित्यात मांडून चालणार नाही. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ. देवेंद्र पुनसेपरिसंवादादरम्यान, विष्णू पंत गायिखे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून व्यासपीठावर येऊन विचार मांडले. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांची आंदोलने झाली, त्याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे खरे प्रश्नही जाणून घ्यायची आज गरज आहे. शेतकरी देशाला अन्नधान्य उत्पादन करून देतो. मात्र, त्याच्या मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार होत नाही. शेतकऱ्यांने माल रस्त्यावर फेकला तर त्याच्यावर टीका होते. मात्र, पालेभाजीच्या एका गड्डीसाठी सर्वसामान्य लोक त्याच्याशी वाद घालतात. शेतकऱ्यांचे प्रश्न इतर कोणी आता मांडेल अशी आशा न बाळगता आता शेतकऱ्यांच्या मुलांनीच लेखणी हातात घेतली पाहिजे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन