शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने २२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.

ठळक मुद्देकापसाला सर्वाधिक फटका : १५ कोटी रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसात जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिके क्षतीग्रस्त झाली आहे. या क्षेत्रावर ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने मदतीसाठी प्रशासनाकडून १५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.परतीचा पाऊस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोसळला. दारव्हा आणि दिग्रस तालुक्यामध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. ६० मिमी पेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी नोंदविली जाते. या दोन तालुक्यांमध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेले २२ हजार ७४० हेक्टर क्षेत्र आहेत. कृषी, महसूल आणि तहसील विभागाच्या संयुक्त पंचनामे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे. १२ हजार १९५ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. तर आठ हजार १७५ हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर दोन हजार ३७० हेक्टरवरील तूर पिकाला याचा फटका बसला आहे.शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.जिल्ह्यातील दारव्हा आणि दिग्रस या दोन तालुक्यातीलच नुकसानीची ३३ टक्के पेक्षा अधिक बाधित क्षेत्र म्हणून नोंद झाली आहे. इतर १४ तालुके यामध्ये नोंदविल्या गेले नाही. या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.पावसाळ्यात ३१ हजार हेक्टरची हानीजिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ३१ हजार १२७ हेक्टरचे नुकसान शासनाच्या दरबारी नोंदविल्या गेले आहेत. या क्षेत्रासाठी २२ कोटी रुपये लागणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासोबत बागायती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. नुकसानी पोटी मिळणारी मदत शेतकऱ्यांना अपुरीच राहणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती