शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने २२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.

ठळक मुद्देकापसाला सर्वाधिक फटका : १५ कोटी रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसात जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिके क्षतीग्रस्त झाली आहे. या क्षेत्रावर ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने मदतीसाठी प्रशासनाकडून १५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.परतीचा पाऊस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोसळला. दारव्हा आणि दिग्रस तालुक्यामध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. ६० मिमी पेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी नोंदविली जाते. या दोन तालुक्यांमध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेले २२ हजार ७४० हेक्टर क्षेत्र आहेत. कृषी, महसूल आणि तहसील विभागाच्या संयुक्त पंचनामे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे. १२ हजार १९५ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. तर आठ हजार १७५ हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर दोन हजार ३७० हेक्टरवरील तूर पिकाला याचा फटका बसला आहे.शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.जिल्ह्यातील दारव्हा आणि दिग्रस या दोन तालुक्यातीलच नुकसानीची ३३ टक्के पेक्षा अधिक बाधित क्षेत्र म्हणून नोंद झाली आहे. इतर १४ तालुके यामध्ये नोंदविल्या गेले नाही. या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.पावसाळ्यात ३१ हजार हेक्टरची हानीजिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ३१ हजार १२७ हेक्टरचे नुकसान शासनाच्या दरबारी नोंदविल्या गेले आहेत. या क्षेत्रासाठी २२ कोटी रुपये लागणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासोबत बागायती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. नुकसानी पोटी मिळणारी मदत शेतकऱ्यांना अपुरीच राहणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती