शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

By रूपेश उत्तरवार | Updated: October 20, 2022 14:19 IST

दिवाळीच्या तोंडावर गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव

यवतमाळ : यावर्षी प्रारंभापासूनच पावसाने राज्यभर कहर केला आहे. आता परतीचा पाऊसही कहर करीत आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये ३० लाख हेक्टरला फटका बसला आहे. परतीच्या पावसाने दोन लाख हेक्टरवरची पिके मातीमोल झाली आहेत. या पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही बसत आहे. दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेले पीक हातातून जात असल्याने शेतकऱ्यांना हादरा बसला आहे. गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव सुरू आहे.

यावर्षी संपूर्ण राज्यभरात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या काळात २६ लाख हेक्टरला पुराचा आणि पावसाचा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जोमात असलेली पिके नष्ट झाली. ऑक्टोबरमध्ये काढणीला आलेली दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. याचा फटका १६ जिल्ह्यांना बसला आहे. अचानक बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना अंदाज बांधणेही अवघड झाले आहे.

नवरात्रात सतत पाऊस होता. पावसाने उसंत घेताच शेतकऱ्यांनी काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीला सुरुवात केली. मात्र, पाऊस बरसतच असल्याने सोयाबीनला काेंब फुटत आहेत, तर कापसाचे बोंड काळवंडले असून बोंडसडीचा धोका वाढला आहे. याशिवाय सोयाबीनही काळे पडत आहे.

शेतशिवारात हंगाम पूर्ण करण्यासाठी मजूरही मिळणे अवघड आहे. मजुरांचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. ३५० रुपये रोज याप्रमाणे अतिशय महागडा दर शेतमजुरांना द्यावा लागत आहे. दुसरीकडे शेतमालास मिळणारे दर घसरले आहेत. पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतशिवारात झालेल्या नुकसानीचा आकडा आणखी मोठा आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा अहवाल पुढे येणार आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान

राज्यात एक कोटी ४६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यातील ३० लाख हेक्टरवरचे पीक अतिपावसासह परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त झालेले आहे. आजपर्यंत झालेल्या नुकसानीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले नुकसान आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ११ हजार हेक्टरला फटका बसला. आतापर्यंत चार लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा वाढतच आहे. सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत.

- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ