शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

By रूपेश उत्तरवार | Updated: October 20, 2022 14:19 IST

दिवाळीच्या तोंडावर गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव

यवतमाळ : यावर्षी प्रारंभापासूनच पावसाने राज्यभर कहर केला आहे. आता परतीचा पाऊसही कहर करीत आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये ३० लाख हेक्टरला फटका बसला आहे. परतीच्या पावसाने दोन लाख हेक्टरवरची पिके मातीमोल झाली आहेत. या पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही बसत आहे. दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेले पीक हातातून जात असल्याने शेतकऱ्यांना हादरा बसला आहे. गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव सुरू आहे.

यावर्षी संपूर्ण राज्यभरात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या काळात २६ लाख हेक्टरला पुराचा आणि पावसाचा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जोमात असलेली पिके नष्ट झाली. ऑक्टोबरमध्ये काढणीला आलेली दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. याचा फटका १६ जिल्ह्यांना बसला आहे. अचानक बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना अंदाज बांधणेही अवघड झाले आहे.

नवरात्रात सतत पाऊस होता. पावसाने उसंत घेताच शेतकऱ्यांनी काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीला सुरुवात केली. मात्र, पाऊस बरसतच असल्याने सोयाबीनला काेंब फुटत आहेत, तर कापसाचे बोंड काळवंडले असून बोंडसडीचा धोका वाढला आहे. याशिवाय सोयाबीनही काळे पडत आहे.

शेतशिवारात हंगाम पूर्ण करण्यासाठी मजूरही मिळणे अवघड आहे. मजुरांचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. ३५० रुपये रोज याप्रमाणे अतिशय महागडा दर शेतमजुरांना द्यावा लागत आहे. दुसरीकडे शेतमालास मिळणारे दर घसरले आहेत. पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतशिवारात झालेल्या नुकसानीचा आकडा आणखी मोठा आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा अहवाल पुढे येणार आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान

राज्यात एक कोटी ४६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यातील ३० लाख हेक्टरवरचे पीक अतिपावसासह परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त झालेले आहे. आजपर्यंत झालेल्या नुकसानीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले नुकसान आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ११ हजार हेक्टरला फटका बसला. आतापर्यंत चार लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा वाढतच आहे. सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत.

- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ