शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

By रूपेश उत्तरवार | Updated: October 20, 2022 14:19 IST

दिवाळीच्या तोंडावर गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव

यवतमाळ : यावर्षी प्रारंभापासूनच पावसाने राज्यभर कहर केला आहे. आता परतीचा पाऊसही कहर करीत आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये ३० लाख हेक्टरला फटका बसला आहे. परतीच्या पावसाने दोन लाख हेक्टरवरची पिके मातीमोल झाली आहेत. या पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही बसत आहे. दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेले पीक हातातून जात असल्याने शेतकऱ्यांना हादरा बसला आहे. गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव सुरू आहे.

यावर्षी संपूर्ण राज्यभरात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या काळात २६ लाख हेक्टरला पुराचा आणि पावसाचा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जोमात असलेली पिके नष्ट झाली. ऑक्टोबरमध्ये काढणीला आलेली दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. याचा फटका १६ जिल्ह्यांना बसला आहे. अचानक बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना अंदाज बांधणेही अवघड झाले आहे.

नवरात्रात सतत पाऊस होता. पावसाने उसंत घेताच शेतकऱ्यांनी काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीला सुरुवात केली. मात्र, पाऊस बरसतच असल्याने सोयाबीनला काेंब फुटत आहेत, तर कापसाचे बोंड काळवंडले असून बोंडसडीचा धोका वाढला आहे. याशिवाय सोयाबीनही काळे पडत आहे.

शेतशिवारात हंगाम पूर्ण करण्यासाठी मजूरही मिळणे अवघड आहे. मजुरांचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. ३५० रुपये रोज याप्रमाणे अतिशय महागडा दर शेतमजुरांना द्यावा लागत आहे. दुसरीकडे शेतमालास मिळणारे दर घसरले आहेत. पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतशिवारात झालेल्या नुकसानीचा आकडा आणखी मोठा आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा अहवाल पुढे येणार आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान

राज्यात एक कोटी ४६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यातील ३० लाख हेक्टरवरचे पीक अतिपावसासह परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त झालेले आहे. आजपर्यंत झालेल्या नुकसानीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले नुकसान आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ११ हजार हेक्टरला फटका बसला. आतापर्यंत चार लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा वाढतच आहे. सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत.

- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ