शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

By रूपेश उत्तरवार | Updated: October 20, 2022 14:19 IST

दिवाळीच्या तोंडावर गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव

यवतमाळ : यावर्षी प्रारंभापासूनच पावसाने राज्यभर कहर केला आहे. आता परतीचा पाऊसही कहर करीत आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये ३० लाख हेक्टरला फटका बसला आहे. परतीच्या पावसाने दोन लाख हेक्टरवरची पिके मातीमोल झाली आहेत. या पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही बसत आहे. दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेले पीक हातातून जात असल्याने शेतकऱ्यांना हादरा बसला आहे. गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव सुरू आहे.

यावर्षी संपूर्ण राज्यभरात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या काळात २६ लाख हेक्टरला पुराचा आणि पावसाचा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जोमात असलेली पिके नष्ट झाली. ऑक्टोबरमध्ये काढणीला आलेली दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. याचा फटका १६ जिल्ह्यांना बसला आहे. अचानक बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना अंदाज बांधणेही अवघड झाले आहे.

नवरात्रात सतत पाऊस होता. पावसाने उसंत घेताच शेतकऱ्यांनी काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीला सुरुवात केली. मात्र, पाऊस बरसतच असल्याने सोयाबीनला काेंब फुटत आहेत, तर कापसाचे बोंड काळवंडले असून बोंडसडीचा धोका वाढला आहे. याशिवाय सोयाबीनही काळे पडत आहे.

शेतशिवारात हंगाम पूर्ण करण्यासाठी मजूरही मिळणे अवघड आहे. मजुरांचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. ३५० रुपये रोज याप्रमाणे अतिशय महागडा दर शेतमजुरांना द्यावा लागत आहे. दुसरीकडे शेतमालास मिळणारे दर घसरले आहेत. पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतशिवारात झालेल्या नुकसानीचा आकडा आणखी मोठा आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा अहवाल पुढे येणार आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान

राज्यात एक कोटी ४६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यातील ३० लाख हेक्टरवरचे पीक अतिपावसासह परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त झालेले आहे. आजपर्यंत झालेल्या नुकसानीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले नुकसान आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ११ हजार हेक्टरला फटका बसला. आतापर्यंत चार लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा वाढतच आहे. सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत.

- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ